बुधवार, ३१ मे, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 31 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि.1 जुन 2017 रोजी औरंगाबाद येथून सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची पदाधिकाऱ्यासमवेत आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,बीड). सकाळी 11 वाजता विविध विकास योजनांची अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,बीड).  दुपारी 12 वाजता परळी बाह्यवळण रस्ता भुसंपादन प्रश्नासंदर्भात बैठकीस उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,बीड).  दुपारी 1 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव.

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी



बीड, दि. 31 :- अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी राम गगराणी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, ३० मे, २०१७

बीड तहसील कार्यालयात ई-पॉस मशीनचे वितरण व प्रशिक्षण

बीड तहसील कार्यालयात
ई-पॉस मशीनचे वितरण व प्रशिक्षण


          बीड दि. 30 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पीडीएस द्वारा अन्न-धान्य वितरणासाठी बीड तालुक्यासाठी शासनाकडून ई-पॉस मशीन प्राप्त झाल्या असून बीड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना या मशीन तात्काळ वितरीत करण्यात येणार आहेत.          ई-पॉस मशीन वितरण व प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवार दि.1 जून 2017 रोजी सकाळी 11 वाजता मिटींग हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून दुकानदारांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानाच्या डाटा एन्ट्री दुरुस्ती यादीसह हजर रहावे. या बैठकीस गैरहजर राहिल्यास माहे जून 2017 चे मासीक धान्य नियतन मिळणार नाही याची नोंद घ्यावी. असे बीडचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

बीड जिल्ह्यात 12 लक्ष 82 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन; सर्वस्तरावरुन सहभागाचे आवाहन

बीड जिल्ह्यात 12 लक्ष 82 हजार वृक्ष लागवडीचे
नियोजन; सर्वस्तरावरुन सहभागाचे आवाहन

          बीड दि. 30 :- महाराष्ट्र शासनाने सन 2017 चे पावसाळ्यात 1 ते 7 जुलै या कालावधीत राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याअंतर्गत बीड जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 12 लक्ष 82 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभाग, अशासकीय संस्था, पर्यावरण संस्था यांचा सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, विविध शासकीय व अशासकीय संस्था, विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार असे विविध समाजघटक व संघटना यांचा सक्रीय सहभाग मिळावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
          ही मोहिम पारदर्शीपणे राबविण्यासाठी रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात येणाऱ्या रोपांची स्थिती ऑनलाईन पध्दतीने संनियंत्रीत केली जात आहे. वन विभागामार्फत वनक्षेत्रात लावण्यात येणाऱ्या जिवंत रोपांची टक्केवारी निश्चित करण्यासाठी वन विभागातील प्रचलीत मापदंडानूसार योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे. इतर शासकीय विभाग तसेच जनसामान्य व अशासकीय संस्थामार्फत करण्यात येणारी लागवड व रोपांचे संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी त्या-त्या व्यक्तींची व संस्थेची राहणार आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी सुचित केले आहे.
          बीड जिल्ह्यात वन व सामाजिक वनीकरण विभागास 7.10 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून प्रत्यक्षात 7.90 लक्ष खड्ड्याचे खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामपंचायतींना 3.71 लक्ष व इतर शासकीय विभागांना 2.01 लक्ष उद्दिष्ट असून त्यांच्याकडील खड्डे खोदकाम प्रगतीपथावर आहे. सदर वृक्ष लागवडीसाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाने जिल्ह्यात 28 रोपवाटिका तयार केल्या असून त्यामधून 25 लक्ष रोपे लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये वड, पिंपळ, पिंपरण, कडूनिंब, सिताफळ, बांबू, बेल, जांभुळ, करंज इत्यादी प्रजातींचा समावेश असून  सदर रोपे नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय कृषि विभागाच्या 3 रोपवाटिकांमध्ये आंबा, चिकू, पेरु, डाळींब इत्यादी सुमारे 63000 रोपे उपलब्ध आहेत.

          वृक्ष संगोपनाच्या दृष्टीने नागरिकांनी लावलेल्या वृक्षांशी त्यांना कायमस्वरुपी जोडणे आवश्यक आहे. याकरीता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना अंमलात आणली आहे. या सेनेचे सदस्य होण्यासाठी greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून सद्यस्थितीत जिल्ह्यात या सेनेचे 2.91 सदस्य आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, विविध शासकीय-अशासकीय संस्था व संघटना यांनी या उपक्रमात संस्थात्मक सहभाग देण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम पत्रकारिता पुरस्कारासाठी 15 जूनपर्यंत प्रवेशिका पाठवा

महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम
पत्रकारिता पुरस्कारासाठी 15 जूनपर्यंत प्रवेशिका पाठवा

          बीड दि. 30 :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअतंर्गत मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देऊन ही योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा,विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका गुरुवार दि.15 जून 2017 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 
          जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रु. 25 हजार, द्वितीय पुरस्कार रु. 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रु. 10 हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी 2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मूल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तभंलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, , क वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
         एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज पुरस्कार योजनेसाठी पुढे सादर करावा. वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेले असेल तर त्या संबंधिचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे सादर करावा. 
पुरस्कारासाठी गठित निवड समितीतील सदस्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल.  अधिक माहितीसाठी यासंबंधीचा गृहविभाग, महाराष्ट्र शासनाचा दि.11 एप्रिल 2008 चा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचे अवलोकन करावे.

बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, प्रशासकीय इमारत, नगर रोड, बीड-पिन 431122 (दूरध्वनी क्र. 02442-222327) यांचेकडे गुरुवार दि.15 जून 2017 पर्यंत पाठवाव्यात. 

तंबाखू : आरोग्याला घातक

तंबाखू : आरोग्याला घातक
                                          - अनिल आलुरकर
                                                जिल्हा माहिती अधिकारी,बीड

      
31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

      
          31 मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पदार्थांच्या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणून देखील अनेक ठिकाणी त्यांची विक्री खुलेआम होतांना दिसते. पोलीस अशा प्रकारच्या विक्रीवर निर्बंध जाणून घेऊन धाडी टाकतात. तसा साठा ही जप्त केला जातो. गुन्हेगारांना अटकही होते. मात्र मुळात या पदार्थांची होणारी अवैध विक्री मात्र थांबवण्यात पूर्णत: यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
          तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात.  पक्षाघात, मोतीबिंदू, नपूंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
          केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
          तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रीयेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

          व्यसनाधीनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुध्द एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

सोमवार, २९ मे, २०१७

तंबाखु नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


          बीड, दि. 29 :- दिनांक 31 मे हा जागतिक तंबाखु नकार दिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चालु वर्षी बीड शहरात 31 मे ते 7 जुन या कालावधीत तंबाखु नकार दिवस व सप्ताह जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणार आहे. यासाठी तंबाखु नियंत्रणासंबंधी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या उपक्रमामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची होळी, तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत व्यंगचित्राचे प्रदर्शन विविध स्पर्धा उदा.रांगोळी, भिंतीचित्र व निबंध स्पर्धांचे आयोजन इत्यादी जिल्ह्यातील गृह-आरोग्य-शिक्षण-कृषी इत्यादी विभागासमवेत तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन, कॅन्सर वॉरीयर संघटनेच्या सहकार्याने तंबाखु नियंत्रण कायद्याची अंमलबजावणीसाठी पोलीस विभागासमवेत बैठक, दंत शल्य चिकित्सक, नाक, कान व घसा तज्ञ यांच्या सहकार्याने मौखीक कर्करोगासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन, तंबाखुमुळे होणाऱ्या कर्करोगावर समुपदेशन व प्रबोधनात्मक व्याख्यान, जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत कार्यशाळेचे आयोजन व त्याचे समुपदेशन करुन संबंधीत आरोग्य संस्था तंबाखुमुक्त करण्याबाबत प्रवृत्त  करण्यासंबंधी मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने व सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन सहकार्य करावे व जिल्ह्यातील जनतेने तंबाखुच्या सवयीपासून दुर रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी केले आहे.
-*-*-*-*-


रविवार, २८ मे, २०१७

महाराणा प्रताप सिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


            बीड, दि. 28 :- महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी एस.एस चौरे, विलास  जोगदंड, टी.एस. आर्सुळ, जे.एस. दोडके, जी.एस. सत्वधर, एल.एस. मुळे, शेख सादिक तसेच महिला कर्मचारी एस.डी. लांडगे, टि.व्ही. नाईकवाडे, एस.व्ही.पवार, एस.एम.पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-

शुक्रवार, २६ मे, २०१७

औषध विक्रेत्यांचा 30 मे रोजी लाक्षणिक संप अन्न व औषध प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था


            बीड, दि. 26 :- मंगळवार, दिनांक 30 मे 2017 रोजी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशन यांनी  देशातील सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेते यांनी एक  दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषण केलेली आहे.
            सहाय्यक आयुक्त (औषधे) व औषध निरिक्षक अन्न व औषध प्रशासन, बीड यांनी महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन जनतेची व रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता दिनांक 30 मे 2017 रोजीचा बेकायदेशीर संप मागे घ्यावा तसेच जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांकडून जनसामान्यांच्या आरोग्यसेवेचे समाजोपयोगी  कार्य घडत आहे. अशा  प्रकारची सेवा जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य औषधी   संघटनांकडून अविरतपणे सुरु रहावे. तरी दिनांक 30 मे 2017 रोजी नियमितपणे औषधी दुकाने सुरु ठेऊन आपण आंदोनलात  सहभागी होऊ नये  जेणेकरुन जनतेची गैरसोय  होणार नाही असे  आवाहन केलेले आहे.
            संपकाळात रुग्णांची गैरसोय होऊ नये  म्हणून  अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने  बीडचे जिल्हा शल्य चिकीत्सक, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्यांच्या अधिनस्त सर्व औषधी भांडारांमध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन ठेवण्यासाठी कळविले आहे. तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन यांना देखील योग्य त्या उपाययोजना करुन ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
            याबाबत जनतेला आवाहन करण्यात येते की, जे नियमित औषधोपाचार घेत असतात त्यांनी दिनांक 30 मे 2017 पूर्वीच आवश्यक असलेल्या औषधींची खरेदी करावी. तसेच आपत्कालीन औषधाची आवश्यकता भासल्यास  नजीकच्या शासकीय / निमशासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. तसेच जनतेला किंवा रुग्णांना औषधे उपलब्ध न झाल्यास अन्न व औषध प्रशासन बीड दुरध्वनी क्रमांक 02442-229236 किंवा औषध  निरिक्षक रा.बा. डोईफोडे मो.नं. 7578908105 वर संपर्क साधावा असे बीडच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वि.द. सुलोचने यांनी केले आहे.

-*-*-*-

दारिद्रय रेषेखालील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध व्यवसायाच्या प्रशिक्षणाचे आयोजन


            बीड, दि. 26 :- ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, एस.पी. ऑफीस समोर, बार्शी रोड,  बीड यांच्यावतीने दि. 1 जून 2017 ते दि. 15 जुलै 2017 या कालावधीत कॉम्प्युटर डि.टी.पी. प्रशिक्षण आणि दिनांक 1 जून ते 30 जून 2017 या कालावधीत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. 
            प्रशिक्षणार्थ्यांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल. प्रशिक्षण पुर्णवेळ मोफत व निवासी असून राहणे, चहा, नाष्टा आणि 2 वेळा जेवण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवाराला प्रशिक्षणासोबत योग्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण तज्ञाकडून मिळेल तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन वर्ष मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार असावा.  त्याचे शिक्षण सुरु नसावे. उमेदवार किमान 8 वी उत्तीर्ण असावा. दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असावे व ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.  उमेदवाराचे वय 18 ते 45 दरम्यान असावे. प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी.  या प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे. प्रशिक्षण वर्गाचे अर्ज तालुका पंचायत समिती तसेच बीड येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर, शिवाजीनगर शाखेच्यावर येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. असे संचालक एम.पी.वाघमारे यांनी कळविले आहे.

-*-*-*-

गुरुवार, २५ मे, २०१७

बीड आकाशवाणीवरुन रविवारी मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण



          बीड, दि. 25 :- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद मन कि बात या कार्यक्रमाचा बत्तीसावा भाग रविवार दि.28 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारीत केला जाईल. त्यानंतर कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित करण्यात येईल. रात्री 8 वाजता मराठी अनुवाद पुन: प्रसारीत होईल हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी बीड अर्थात एफएम बँडच्या 102 पुर्णांक 9 दशांश मेगाहर्टसवरुन सर्व श्रोत्यांना ऐकता येतील. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रीया airmankibaat@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात. असे बीड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.

दुय्यम निरीक्षक परीक्षा 13 उपकेंद्रावर; केंद्र परिसरात 144 कलम लागू


                   
          बीड, दि. 25 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पुर्व) परीक्षा-2017 बीड जिल्हा केंद्रावर रविवार दि.28 मे 2017 रोजी एकुण 4 हजार 296 उमेदवारांची परीक्षा घेण्याचे निश्चित आहे. त्यानूसार 13 उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राचे परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.

          परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख,  पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल. भगवान विद्यालय, चंपावती माध्यमिक विद्यालय, संस्कार विद्यालय, मिल्लीया कला व विज्ञान (मुलांचे) महाविद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कुल, शिवाजी विद्यालय, बलभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्नीक, मिल्लीया गर्ल्स हायस्कुल, स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय, डॉ.बापुजी साळुंके हायस्कुल, श्री.छत्रपती शाहु माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा पेपर संपेपर्यंत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे. असे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.

मंगळवार, २३ मे, २०१७

मयत इनामदार काझी रियाजोद्दीन यांच्या नावे इनामी जमीनीचा जाहिरनामा


          बीड, दि. 23 :- मयत इनामदार काझी रियाजोद्दीन पिता काझी मजबोद्दीन अर्जदार काझी मोहम्मद काझी पि.रियाजोद्दीन रा.धोंडराई ता.गेवराई  जि.बीड यांची फाईल क्र.2007/इनाम/कावि-317 अन्वये सर्व जनता मौ.धोंडराई ता.गेवराई जि.बीड यांना जाहिरनामाद्वारे कळविण्यात येत असून मज्जीत काझीगीरी मौ.धोंडराई ता.गेवराई जि.बीड इनामदार काझी रियाजोद्दीन पिता काझी मजबोद्दीन हे दि.04/10/2017 रोजी मयत झाले आहेत. त्यांच्या नावे स.नं.ग.नं. 141/3, 87/3, 63/1, 167, 168/2 येथे इनामी जमीन आहे.

          मयताचे वारस काझी मोहम्मद काझी पि.रियाजोद्दीन वय 70 वर्ष (मुलगा), काझी अदिल पि.रियाजोद्दीन वय 60 (मुलगा), काझी अमिल पि.रियाजोद्दीन वय 58 (मुलगा), काझी रब्बानी बेगम सरकारोद्दीन वय 80 (मुलगी), काझी सरवरी बेगम सर फरोद्दीन वय 55  (मुलगी), शेख अपवरी बेगम अजरोद्दीन वय 50(मुलगी) यांनी उपविभागीय कार्यालय, बीड येथे दि.19 ऑक्टोबर 2007 रोजी अर्ज दाखल करुन मयताची विरासत अर्जदारांच्या नावे होण्याकरीता रुजु झाले आहेत. दिलेल्या अर्जान्वये उपरोक्त विरासत कार्यवाही करीता जाहिरनामा प्रसिध्दीसाठी दिलेला आहे. जर कोणास काही आक्षेप किंवा हितसंबंध असल्यास जाहिरनामा प्रसिध्दीपासून 30 दिवसाच्या आत लेखी पुराव्यासह स्वत: किंवा विधीज्ञमार्फत बीड उपविभागीय कार्यालयात उपस्थित रहावे. मुदत संपल्यानंतर आलेल्या आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि प्राप्त झालेल्या कागदपत्राआधारे अर्जदाराच्या नावे विरासत मंजूर करण्यात येईल. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

तक्रार निवारणासाठी पोलीस दलाचा जनसंपर्क कार्यक्रम


          बीड, दि. 23 :- पोलीस ठाणे येथे येणारे सर्व जनतेच्या तक्रार निवारणाकरीता व त्यांच्याशी संपर्क साधून अडचणी समजावून घेण्याकरीता दि.27 मे 2017 पासून प्रत्येक शनिवारी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे येथे उपस्थित राहून जनसंपर्क साधणार आहेत.

          या जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत प्रलंबित तक्रारी अर्ज प्रत्यक्ष तक्रारदाराशी समक्ष निवारण करतील. स्थानिक नागरिकांना पोलीस ठाणे येथे आमंत्रित करुन त्याच्या येणाऱ्या अडचणी समजून घेतील व उपाययोजना तयार करतील. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी हे कोणत्या पोलीस ठाण्यास भेट देणार आहेत याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे स्थानिक पातळीवर नागरिक, पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर दर गुरुवारी व शुक्रवारी प्रसारीत करतील. कार्यक्रमात प्रलंबित तक्रारी कोणत्या आहेत याबाबत खुलासा असेल तसेच नागरिकांच्या बैठकीची योजना असेल. तक्रार निवारण बैठक जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादीबाबत शक्य होत नसेल तर त्याबाबत गुरुवारी व शुक्रवारी स्थानिक नागरिकांना पत्रव्यवहाराने कळविण्यात येईल. असे बीडचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात 37 (1) (3) कलमान्वये मनाई आदेश लागू



          बीड, दि. 23 :-जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रकांत सुर्यवंशी, अपर जिल्हा दंडाधिकारी, बीड यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश दि. 22 मे रोजीच्या रात्रीपासून ते दि.5 जुन 2017 च्या रात्रीपर्यंत लागू राहील. या काळात शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील असे कोणतेही शस्त्र, वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

शनिवार, २० मे, २०१७

पंचायत समिती पाटोदा येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना




बीड, दि. 20 :-  बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीनूसार शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण कृषि निविष्ठा (बियाणे/खते/किटकनाशके) योग्य दर्जाची, रास्त भावात व वेळेवर मिळण्यासाठी तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, पाटोदा येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा कक्ष दि.15 मे ते 15 ऑगस्ट 2017 पर्यंत कार्यरत राहील. कक्षातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणासंबंधी तक्रारींची नोंद घेवून तात्काळ निवारण करतील. असे पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

पंचायत समिती बीड येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना




बीड, दि. 20 :-  बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीनूसार शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण कृषि निविष्ठा (बियाणे/खते/किटकनाशके) योग्य दर्जाची, रास्त भावात व वेळेवर मिळण्यासाठी तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती, बीड येथे निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा कक्ष दि.15 मे ते 15 ऑगस्ट 2017 पर्यंत कार्यरत राहील. कक्षातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणासंबंधी तक्रारींची नोंद घेवून तात्काळ निवारण करतील. असे बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली



बीड, दि. 20 :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनि‍मित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. यावेळी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, गणेश निऱ्हाळी, अपर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शुक्रवार, १९ मे, २०१७

राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक
परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू
                   
          बीड, दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पूर्व) परीक्षा 2017 ही रविवार दि.28 मे 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकुण 13 उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकुण 4 हजार 296 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

          आयोगाच्या सुचनेनूसार परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्कुलेटर व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घूवन जाता येणार नाही तसेच आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहिल. सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर 10 वाजेपूर्वी उपस्थित राहणेबाबत सुचित करण्यात येत आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करावेत

त्रैमासिक विवरणपत्रे
ऑनलाईन भरुन सादर करावेत
                   

          बीड, दि. 19 :- सेवायोजन कार्यालये अधिनियम 1959 कलम 5 (1)(2) आणि नियमावली 1960 नियम क्र.6 अन्वये बीड जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व ज्या खाजगी आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांनी दि.31 मार्च 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर.-1 दि.31 मे 2017 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरुन रिसिप्टची प्रिंट जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह, नगर रोड, बीड येथे सादर करावी. विवरणपत्र भरुन प्रिंट सादर न करणाऱ्या आस्थापनाविरुध्द अधिनियम 1959 नियम 1960 व कलम 6 अन्वये दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून अशा आस्थापनांनी त्यांचे ई.आर.-1 ऑनलाईन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड येथे मुदतीत सादर करावेत अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे बीड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करावेत



          बीड, दि. 19 :- सेवायोजन कार्यालये अधिनियम 1959 कलम 5 (1)(2) आणि नियमावली 1960 नियम क्र.6 अन्वये बीड जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व ज्या खाजगी आस्थापनेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांनी दि.31 मार्च 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर.-1 दि.31 मे 2017 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरुन रिसिप्टची प्रिंट जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह, नगर रोड, बीड येथे सादर करावी. विवरणपत्र भरुन प्रिंट सादर न करणाऱ्या आस्थापनाविरुध्द अधिनियम 1959 नियम 1960 व कलम 6 अन्वये दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असून अशा आस्थापनांनी त्यांचे ई.आर.-1 ऑनलाईन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड येथे मुदतीत सादर करावेत अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे बीड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू


          बीड, दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पूर्व) परीक्षा 2017 ही रविवार दि.28 मे 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकुण 13 उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकुण 4 हजार 296 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

          आयोगाच्या सुचनेनूसार परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्कुलेटर व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घूवन जाता येणार नाही तसेच आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहिल. सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर 10 वाजेपूर्वी उपस्थित राहणेबाबत सुचित करण्यात येत आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

विभागीय अधिस्विकृती समितीची बैठक लवकरच


                   
          बीड, दि. 19 :- औरंगाबाद विभागीय अधिस्विकृती समितीची बैठक लवकरच समितीचे अध्यक्ष, श्री. वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील संचालक माहिती कार्यालयात ही बैठक होणार आहे.

या बैठकीत औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील अधिस्विकृती पत्रिकासाठीच्या अर्जावर विचारविनीमय होणार असून ज्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करावयाचा आहे. त्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर जिल्हा माहिती कार्यालय, बीड येथे दाखल करावेत. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.

गुरुवार, १८ मे, २०१७

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज करावेत


                   
          बीड, दि. 18 :- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या इयत्ता पहिली व दुसरीसाठीच्या प्रवेशास इच्छुक मुला-मुलींनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करावेत.

          अर्जदाराने अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्रयरेषेचा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पनन मर्यादा 1 लाख असून सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे. अर्जासोबत पालकांनी संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे. या योजनेत अदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा घटस्फोटीत, निराधार, व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असून भरलेले अर्ज दि.31 मे 2017 पर्यंत जमा करावेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार असून पालकांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ओरियन्स टॉवर, आझाद चौकाजवळ औरंगाबाद येथे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. असे औरंगाबादचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

अपंग व्यक्ती हक्क अधिनियमाबाबत 20 मे रोजी बीड येथे कार्यशाळा


                   
          बीड, दि. 18 :-पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायत तसेच सामान्य रुग्णालयांच्या स्तरावर अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 बाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने बीड जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत शनिवार दि.20 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

           अपंग व्यक्ती हक्क अधिनियम सन 2016 हा नव्याने कायदा अंमलात आला असून हा कायदा तयार करतांना युनायटेड नेशन कन्वेंशन फॉर पर्सन विथ डिसॲबीलिटी या जाहिरनाम्यातील तरतूदी तसेच देशातील तज्ञ व्यक्ती, अपंग कल्याणार्थ कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी, विविध थेरपिष्ट,तंत्रज्ञान व कायद्यातील तज्ञ व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला होता. या कायद्यातील तरतूदी नवीन व अपंग व्यक्तींच्या हक्काबाबतीत असल्याने यास राज्यभर व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देणे अत्यंत आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, सर्व शिक्षा अभियानअंतर्गत काम करणारे साधन व्यक्ती, अपंग शाळाचे मुख्याध्यापक, कर्मचारी व संस्थाचालक तसेच अपंगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे. कार्यशाळेस मुंबई उच्च न्यायालयातील विधीतज्ञ उदय वारुंजीकर मार्गदर्शन करणार आहेत.  असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

खरीप हंगाम 2017-18 कृषी निविष्ठाधारकांनी कृषी निविष्ठा विक्रीबाबत शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी - निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी




          बीड, दि. 18 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणारा खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने  जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे आणि किटकनाशके यांचा योग्य दराने व प्रमाणात पुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांची कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केली.
            कृषी विभाग आणि जिल्हा परिषद बीड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी बोलत होते.
            यावेळी बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. निला, औरंगाबाद येथील तंत्र अधिकारी दिलीप वडकुते, वजने व मापे विभागाचे श्री.दराडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे  आणि भारतातील इतर राज्यांसह महाराष्ट्रासाठीही खरीप हंगाम हा महत्वाचा हंगाम समजला जातो. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि किटकनाशके वेळेवर व योग्य प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशानाने योग्य नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कार्यवाही करावी. कृषी निविष्ठा  विक्रीच्या नियमांचे आणि कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे. कृषी निविष्ठा विक्रीबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगुन जिल्हयात 1 जून पासून खत विक्रीसाठी ई-पॉस मशीनचा वापर केला  जाणार असल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यात यावे असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
            यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि किटकनाशके यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत केला जातो. त्याचे योग्य  नियोजन केले असून जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठा विक्रीबाबत सहकार्य करुन हा खरीप हंगाम यशस्वी करावा असे आवाहन केले.
            या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना तंत्र अधिकारी वडकुते म्हणाले की, कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या विक्रीचे परवाने नुतनीकरण करुन घ्यावे. साठा आणि भावफलक दुकानाच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसेल असा लावावा. खरेदीबाबतची देयके व अन्य कागदपत्रे जपून ठेवावीत. साठा नोंदवही दररोजच्या रोज अद्ययावत करावी व तसा अहवाल कृषी विभागास नियमित सादर करावा. तसेच मुदतबाह्य झालेली बियाणे, खते आणि किटकनाशके तसा शेरा लिहून स्वतंत्रपणे ठेवावीत त्याची कोणत्याही परिस्थिती विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून श्री. वडकुते यांनी यावेळी बियाणे अधिनियम, खते (नियंत्रण) अधिनियम आणि किटकनाशके अधिनियम याबाबत सविस्त मार्गदर्शन केले.
              माजलगावचे कृषी अधिकारी एस.जी. हजारे यांनी थेट लाभ हस्तांतरण (DBT), इ-पॉस मशीनद्वारे खत विक्रीची प्रक्रिया, कापुस पुरवठा-वितरण-विक्री-किंमत निश्चितीकरण अधिनियम याबाबत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. निला यांनीही आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, कृषी निविष्ठाधारकांनी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बि-बियाणे, खते व किटकनाशकांचा मागणीप्रमाणे पूरवठा केल्यास त्या शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही.असेही त्यांनी यावेळी सांगितले. कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष तोतला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

            प्रारंभी कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी त्यांच्या प्रास्ताविकात प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाचा हेतू विषद करुन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी अधिकारी एस.डी. बनसोडे यांनी केले तर आभार कृषी अधिकारी अनिरुध्द सानप यांनी मानले. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                                       

शुक्रवार, १२ मे, २०१७

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी - प्र.जिल्हाधिकारी राम गगराणी


बीड, दि. 12:- पावसाळयाच्या काळात नैसर्गिक आपत्ती उदभवल्यास त्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा नियोजनबध्द आराखडा तयार करावा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी संभाव्य जिवीत व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश प्र.जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी दिले.
        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मान्सुन 2017 पूर्वतयारी आयोजित बैठकीत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, शिवकुमार स्वामी, विकास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र वाघ  यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना प्र. जिल्हाधिकारी राम गगराणी म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हा तसेच तालुकास्तरीय आराखडा तात्काळ तयार करावा. या आराखडयामध्ये आपत्ती निवारणासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्री, बचावाची उपकरणे यासारख्या सर्व महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात यावा. आपत्ती निवाणाच्या कामाशी संबंधित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तसेच महत्वाच्या यंत्रणांचे संपर्क क्रमांकाची माहिती अद्यावत करुण्याची कार्यवाही करावी. संपर्कासाठी तयार करण्यात दुरध्वनी क्रमांक जिल्हयातील प्रत्येक गावांच्या नागरिकांना तसेच  तलाठी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात यावे. जेणेकरुन अचानक उदभवलेल्या आपत्तीच्या प्रसंगी संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची तात्काळ संपर्क साधाला जाईल. आपत्ती निवारणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करुन तेथे प्रशिक्षित आणि जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात अशा सूचनाही प्र.जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी यावेळी दिल्या.
          वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटून होणारी जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विद्युत विभागाने वीज पुरवठ्यासंदर्भातील दुरुस्त्या पावसाळापूर्वी पूर्ण कराव्यात. खराब झालेले विजेचे खांब किंवा लोंबकाळणाऱ्या तारा याची दुरुस्ती तात्काह हाती घ्यावी. नादुरुस्त झालेल्या गाव तलाव व पाझर तलावाची जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत पहाणी करुन तपासणी करण्यात यावी व त्याची दुरुस्ती पावसाळयापूर्वी करण्याची कार्यवाही करण्याच्याही सूचना प्र. जिल्हाधिकारी गगराणी यांनी यावेळी दिल्या. जिल्हयातील महत्वाच्या धरण व प्रकल्पांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दुरध्वनी यंत्रणा व बिनतारी संदेश यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुन घ्यावी. असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपत्ती निवारणाशी संबंधित असलेल्या विद्युत, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा, नगर परिषद आदी विभागाच्या आपत्ती निवारण कामांचा आढवा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिर्के यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                                           

गुरुवार, ११ मे, २०१७

बीएचआर सोसायटीच्या माजलगाव शाखेतील अपहाराच्या सीआयडी चौकशीबाबत आवाहन



            बीड, दि. 11:- भाईचंद हिराचंद रायसोनी, मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि.जळगावच्या माजलगाव येथील शाखेमध्ये शेख तौफिक अब्दुल सत्तार रा.जुना बाजार रोड, माजलगाव यांनी व इतर 4 लोकांनी वेगवेगळ्या तारखेस ठेव स्वरुपात ठेवलेल्या एकुण 87, 50000 रुपयाचा यातील आरोपीतांनी संगनमत करुन ठेवीदारांची वेळेत परतफेड न करता त्यांचा विश्वासघात करुन अपहार केला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी फिर्यादी शेख तौफिक अब्दुल सत्तार यांनी दि.7 फेब्रुवारी 2015 रोजी पोलीस ठाणे माजलगाव जि.बीड  येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 1-14/15 कलम 406, 409, 34 भादवि सह 3 एम.पी.आय.डी. ॲक्ट प्रमाणे गुन्हा करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास हा गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद यांच्यावतीने पोलीस निरीक्षक श्रीमती पी.टी.यादव या करीत आहेत.

          तरी माजलगाव ग्रामीण भागातील किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील लोकांनी भाईचंद हिराचंद रायसोनी, मल्टीस्टेट को.ऑप,क्रे.सोसायटी माजलगाव शाखा बीड यामध्ये पैसे गुंतविले असतील व ज्या लोकांनी अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही अशा लोकांनी गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस भवन बिल्डींग स्नेहनगर, औरंगाबाद येथे फोनवरुन मो.नं.9923461277/9421564321 संपर्क करावा. असे पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

पाटोदा येथील अनुसूचित जातीच्या मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश सुरु




            बीड, दि. 11:- अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा पाटोदा जि.बीड येथे दि.2 मे 2017 पासून शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी इयत्ता 6 वीच्या वर्गाकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग व अपंग प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश देणे सुरु असून या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. निवास, नाष्टा, भोजन तसेच नाईट ड्रेस, गणवेश, शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेचे साहित्य मोफत पुरविण्यात येते. तरी इच्छुक पालकांनी शालेय प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. असे मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, पाटोदा जि.बीड यांनी कळविले आहे.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 10 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि.11मे 2017 रोजी परळी येथे राखीव. दुपारी 4 वाजता परळी येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

एमएचटी-सीईटी परीक्षा 29 उपकेंद्रावर; केंद्र परिसरात 144 कलम लागू


                   
          बीड, दि. 10 :- एमएचटी सीईटी-2017 नूसार बीड जिल्हा केंद्रावर दि.11 मे 2017 रोजी एकुण 8 हजार 285 उमेदवारांची परीक्षा घेण्याचे निश्चित आहे. त्यानूसार 29 उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राचे परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.

          परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख,  पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल. यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ पॉलीटेक्नीक बार्शी रोड, एमएसपी मंडळाचे लॉ कॉलेज बार्शी रोड, आदित्य इंजिनियरींग कॉलेज तेलगाव नाका, आदित्या पॉलीटेक्नीक महाविद्यालय, आदित्य ॲग्रीकल्चरल कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, गीता कन्या प्रशाला, स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय, संस्कार विद्यालय नवीन इमारत, मिल्लीया गर्ल्स हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज, मिल्लीया मुलांचे माध्यमिक विद्यालय वरिष्ट व कनिष्ठ महाविद्यालय,बलभीम महाविद्यालय, डॉ.बापुजी साळुंके हायस्कुल, सौ.केएसके महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, शिवाजी विद्यालय, सरस्वती विद्यालय, भगवान विद्यालय, इंदिरा गांधी मेमोरियल उर्दु हायस्कुल, आदर्श माध्यमिक विद्यालय, श्री छत्रपती शाहु माध्यमिक विद्यालय, चंपावती इंग्लिश स्कुल, सेंट ॲन्स हायस्कुल, श्री बंकट स्वामी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चंपावती माध्यमिक विद्यालय या परिक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्ये इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.

सोमवार, ८ मे, २०१७

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 8 :- राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          बुधवार दि.10 मे 2017 रोजी सकाळी 6.25 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने बीड जिल्ह्याकडे प्रयाण. सकाळी 8  वाजता गेवराई तालुक्यातील ढोकवडगांव व बीड तालुक्यातील लोळसगांव येथील जलयुक्त शिवार/ जलसंधारण कामांची तसेच जिल्ह्यातील इतर काही कामांची प्रत्यक्ष पाहणी त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, बीड येथे राखीव. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे 2015-16, 2016-17, 2017-18 मधील बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत समावेश असलेल्या गावांतील कामांचा आढावा त्याचप्रमाणे जलसंधारण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा. दुपारी 4.30 वाजता पत्रकार  परिषद (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,बीड). सायंकाळी सोईनूसार शासकीय मोटारीने गेवराई जि.बीडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह गेवराई येथे आगमन व मुक्काम.

          गुरुवार दि.11 मे 2017 रोजी सकाळी 7 वाजता शासकीय मोटारीने अंबड तालुका जि.जालनाकडे प्रयाण करतील.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 8 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          मंगळवार दि.9 मे 2017 रोजी औरंगाबाद येथे सायंकाळी 5.05 वाजता आगमन व वाहनाने बीडकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता विविध शासकीय बैठकांना उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, बीड). रात्री 8.30 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण. रात्री 10 वाजता परळी निवासस्थानी आगमन व मुक्काम.

          बुधवार दि.10 मे 2017 रोजी परळी येथे राखीव. रात्री 11 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

शनिवार, ६ मे, २०१७

बीडच्या कार्यशाळेत दिले संवेदनशीलतेचे धडे गावे समृध्द करण्यासाठी सर्वांनी मोहिम स्वरुपात योजना राबवाव्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर





बीड दि.6 :- जिल्ह्यातील शेती-शेतकरी आणि गावे समृध्द करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विकासात्मक योजना खुप आहेत. गावपातळीपासूनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजना मोहिम स्वरुपात राबविल्या पाहिजेत असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
मराठवाडा विकासात्मक  विविध कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस उपस्थित असलेल्या गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतच्या  महसूल, कृषी, ग्रामविकास, जलसंधारण आणि सिंचन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सहाय्यक आयुक्त श्याम पटवारी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र व  राज्य शासनाच्या विविध विकासात्मक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त डॉ. भापकर  म्हणाले की, आपल्या महाराष्ट्र राज्याने संपुर्ण देशाला दिलेल्या नरेगा योजनेच्या अंमलबजावणीत इतर राज्यांच्या तुलनेत आपण मागे पडलो आहोत ही चिंताजनक बाब  असून नरेगासारख्या महत्वाकांक्षी योजनेतून आपण आपले गावच नाही तर तालुका- जिल्हा आणि राज्यसुध्दा सुजलाम सुफलाम करु शकतो. एवढी ताकद या योजनेमध्ये आहे. नरेगामधून शेतकऱ्यांना  काम आणि रोजगार देण्याबरोबरच आर्थिक पाठबळही मिळते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे गावच्या विकासाचे काम होते. ही भावना मुळात आपल्या सर्वांमध्ये रुजली तर गावेच्या गावे समृध्द होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. रोजगार  उपलब्ध करुन देवून उन्नती साधण्याचे काम गावपातळीपासूनच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतले तर विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत येईल. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. भापकर यांनी दिड वर्षांच्या कालावधीत मराठवाड्यात नरेगाअंतर्गत 10 हजार कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
मनरेगा सप्ताहाच्या आयोजनाचा परामर्श घेत डॉ. भापकर म्हणाले की, ग्राम संपर्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या गावाच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी महत्वपूर्ण दुवा म्हणुन काम करावे. नव्याने गावबांधणीच्या कामासाठी नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घ्यावीत. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोठे समाधान प्राप्त करुन घ्यावे. मनरेगाच्या माध्यमातून आपण 80 टक्के लोकांच्या घरापर्यंत पोहचवून विकास घडवून आणू शकतो. उर्वरित 20 टक्के लोकांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे सारख्या योजना आहेत. संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेची पूर्नबांधणी मनरेगाच्या मदतीने करण्याची गरज आहे असे  सांगून डॉ. भापकर यांनी संपूर्ण मराठवाडा 2 ऑक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला असल्याचे  सांगितले. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर सर्व गावपातळीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करावे अशी सूचनाही केली.
 समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या योजनेचा आढावा घेऊन जिल्ह्यात अधिक कामांची अपेक्षा असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे अशी सुचना डॉ. भापकर यांनी केली. मागेल त्याला शेततळे ही योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी कृषी विभागाने  पुढाकार घ्यावा. 30 दिवसात दररोज एक कृषी सहाय्यक एक शेततळे  याप्रमाणे काम पूर्ण करतील अशी सुचना करुन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश डॉ. भापकर यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेऊन डॉ. भापकर म्हणाले की, सन 2016-17 मधील निवडलेल्या 256 गावांपैकी 5 गावात एकही काम सुरु झालेले नाही. कामे पूर्ण झालेल्या गावांची संख्या फक्त 24 आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून वेगाने कामाला लागावे. या अपूर्ण कामांची तसेच वर्ष 2017-18 मधील 50 टक्के  तरी  कामांची पूर्तता येत्या पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करावी असे सांगून डॉ. भापकर यांनी गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धरण व तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी सूचना केली.
मागेल त्याला शेततळे या योजनेतून निर्माण झालेल्या पाणी साठ्याचा उपयोग मत्स्यउत्पादनासाठी  करण्याची अभिनव योजना असून जिल्ह्यातील 2 हजार शेतकरी पुढे येतील याचे नियोजन करावे असे सांगून डॉ. भापकर म्हणाले की, शेतीला जोडधंदा देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करण्याचे प्रयत्न असावेत. यासाठी रेशीम उत्पादनासारखा फायदेशीर उद्योग नाही हे शेतकऱ्यांना पटवून द्यावे. तुतीची  लागवड आणि रेशीम  व्यवसाय यासाठी प्रोत्साहित करावे. घरबसल्या 30 हजार रुपये प्रतिमाह उत्पन्न देणारी ही योजना आहे असेही ते म्हणाले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून त्या दिशेने वडवणी तालुक्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त झाली. यापुढे इतर सर्व तालुक्यांसाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन करुन डॉ. भापकर म्हणाले की, आरोग्याचा पाया असलेल्या स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. स्वच्छता आपल्या घर- गावापासून सुरु केली तर संपूर्ण जिल्हा स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. यावेळी त्यांनी कर्मचारी कल्याण योजना, इ-पॉस मशिन वाटप, घरकुल योजना, सातबारा संगणकीकरण आदि विषयांचा आढावा घेत कर्मचाऱ्यांशी दुहेरी संवाद साधत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रारंभी दिपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उदघाटन झाले प्रास्ताविकात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, अप्पर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त पारस बोथरा, रेशीम विभागाचे  सहाय्यक संचालक हाके, यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनीही जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात आपल्या भाषणात माहिती देवून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त केल्याबद्दल वडवणी पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व पदाधिकारी यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सभापती संतोष हांगे, सभापती राजेसाहेब देशमुख तसेच उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आदिंनी प्रतिक्रियात्मक मनोगत मांडले. शेवटी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी सर्वांचे आभार मानले.

शुक्रवार, ५ मे, २०१७

वस्तु व सेवा कर विषयक कार्यशाळा संपन्न जीएसटी करप्रणाली म्हणजे उत्पादक आणि ग्राहकांचा फायदा सहआयुक्त श्री. अशोक कुमार




बीड दि.5 :- वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटी करप्रणाली 1 जुलै पासून देशभरात लागू होत असून ही करप्रणाली भारतातील अप्रत्यक्ष कराच्या क्षेत्रातील सुधारणांचे लक्षणीय पाऊल असून यामुळे उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा फायदा होणार आहे. असे प्रतिपादन औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवाकर विभागाचे सहआयुक्त श्री. अशोक कुमार यांनी केले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे जीएसटी करप्रणाली विषयी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जालना येथील व्हॅट विभागाचे उपायुक्त एस.के. सोलंके, बीडचे सहाय्यक आयुक्त एस.टी. बोरकर तसेच नांदेडचे सहाय्यक आयुक्त धीरजकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वस्तु व सेवा कर म्हणजे काय आहे याबद्दल सविस्तर माहिती देताना अशोक कुमार पुढे म्हणाले की, ही करप्रणाली यापुर्वीच्या अनेक प्रकारच्या अनेक पातळीवर भरावयाच्या करांच्या जागेवर आली आहे. ही करप्रणाली एकाच छत्राखाली एकाच वस्तु व सेवेवर एकाच प्रकारे कर भरण्याची महत्वाची सुविधा देणार असल्यामुळे उत्पादक घटकांना मोठी सुविधा होणार आहे. आपल्या व्यवसायाची विहित कालवधीत माहिती ऑनलाईन भरणे आता अधिक सोपे, सरळ आणि फायदेशीर ठरणार आहे. यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि उत्पादकांनी जीएसटी बद्दल भिती बाळगु नये. ही अधिक पारदर्शक व प्रामाणिक राहण्यासाठी मदत करणारी प्रणाली आहे. ही करप्रणाली तिच्या पारदर्शकतेमुळे प्रशासकीय अंमलबजावणीसही सोपी असेल असेही सहआयुक्त अशोक कुमार म्हणाले.
जालन्याचे सहाय्यक आयुक्त सोळंके यांनही मनोगत व्यक्त केले. जीएसटी करप्रणाली सर्व ऑनलाईन सेवेद्वारे उपलब्ध असल्यामुळे अधिकाधिक सोप्या पध्दतीने आणि अचुकपणे करदात्यांना कर भरणे शक्य होणार आहे असे सांगून सोळंके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्क आणि सेवा कर विभागाचे अधिक्षक दिपक गुप्ता यांनी सादरीकरणाच्या सहाय्याने जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले. जीएसटी मधील तरतुदी, कर निर्धारण, कर भरण्याची पध्दत, ऑनलाईन विविरणपत्रे, नोंदणी तसेच विविध संकेतस्थळांचे पत्ते इत्यादी माहिती सांगून उपस्थित सर्व उत्पादक, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आणि कर सल्लागार, कर-आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकासमाधान केले. शहरातील व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरावर कार्यशाळा
बीड जिल्ह्यातील तालुक्याच्या स्तरावरही विक्रीकर विभागाच्यावतीने वस्तु व सेवा कर विषयक कार्यशाळांचे आयोजन करुन व्यावसायिक  व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  6  मे रोजी धारुर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात सकाळी 11 वाजता आणि केज येथे अनिल भोजनालयाचे सभागृह येथे दुपारी  3 वाजता, 7 मे रोजी गेवराईच्या सिंधी भवनात सकाळी 11 वाजता  तर माजलगावच्या राजस्थानी मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता कार्यशाळा होणार आहे. तसेच 8 मे रोजी सकाळी 11 वाजता आष्टी येथील हॉटेल यश येथे तर दुपारी 3 वाजता  पाटोदा येथील रेणुका माता मंदीर हॉलमध्ये कार्यशाळा होणार आहे. यानंतर 20 मे रोजी सकाळी 11  वाजता अंबाजोगाईच्या नगर परिषद नाट्यगृहात आणि दुपारी 3 वाजता परळी येथील नगर परिषद नाट्यगृहात  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊन व्यापाऱ्यांनी जीएसटी बद्दल माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

-*-*-*-

विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथे शनिवारी कार्यशाळेचे आयोजन


                बीड दि.5 :- विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.6 मे 2017 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण नाटयगृह, बीड येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामाबरोबरच राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रम व योजनांचे दि.31 मे 2017 अखेर पर्यंत नियोजन करुन प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रशासकीय विभागाच्या कामकाजाचा आढावाही यावेळी घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,उप विभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार,गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी,सर्व नगरपालिका/नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी असे विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे सहाय्यक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-*-*-*-