शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८






पालकमंत्री पंकजा मुंढे
यांनी घेतला विविध विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा
            बीड, दि. 28 :- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी परळी येथील चेमरी विश्राम गृहामध्ये आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शिक्षणविभाग, रुरबण योजना, सार्वजनिक बाधकांम विभाग आणि गृह या पाच विभागाची बैठक घेऊन प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करुन बीड जिल्हयाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावे अशा सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
            या बैठकीस जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा कृषी अधिकारी श्री. चपळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  धनराज निला, कार्यकारी अभियंता श्री. सानप हे उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी राष्ट्रीय आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्राचे करण्यात येणारे बांधकाम पुर्ण करुन इमारतीचे उद्याटन करण्यास सज्ज ठेवावे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, मोतीबिंदू मुक्त जिल्हा, कायाकल्प योजना, मातृवंदन योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, गोवर रुबेला लसिकरण, महावितरण विभागाने  दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत किती कुंटुबांना याचा लाभ दिला, सबस्टेशन ची किती कामे केली, ग्रामीण व शहरी भागाची उपकेंद्राची पूर्ण झालेली व अपुर्ण कामे याची माहिती घेतली.
            शासनामार्फत राबविण्यात येणारे शामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशनतर्फ साचलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करुन गावे स्वच्छ करावीत तसेच शाळा व्यवस्थापन, शाळा कायापालट, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास रंगरंगोटी करुन शाळेतील भिंतीवर सुविचार लिहून शाळा आकर्षक कशा दिसतील या दृष्टीने नियोजन करुन 26 जानेवारी 2018 पर्येंत कमीत कमी  100 शाळा उद्याटनासाठी तयार ठेवाव्यात. राष्ट्रीय व राज्य महामार्गांची कामे उत्तम दर्जाची व वेळेत पूर्ण करुन घ्यावीत.
            जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अभाधित राहण्यासाठी व शांततेच्या दृष्टीने  कोण कोणत्या उपाययोजना केल्या गेल्यात. विविध गुन्हयातील गुन्हेगांराची संख्या, महिला अत्याचांराची संख्या, त्यांच्या सुरक्षतेसाठी काय काळजी घेतल्या जाते, गुन्हेगारीला व महिलावरील अत्याचाराला किती प्रमाणात आळा बसला ही सर्व माहिती  श्रीमती पंकजा मुंढे यांनी सखोल व प्रात्याक्षिका द्वारे जाणून घेतली  व जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करुन कोणत्याच विभागाला निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. अधिकाऱ्यांनी योग्य अंमलबजावनी करुन कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे असेही पालकमंत्री यांनी  याबैठकी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
            जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू नये यासाठी जिथे पाणीसाठा उपलब्ध असेल तेथून  टंचाई असलेल्या ग्रामीण भागासाठी  पाण्याचा पुरवठा करावा.  जनावरांना चारा कमी पडू देऊ नये, चाऱ्यांची टंचाई अधिक भासत असेल तर जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात, याकामात कुचराई करु नये अशा सूचना  पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंढे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पाच विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा पालकमंत्री यांच्यासमोर सादर करुन पाणी व चारा टंचाई यावर शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाई भासू दिली जाणार नाही असे सांगितले.
            याबैठकीस विविध विभागाचे संबधित अधिकारी ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*-*-*-*-*-*

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८


  विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी
                           प्रत्याक्षिकाव्दारे जाणून घेतली  इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती.
            बीड दि.25 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकीत वापरण्यात येणारे नविन M-3 प्रकारच्या  मतदार यत्रांचे (इव्हीएम व व्हीव्हीपॅट) मशीनची प्रत्याक्षिकाव्दारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी माहिती जाणून घेतली.
             विश्रामगृह येथे दिनांक 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता निवडणूक आढावा बैठकीत  नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनव्दारे प्रत्येक्ष मतदान करुन त्याविषयी सखोल माहिती जाणून घेतली   व या मशीनवर कसे मतदान करायचे हे मतदारांना समजले पाहिजे त्यासाठी मतदारामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही  औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी यावेळी निवडणूक संबधित उपस्थित अधिका-यांना दिल्या. 
             भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.प्रविणकुमार धरमकर यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजनी करुन दाखविली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठ्ठी सदरील मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे असे श्री धरमकर यांनी यावेळी सांगितले.
              या कार्यक्रमास, अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी श्री.महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री.प्रविण धरमकर,निवडणूकीच्या संबधित अधिकारी उपस्थित होते
             इव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदार केंद्रावर प्रात्याक्षिका द्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
            तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वानांच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे काही अडचण येणार नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले. प्रात्यकशीका दरम्यान मशीन मध्ये मतपत्रीकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतीक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार  यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.   
*-*-*-*-*-*-*















गुरुवार, २० डिसेंबर, २०१८






माननिय.प्रमुख.जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती.प्राची कुलकर्णी मॅडम
यांच्या हस्ते इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिकाचा शुभारंभ..
            बीड दि.20 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकीत वापरण्यात येणारे नविन M-3 प्रकारच्या  मतदार यत्रांचे (इव्हीएम व व्हीव्हीपॅट) प्रात्यशिक कार्यक्रमाचा मा.जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्रीमती.प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या सभागृहामध्ये शुभारंभ झाला.
             यावेळी बोलताना माननिय.प्रमुख.जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती.प्राची कुलकर्णी म्हणाल्या की, काळानुसार नवनवीन क्षेत्रात क्रांती होत आहे तसेच नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनेही आता मतदानाच्या क्षेत्रात ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. देश प्रगती पथावर जाण्याचे हे एक माध्यम आहे.    
             भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.एम. डी. सिंह (भाप्रसे)यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित मा.न्यायधिश महोदय आणि अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मशीन वापराबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे दिली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठ्ठी सदरील मशीनच्या बॉक्स मध्ये संकलित होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
             या कार्यक्रमास, मा.जिल्हा प्रमुख न्यायाधीश-क्र.1 बीड श्री.बी.व्ही. वाघ साहेब , जिल्हा न्यायालयातील सर्व सन्मानीय न्यायाधीश , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे भाप्रसे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.चंद्रकांत सुर्यवंशी , उपविभागीय अधिकारी श्री.महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री.प्रविण धरमकर बीड, तहसिलदार श्री.अविनाश शिंगटे, समाकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.मडावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
             इव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदार केंद्रावर प्रात्याक्षिका द्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.प्रविणकुमार धरमकर यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजनी करुन दाखवली. तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वानांच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे काही अडचण येणार नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले. प्रात्यकशीका दरम्यान मशीन मध्ये मतपत्रीकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतीक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता
जिल्हा न्यायालयातील सर्व मा.न्यायधीश आणि कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.   
*-*-*-*-*-*-*


बुधवार, १९ डिसेंबर, २०१८


अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार
                                                 --निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
            बीड, दि.19:- शासन अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित असून  शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विद्यार्थी व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून अल्पसंख्याक  समाजातील गरजू लाभार्थींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यासह नागरिकांनी पुढाकार घेण्याची  गरज आहे, असे सुतोवाच निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
            मंगळवार दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्याक  हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  बोलत होते. या कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी, धनंजय जावळीकर,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी उस्मानी नजमा सुलताना,अल्पसंख्याक समितीचे पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे बोलतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, समाजातील प्रत्येक नागरिकांना कायदयाने मुलभूत अधिकार प्राप्त करुन दिले असून त्यांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे.  असे सांगून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोई सुविधा   उपलब्ध करुन दिल्या आहेत त्याचाही लाभ त्यांनी घेतला पाहिजे. असेही  निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यार्थीनीच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षिस वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            निबंध स्पर्धेत गट 5वी ते 8 वीचे विद्यार्थी प्रथम क्रमांक उसैद अलीयाखान जावेद खान मिल्लीया बॉईज हायस्कुल,बीड व्दितीय क्रमांक शेख सानिया युनूस जि.प.उच्च प्राथमिक शाळा गावदरा.ता. धारुर,तृत्तीय क्रंमाक सासे धनश्री रमेशराव विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई, गट 9 वी ते 10 प्रथम क्रमांक उजैर मलिक सुफवाज असिफ,मिल्लीया बाँईज हायस्कुल,बीड, व्दितीय क्रमांक काबरा लक्ष्मी कैलास, विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई,तृतीय क्रंमाक कदम गणेश बालासाहेब,नाथकृपा माध्यमिक विद्यालय कासारी ता. धारुर जि. बीड. उतेजनार्थ बक्षीस मोमीन गौरमान अब्दुल करीम,मिल्लीया गर्ल्स हायस्कुल बीड,इग्रजी माध्यम बीड, शेख मदीहा तहेरीन आसेफ उद्रु माध्यम,बेग आसमा खालेद, जिल्हा परिषद शाळा,नवा मोढां माजलगाव,मराठी माध्यम. श्रेया ध्नजय काळे, पठाण् आयेशा आरेफ,मिलीया कन्या शाळा बीड, ऋतुजा पडीतराव मोटे,विमला विद्यालय,गेवराई,काळे श्रेया धनंजय,सरस्वत माध्यमिक विद्यालय,धारुर. पठाण् अजमल अमजद, गट 9 ते 10 वीची विद्यार्थीनी श्रद्रधा विक्रम करांडे,विमला विद्यालय,गेवराई, शेख अबुजर रफिक,इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल,गेवराई, गणेश बाळासोहब कदम,नाथकृपा मायामिक विद्यालय,कासारी, खेत्रे रविराज सीताराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबारुई
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक यावेळी जिल्हा परिषदेच्या उपशिणाधिकारी श्रीमती उस्मानी नजमा सुलताना यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी मा. श्री सोनवणे यांनी केले.   या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.
-*-*-*-*-





मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८


फरदड कापुस मुक्त गाव अभियान जिल्हाभरात राबविण्यात यावे
बीड दि. 18 :- फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्हयामधे कापुस पिकाचे 3.29 लाख हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये बीड जिल्हयात 3.77 लाख हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकाच्या बी.टी वाणाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे  कापुस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. बोंड अळीचा संपर्ण नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये आणि आपल्या शेतातील पऱ्हाटी मुळासहित उपटुन काढावी व किडग्रस्त बोंडे, नख्या इत्यादी अवशेषांचा संपुर्ण नायनाट करावा, असे अवाहन जिल्हा कृषि अधिक्षक एम.एल. चपळे यांनी केले आहे.डिसेंबर महिन्यात रात्रीच्या वातावरणात घट होत असल्याने व रात्रीच्या कालावधी वाढत असल्याचे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाना उपजिविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
            त्यामध्ये कामगंध सापळयाचा सामुहिकरीत्या वापर करुन मोठया प्रमाणात नर पंतग पकडण्याची मोहिम हाती घेतल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल तसेच जिनींग, प्रेसिंग मिल मध्ये कापुस साठवणीच्या ठिकाणी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. या कामगंध सापळयातील ल्युर्स वेळोवेळी बदलून नवीन ल्युर्स लावावेत. तसेच 15-20 कामगंध सापळयाचा वापर करुन एकत्रितरित्या गुलाबी बोंडअळीचे पतंग गोळा करुन नष्ट करावेत.पुढील हंगामातील प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंडअळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. अशा वेळी कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच डिसेंबर नंतर कपाशीचे पिके ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तीच्या वाढीच्या अवस्थेत आणखी चालना मिळून अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होऊन बी-टी प्रथीनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
            डिसेंबर महिण्यानंतर शेतात 5 ते 6 महिणे कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो. त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणुन कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापुस पिकाच्या चुरा करणारे श्रेडर यंत्राचा वापर करावा व कापूस पिकाच्या अवशेषांचा चुरा गोळा करुन सेंद्रीय खतांमध्ये रुपांतरीत करावा. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात तापू द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.********

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८


मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती ए.एस.ओक
यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
          बीड,दि,5:- मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती ए.एस.ओक हे बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          रविवार दि. 7 आक्टोंबर 2018 रोजीसकाळी 6.30 वाजता औरंगाबाद येथुन बीडकडे प्रयाण सकाळी 8.00 वाजता  बीड विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9.00 बीड येथून  साक्षाळपिंप्रीकडे प्रयाण.9.30 वाजता आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 .00 वाजता साक्षाळपिंपरी येथून बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहात आगमन. दुपारी 2.30 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.*****   

वृत्त्‍ क्रमांक:- 661
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायामुर्ती
रविद्र व्ही.घुगे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
बीड,दि,5:- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायामुर्ती रविद्र व्ही.घुगे हे बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          रविवार दि. 7 आक्टोंबर 2018 रोजी सकाळी 7.00 वाजता औरंगाबाद येथुन साक्षाळपिंपरीकडे  प्रयाण. सकाळी 9.00 वाजता   साक्षाळपिंप्री येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 .00 वाजता साक्षाळपिंपरी येथून बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहात आगमन. दुपारी 2.30 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.*****
वृत्त्‍ क्रमांक:- 662  
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्यायामुर्ती
आर.एम.बोर्डे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
           बीड,दि,5:- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायामुर्ती रविद्र व्ही.घुगे हे बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शनिवार दि. 6 आक्टोंबर 2018 रोजी सायंकाळी 5.00 वाजता औरंगाबाद येथुन बीडकडे प्रयाण. 7.00 वाजता विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. रविवार दि. 7 आक्टोबर 2018 रोजी सकाळी साक्षाळपिंपरीकडे  प्रयाण. सकाळी 9.30 वाजता   साक्षाळपिंप्री येथे आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 .00 वाजता साक्षाळपिंपरी येथून बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहात आगमन. दुपारी 2.30 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.*****   



मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८


शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थ्यापर्यंत
पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
                                  --मुख्य न्यायाधिश श्रीमती प्राची कुलकर्णी
बीड, दि. 2:- शासनाच्या विविध योजनांचा वंचित व गरजु घटकांना लाभ मिळावा या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, अशा सूचना मुख्य न्यायाधिश श्रीमती प्राची  कुलकर्णी यांनी  बीड जिल्हयातील साक्षाळपिंप्री येथील आरोग्य केंद्रात  जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 आक्टोबर 2018 रविवार रोजी आयोजित महाशिबीराच्या पुर्वतयारी  आढावा बैठकीत  श्रीमती प्राची कुलकर्णी बोलत होत्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, न्यायाधिश श्री. गांधी, न्यायाधिश श्री वाघ, दिवाणी न्यायाधिश श्री सुरवसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,सरपंच श्री. घाडगे, श्री काशिदे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखाचां महाशिबिरासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन सर्व संबधित विभागाने शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी जासतीत जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या तसेच महाशिबीरासाठी येणा-या नागरिकानां व लाभार्थ्यांनां ऑनलाईन  योजनेची  जास्तीत जास्त  प्रमाणात माहिती व्हावी या दृष्टीने  ऑनलाईन पध्दतीने संगणकाव्दारे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध ठेवावी व संबधित विभागाने महाशिबिराच्या ए‍क दिवस आधी येऊन आप आपले गाळे ताब्यात घेऊन योजनांची माहिती लाभार्थ्यांना स्पष्ट दिसावी, वाचता यावी  अशा दर्शनी भागात पोस्टर,बॅनर लावावेत, असे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
            साक्षाळपिंप्री येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात विविध योजनांच्या प्रचार प्रसारासाठी एकूण 72 गाळे संबधित विभागाला उपलब्ध्‍ करुन देण्यात येणार असून या परिसराच्या महाशिबीर आढावा बैठकीच्या अध्यक्षा, मुख्य न्यायाधिश सौ. प्राची कुलकणी, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक व इत्तर संबधित अधिका-यांनी प्रत्येक्ष पाहणी करुन गाळाधारकांना गाळे उभारणी संदर्भात व संबधित विभागास स्वच्छतेसंबधी सूचना दिल्या.
            यावेळी महात्मा गांधी  जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ******




बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८


बीड जिल्हाधिकारी कार्यालयात युवा माहिती दूत उपक्रमाचा 
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

        बीड, दि 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
         या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अ. माहिती अधिकारी बी.जी. अंबिलवादे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थित होते.
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून  शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दूतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲप वर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणार्‍या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत.  15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटुंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी,बीड हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील युवक-युवती तसेच युवा माहिती दूत म्हणून इच्छुक व्यक्तींनी  माहिती दूत म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. 
-*-*-*-*-*-
स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा

देशात बीड जिल्हयाची ओळख मुलीचा जन्मदर
सर्वात जास्त असलेला जिल्हा म्हणून निर्माण करु
                                              - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
           बीड दि.15:- बीड जिल्हयाची ओळख मुलीचा अल्प जन्मदर असलेला जिल्हा म्हणून होता परंतु गेल्या काही वर्षात ही ओळख पुसली जात असून आता जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून 898 वरुन 936 इतके झाले आहे. येणाऱ्या काळात मुलीचा जन्मदर सर्वात जास्त असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्हयाची ओळख देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
           स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होती.
           यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून 898 वरुन 936 इतके झाले आहे. आणखी वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य या मध्ये सुधारणा करणे, उज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलगी वारसदार ही भूमिका समाजामध्ये रुजविणे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पहिल्या अपत्यासाठी मुलीच्या नावे 50 हजार रुपये तर दोन अपत्यासाठी प्रत्येक मुलींच्या नावे 25 हजार रुपये बँकेत गुंतवणूक केली जाते. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
          बीड शहराची वाढती लोकसंख्या व रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेल्या एम.सी.एच. विंग 100 खाटासाठीचे निविदा प्रक्रिया सुरु असून अतिरिक्त 200 खाटासाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून बांधकाम निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. अशा एकूण 300 खाटांच्या बांधकामासाठी जागेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हा मोतीबिंदूमुक्त अभियानामध्ये राज्यात अग्रेसर आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये जिल्हा देशामध्ये उल्लेखनीय काम करत आहे. तसेच स्वामी रामानंदतीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 230 खाटांची सर्जिकल इमारत, नर्सिंग होम, धर्मशाळा व नवीन टि.बी. वार्ड लोकार्पण करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
          शासनाच्या ग्रामविकास विभागाने अत्यंत महत्वाकांक्षी अशी अस्मिता योजना 8 मार्च 2018 पासून राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना 5 रुपये या दराने आणि ग्रामीण भागातील महिलांना सवलतीच्या किंमतीत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात येत आहे. बीड जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची 11 तालुक्यामध्ये अंमलबजावणी सुरु असून उमेदच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर बचतगट तयार करुन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बचतगटांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बचतगटांना सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत बॅकामार्फत शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून यावर्षी 30 कोटी रुपयाचे कर्ज  गटांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
          प्रधानमंत्री फसल विमा योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्यामुळे बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल नुकताच जिल्हाधिकारी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2018-19 अंतर्गत बीड जिल्हयातून एकूण 15 लाखाच्या वर विमा अर्ज शेतक-याकडून प्राप्त झाले आहेत. तसेच BLO Net च्या कामामध्येही बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिएडीट आज्ञावलीद्वारे १०० टक्के ७/१२ चे संगणकीकरण करण्यात आले आहे. मिशन दिलासा योजनेतंर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष गृह भेट देऊन शासनाच्या विविध योजनांतर्गत रोजगार निर्मितीबाबत प्रेरीत करुन विविध शासकीय योजनेचा लाभ त्यांना देणेबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.
          जलयुक्त शिवार अभियानाची बीड जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून मागील साडेतीन वर्षात तीन टप्प्यात जिल्हयातील एकूण 722 गावातील 15हजार 186 कामांवर 322 कोटी 36 लक्ष निधी खर्च झालेला आहे. त्यातून 1 लाख 42 हजार 103 टीसीएम पाणीसाठी निर्माण होऊन 1 लाख 20 हजार 871 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षित सिंचनाची उपलब्धता झालेली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्हयामध्ये  प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे सांगून जिल्हयात क्रीडापटूंना वाव मिळावा यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 2.25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
          आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने घेतलेला अहमदनगर-परळी-बीड मार्गाचे भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून अहमदनगर ते नारायणडोह 13 कि.मी. पर्यंत रेल्वेने इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली आहे. राज्य शासनाने आपल्या हिश्याचा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग केला आहे. रेल्वेची कामे युध्द पातळीवर सुरु असून 2019 पर्यंत रेल्वे सुरु होणार असल्याचे सांगून जिल्ह्यात एकूण 8 राष्ट्रीय महामार्गांचे व  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरु असून 2019 पर्यंत जिल्हयातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हयात ग्रामीण घरकुल योजनाची लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंअंतर्गत जिल्हयातील 87 ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हयात 6 पंचायत समितींच्या नवीन इमारती बांधकाम करण्यासाठी 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अनाथ बालकांना शिक्षण आणि नोकरीत 1 टक्के आरक्षण, सरपंचांना ओळखपत्र, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन, घरकुल पात्र लाभार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, भाऊबीज दुप्पट करण्याचा  निर्णय असे विविध निर्णय ग्रामविकास विभाग आणि महिला व बाल विकास विभागाने घेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता  धसे यांनी केले.                                          -*-*-*-*-*-


शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८


‘वारी’ लोकराज्य विशेषांकाचे
जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते प्रकाशन
बीड , दि. 3 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्य या मासिकाच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जी श्रीधर  यांनी लोकराज्य ‘आषाढी वारी’ विशेषांक अत्यंत उत्कृष्ट असून वाचकांसाठी वाचनीय असल्याचे मत व्यक्त केले.
 वारी लोकराज्य अंक प्रकाशनाच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, माध्यमाचे प्रतिनिधी वैभव स्वामी, संजय मालाणी,श्रीमती प्रतिभा गणोरकर,सोमनाथ खताळ, शिरीष शिंदे,उत्तम ओहळ,अ. माहिती अधिकारी बेबीसरोज अंबिलवादे,पर्यवेशक नां.गो.पुठ्ठेवाड, छगन कांडेकर आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’यात पंढरपुरला येणा-या वारक-यांसाठी आध्यामित्क श्राध्दा व्यक्त कली आहे.  अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, यांचा बहुत सुकृताची गोडी म्हणून विठठल आवाडी,श्रीधरबुवा देहूकर यांचा पालखी सोहळा, संदेश भंडारे वारी यात्र, बाळासाहेब बोचरे पालखी सोहळयाचे व्यवस्थापन  डॉ. यू. म. पठाण,ज्ञानदेव रचिला पाया,नां.धो महानोर तुका झालासे कळस, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
हा लोकराज्य विशेषांक जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून लोकराज्य(मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. ही वर्गणी तहसील कार्यालयाच इमारतीत, जिल्हा माहिती कार्यालय ,नगर रोड बीड येथे भरता येईल. अंक वाचणीय असून जास्तीतजास्त नागरिकांनी हा विशेषांक संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय बीड यांच्यावतीने करण्यात आले आहे.*********


शुक्रवार, १३ जुलै, २०१८


बनकारंजा येथे उभारण्यात येणारे शहिद जवानाचे स्मारक
जिल्हयातील नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार
                   --जिल्हाधिकारी एम.डी. सिंह
          बीड,दि,13:- शहीद जवान कॉन्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे यांचे स्मारक बनकारंजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात  उभारण्यात येणार असून हे स्मारक जिल्ह्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार. तसेच महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्मारकासाठी एक दिवसाचे वेतन 6 लाख 14 हजाराचा निधी देऊन सैनिकाप्रति असलेली आदराची भावना निधीच्या माध्यमातून दाखवून दिली  आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एमडी सिंह यांनी केले.
           जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवान यांचे स्मारक उभारण्यासाठी संकलन केलेला निधी वितरणाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,  सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट आलोक कुमार,  निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश नि-हाळी, विकास माने, केज तहसीलदार अविनाश कांबळे, शहिद जवानाचे बंधू नवनाथ नागरगोजे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
                  पुढे बोलतांना  एम. डी. सिंह म्हणले की शहीद जवान कॉ. सुभाष नागरगोजे यांचे स्मारक उभारण्यासाठी केज तालुक्यातील बनकारंजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जागा निश्चित केली असून हे स्मारक जिल्हयातील नागरिकांना व पुढील पिढींसाठी मार्गदशर्दक ठरणार आहे. स्मारक उभारणीसाठी महसूल विभागातील अधिकारी/कर्मचा-यांनी आपले एक दिवसाचे वेतन देवून अंत्यत कमी वेळात 6 लक्ष 14 हजाराचा निधी जमा करुन  एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, बनकारंजा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी समिती नेमण्यात आली आहे, या समितीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे स्मारक उभारण्याचे काम होणार असून  या  स्मारकाचे काम 21 आक्टोबंर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्यचे श्री सिंह यांनी यावेळी सांगितले.
               यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे म्हणाले की, शहीद जवान कॉन्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे यांनी देशासाठी आपले बलीदान दिले असून त्यांचे स्मारक हे शाळेतील विद्यार्थी, तरुणांना देशसेवेची नवी दिशा दाखविण्याचे काम करेल. यावेळी सी.आय.एस.एफचे डेप्युटी कमाडंन्ट अलोक कुमार आपल्या मनोगतात म्हणाले  बनकरंजा येथील स्मारक हे समाजातील सर्वच नागरिकांसाठी  प्रेरणास्त्रोत ठरेल,शहीद जवानाचे बलीदान हे नेहमीच पुढील पिढीला देशसेवेसाठी प्रवृत करत राहील. शहीद जवानाचे बंधू नवनाथ नागरगोजे यांनी आपल्या भावना  व्यक्त करतांना सांगितले माझे बंधू कान्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे हे देशाचे रक्षण करता करता शितलपूर वेस्ट बंगाल येथे चकमकीत शहीद झाले असे त्यांनी सांगितले.  
      यावेळी उपिस्थित मान्यवरांच्या हस्ते  महसूल विभागाकडून जमा झालेल्या 6 लक्ष 14 हजाराचा निधीचा धनादेश बनकरंजाचे सरपंच रवी मानिक नागरगोजे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. या कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी, पत्रकार  तसेच बनकरंजा येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बुधवार, ११ जुलै, २०१८

पर्यटन व तीर्थस्थळी  जातांना पर्यटकांनी दक्षता घ्यावी
पर्यटन मंत्र्यानी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे केल्या  सूचना
            बीड,दि,11:-  जिल्हयातील कपीलधार आणि पाटोदा तालुक्यातील सौताडा हे पर्यंटकासाठी अवर्णीय आनंद देणारे  पर्यटन प तिर्थस्थळ  असून येथे दर्शनासाठी  भाविकांची व तेथील धब धबा पाहण्यासाठी पर्यटनप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी जातांना पर्यटकांच्या जीवीतास कोणताही  धोका होऊ नये  यासाठी  पर्यटकांनी स्वत:ची काळजी,दक्षता घेतली पाहिजे त्याठिकाणी  असलेल्या व्यवस्थापक,पुजारी  किंवा या पर्यटन स्थळाचे काम पाहणा-या  जबाबदार व्यक्तींनी  पर्यटकांना धोक्या संदर्भात सूचना द्याव्यात, अशा सूचना राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  नागपूर  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे पर्यटन,तिर्थस्थळाबाबत चर्चा करतांना दिल्या.  या व्हिडीओ कॉन्फरसिंगला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवाने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *******

शनिवार, ७ जुलै, २०१८


अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी सदस्य
न्यायमुर्ती सी.एल.थूल यांच्या अध्यक्षतेखली आढावा बैठक संपन्न
                                               
            बीड,दि, 6:- अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी सदस्य न्यायमुर्ती सी.एल.थूल यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1998 व सुधारित 2016 तसेच नागरी  हक्क संरक्षण कायद्यातंर्गत मागील 5 वर्षातील प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.
             या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी.सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे,अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे,उपविभागीय अधिकारी विकास माने, महेंद्रकुामार कांबळे, गणेश नि-हाळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय राख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,श्रीमती भाग्यश्री नवटके,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह संबधित अधिकारी  उपस्थित होते.
                 या आढावा बैठकीमध्ये  अनुसूचित जाती जमाती आयोग विधी सदस्य, न्यायमुर्ती सी.एल.थूल  यांनी  पोलीस अधीक्षक बीड यांनी अनुसूचित जाती जमाती  प्रतीबंध कायदा 1989 व सुधारित 2016 तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यातंर्गत मागील पाच वर्षातील प्रलंबित, तपासात प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित व निकाल लागलेल्या प्रकरणाची तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी या कायद्यातंर्गत पिडीतांना शासकीय आर्थिक मदत, जमिनी विषयक, पुर्नवसनाबाबत मागील पाच वर्षात केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती  संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जाणून घेऊन संबधितांना योग्य त्या सूचना केल्या.
                    जिल्हयातील अनुसूचित जाती जमातीच्या नगरिकांवर होणा-या अत्याचारावर प्रतिबंध झाला पाहिजे. या प्रकरणातील गुन्हेगारांना वेळीच शिक्षा होण्यासाठी सर्व संबधित विभागाच्या अधिका-यांनी समन्वयाने काम केले पाहिजे. या समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी व गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा  होण्यासाठी अशी प्रकरणे स्पेशल कोर्ट किंवा फास्टट्रॅक  कोर्टाच्या  माध्यमातून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या  बीड, गेवराई, आष्टी येथील शासकीय वसतीगृहासाठी जमिन तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही संबंधित विभागाच्या अधिका-यांनी करावी, असेही  न्यायामुर्ती श्री.थुल यांनी  यावेळी सांगितले.
             यावेळी जिल्हाधिकारी यांनी  जिल्हयातील अनुसूचित जाती जमातीच्या समाजातील नागरिकांवरील अत्याचार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येणा-या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.    ********


गुरुवार, १४ जून, २०१८


शासकीय यंत्रणांचे टीमवर्क आणि सोशल मीडीयाचा प्रभावी वापर
हेच खरे यशाचे गमक - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
             
          बीड जिल्हा पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांपैकी एक जिल्हा आहे.सन १९५६ साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. ऑगस्ट १९८२ ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले,त्यावेळी या जिल्ह्यातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व अकरा वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्ह्याचे साधारण तीन स्वाभाविक विभाग पडतात-उत्तरेकडे गोदावरी खोऱ्यातील सखल प्रदेश दक्षिणेकडे बालाघाट पर्वताच्या रांगा उंचावरील सपाट प्रदेश आणि उर्वरित कमी अधिक उंचीचा डोंगर टेकड्यांच्या उताराचा आणि सीना खोऱ्याचा भाग आहे.जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून गावांची संख्या १ हजार ३५७ एवढी आहे.अशा या वैशिष्ट्यपूर्ण बीड जिल्ह्याला  एक कर्तबगार शिस्तप्रिय जिल्हाधिकारी लाभले त्यांचे नाव श्री एम डी सिंह. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात प्रथम.
          तेलंगणा राज्यातील निजामाबादचे असलेले जिल्हाधिकारी श्री.एम.डी.सिंह हे २०११च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आणि बी.टेक,सीएस आणि एमबीए असे उच्चविद्याविभूषित. सन २००६ते २०११या कालावधीत श्री.सिंह यांनी HSBC या नामवंत बँकेत सिनियर बिजीनेस ऑफिसर या उच्च पदावर प्रशंसनीय अशी कामगिरी बजावली. आपल्या प्रशासकीय सेवेची कारकीर्द त्यांनी २०१२मध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी कोल्हापूर व नंतर सांगली अशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी २०१३ ते २०१५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी म्हणून स्वतःला घडविले आणि मग त्यांनी सन २०१५ ते २०१६ या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अकोला जिल्ह्यात तर २०१६-१७ या कालावधीत चंद्रपूर येथे आपली कारकीर्द गाजविली.  
          बीड जिल्हयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी  प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई आवास योजना यासारख्या विविध योजनांमध्ये विशेष लक्ष घालून प्रभावीपणे व उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांनी या योजनांची जिल्हयामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) योजनेद्वारे  जिल्हयातील गोरगरीब महिलांना स्वयंसहाय्यता गटांद्वारे तसेच  बचतगटांद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात  आली. तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार केले. आणि या संस्थांच्या माध्यमातून गरिबांचे अधिकार, हक्क, वित्तीय सेवा
-2-
-2-

तसेच शाश्वत उपजीविकेच्या  संधी प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मिती केली. बीड जिल्हयामध्ये आदर्श गावांमध्ये शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांद्वारे गावातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच  संबंधित गावांना भेटी देऊन योजना यशस्वी होण्यासाठी लक्ष केंद्रीत केले. जलयुक्त शिवार अभियानामध्ये नियोजनपूर्व काम करुन जलस्त्रोत वाढविणे तसेच या योजनेचे  उदिष्टय   साध्य 
करण्याच्या  अनुषंगाने प्रशंसनीय काम केले. मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन  योजनेंर्गत जिल्हयातील ग्रामपरिवर्तक  दूतामार्फत ग्रामीण भागातील विविध विकास कामांना चालना देवून विकासात्मक कामे केली. पाणी  फांउन्डेशन अंतर्गत बीड जिल्हयातील निवड झालेली गावे पाणीदार करण्याच्या उद्देशाने गावकऱ्यांना प्रशिक्षण तसेच गावामध्ये अधिकारी /कर्मचारी व गावकरी यांच्याद्वारे श्रमदान करुन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल सन २००१ मध्ये झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता, हा पूल नव्याने बांधणे हे मोठे आव्हान  होते, परंतु सातत्याच्या पाठपुराव्यामुळे व नियोजनपूर्वक कामामुळे पूलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग २११ साठीची भूसंपादन प्रक्रिया व अहमदनगर-बीड-परळी (वै) रेल्वे भूसंपादनाचे आणि मावेजा वाटपाचे काम अंतिम टप्यात असून लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येणारआहे. या सर्व कामाबरोबरच केंद्र शासनाची विशेष योजना प्रधानमंत्री फसल विमा योजनेची यशस्वीरित्या अमलबजावणी करण्याच्या बाबतीत बीड  जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
          BLO Net च्या कामामध्येही बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिएडीट आज्ञावलीद्वारे १०० टक्के ७/१२ चे संगणकीकरण करण्यात आले आहे.मिशन दिलासा योजनेतंर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन शासनाच्या विविध योजनांतर्गत रोजगार निर्मितीबाबत प्रेरीत करुन विविध शासकीय योजनेचा लाभ त्यांना देणेबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
          ३० एप्रिल २०१७ रोजी त्यांनी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर या जिल्ह्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली,प्रशासकीय शिस्त निर्माण केली. येथील लोकांना , लोकप्रतिनिधींना आपलेसे केले आणि यातूनच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना या जिल्ह्यात अत्यंत तडफेने राबविली आणि त्यात उल्लेखनीय यशही मिळविले. या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला.या यशाबद्दल नुकताच त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला याविषयी अधिक जाणून घेऊ या त्यांच्या या मुलाखतीतून......

-3-

-3-

प्रश्न क्र 1. पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीत आपण हे यश कसे मिळविले ?

          शेतकऱ्यांचा PMFBY योजनेवर विश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्हयातील एकूण 6 लाख 51 हजार 783 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 43 हजार 200 (83%)शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेवून 12 लाख 18 हजार 257 अर्जाव्दारे पिकांचे विमासंरक्षण केले. यासाठी जिल्हा प्रशासनाने आकाशवाणी,पेपर, बॅनर, पॅम्पलेट, मार्गदर्शन शिबिरे, सोशल मिडीया (फेसबुक, व्हॉटस्ॲप, व्टिटर, कॉल सेंटर) इ. माध्यमांचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे बीड जिल्हयाने देशात सर्वात जास्त पिक विमाव्दारे शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण केले. 
          पिक विमा भरताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी तलाठी, कृषीसेवक यांनी प्रत्येक बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी आदेशित केले. 
          जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी सोशल मिडीयाचा उत्कृष्टपणे वापर करुन घेतला. यासाठी व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला यामध्ये जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे,सर्व आमदार, लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त, औरंगाबाद , पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, (बँक प्रतिनिधी, इन्श्युरन्स कंपनीचे प्रतिनिधी, CSC चे प्रतिनिधी) या सर्वांचा समावेश करण्यात आला होता तसेच या योजनेसंदर्भात एखादी तक्रार प्राप्त होताच  तक्रार ग्रुपवर टाकून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात येत होते.
          शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज दाखल करता यावा यासाठी जिल्हयातील सर्व बँकांना सुट्टीच्या दिवशी देखील पिक विमा अर्ज स्विकारण्यासाठी आदेशित केले. या सर्व उपाययोजनांचा एकत्रित परिणाम जिल्हयातील एकूण 83% शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले यामुळे संपूर्ण भारतात व राज्यातही सर्वाधिक शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचा मान बीड जिल्हयाला मिळाला.

   प्रश्न क्र. 2. शासनाच्या कोणकोणत्या विभागाचे पिक विमा योजनेसाठी आपणांस सहकार्य लाभले आहे ? 

          प्रधानमंत्री पिक विमा योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हयातील सर्वच यंत्रणांनी टीमवर्क म्हणून काम केले.  यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, पोलीस विभाग, बँक विभाग, CSC व्यवस्थापक, ईनश्युरंन्स कंपनी या सर्व विभागांनी उत्कृष्ठ कार्य व  मदत  केली आहे. या सर्वांच्या टीमवर्कमुळेच हे यश मिळाले आहे.

-4-
-4-
प्रश्न क्र.3.  पिक विमा योजनेत आपण किती लोकांना लाभ दिला ? 

          पिक विमा योजनेत जिल्हयात 6 लाख 51 हजार 783 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 43 हजार 200 (83%)शेतकऱ्यांचे 12 लाख 18 हजार 257 पिक विमा अर्ज भरण्यात आले. खरीप 2016 साठी ही रक्कम रु 232.84 कोटी इतकी होती.

प्रश्न क्र.4. पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीकरिता आपण कसे नियोजन केले ?

          पिक विमा योजनेमध्ये सर्व संबंधीत यंत्रणांमध्ये समन्वय राखणे सर्वात महत्वाचे होते. सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी व्हाटस्ॲप या सोशल माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. व्हाटस्ॲप मध्ये सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व संबधीतअधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, CSC चे प्रतिनिधी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हयातील प्रगत शेतकरी इ. सर्वांचा समावेश करण्यात आला होता. 
          सर्व महत्वाचे शासन निर्णय, प्राप्त तक्रारी या ग्रुपवर टाकण्यात येत होत्या त्यामुळे सर्व यंत्रणांना अद्यावत माहिती तात्काळ उपलब्ध होत होती. जिल्हयातील सर्व बँकांमध्ये कृषीसेवक, तलाठी, यांना पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. पिक विमा या योजनेचा जिल्हयातील नियमित आढावा बैठकांमध्ये समावेश करण्यात आला होता. DLCC मिटींगमध्ये देखील बँकांना नियमितपणे सूचना देण्यात आल्या होत्या. तालुका पातळीवर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे देखील आयोजित करण्यात आले होते.
          आपले सरकार सेवा केंद्रचालकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत  पिक विमा अर्ज भरणे संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, टॅप्लेट, बॅनर इ. व्दारे शेतकऱ्यांना योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक बँक तसेच आपले सरकार सेवाकेंद्रामध्ये योजनेची माहिती दर्शविणारे बॅनर लावण्यात आले होते.

प्रश्न क्र.5. या योजनेत आपणांस जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडेआणि खासदार प्रीतम मुंडे यांचे कसे मार्गदर्शन लाभले ? 

 पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा योजनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व यंत्रणांना पिक विमा यशस्वीपणे राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पालकमंत्री महोदयांचाही व्हाटस्ॲप ग्रुपमध्ये समावेश असल्यामुळे त्यांना या योजनेविषयी जिल्हयातील परिस्थितीची अद्यावत माहिती होत होती. प्रत्येक स्तरावरील कार्यवाहीची माहिती त्यांना नियमित मिळत  होती. त्याआधारे आवश्यक त्या सूचना, मार्गदर्शन वेळोवेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून मिळत होते.अशाच प्रकारच्या सूचना,मार्गदर्शनखासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडूनही मिळाले.त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. 
-5-
-5-
प्रश्न क्र.6. पिक विमा योजना राबवितांना आपला दृष्टीकोन काय होता ?

          बीड जिल्हयामध्ये पावसाचे प्रमाण अनियमित आहे तसेच जिल्हयामध्ये वारंवार दुष्काळ पडत असतो. जिल्हयातील शेती ही प्रामुख्याने पडणाऱ्या पावसावर अवलंबून असल्यामुळे येथील शेतकरी हा नेहमी चिंतीत वातावरणात जगत असतो. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेव्दारे शेतकऱ्यांची चिंता कमी होवून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळत राहावे यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. या योजनेमध्ये समाविष्ट शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेपासून होणाऱ्या चिंतेपासून सुटकारा मिळेल. पाऊस जरी पडला नाही तरी त्यांना योजनेव्दारे नुकसान भरपाई मिळेल. तसेच अतिवृष्टी, गारपीटव्दारे पिकांचा होणाऱ्या नुकसानीचा देखील मोबदला मिळेल.जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहावे व कोणत्याही शेतकऱ्याचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान होवू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
प्रश्न क्र.7. पिक विमा योजना राबवितांना आपणांस काही अडचणी आल्या होत्या काय ? त्यावर आपण कशी मात केली.
पिक विमा योजना राबविताना प्रामुख्याने तीन अडचणी आल्या होत्या 
1. पिक विमा बॅकेत भरताना होणारी गर्दी
2. वेबसाईट सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण होणे.
3. आधार संदर्भातील अडचणी 
पिक विमा भरताना शेवटच्या टप्प्यामध्ये बँकेमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी जास्त असणे तसेच वेबसाईट मध्ये तांत्रिक दोष निर्माण होणे, यामुळे अर्ज दाखल करण्यात विलंब होत असे. कोणताही  शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व बँका सुट्टीच्या दिवशीही चालू ठेवण्याबाबत आदेशित केले.
          सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष दिवसा मोठया प्रमाणात येत असल्यामुळे जिल्हयातील सर्व 2 हजार 929 (CSC)चालकांना  रात्रीच्या वेळी अर्ज सादर करण्याचे सुचविले, त्यामुळे बॅंकेवरील गर्दीचा ताण मोठया प्रमाणात कमी झाला  व शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज सादर करणे शक्य झाले.सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक दोषाबदृदल वरिष्ठ यंत्रणेला अवगत करण्यात आले.
          पिक विमा अर्ज सादर करताना आधार क्रमांक अत्यावश्यक असल्यामुळे 60 वर्षावरील काही शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे उमटत नसत तसेच त्यांच्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक अद्यावत नसल्यामुळे अर्ज सादर होत नव्हते. अशा प्रकारच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी CSC चालकांना शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक IRIS उपकरणाद्वारे अद्यावत करुन अर्ज सादर करण्याबाबत आदेशित केले. ज्यामुळे जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांचे पिकविमा अर्ज सादर करणे शक्य झाले. या योजनेशी आधार क्रमांक जोडणे अनिवार्य केल्यामुळे पारदर्शकता निर्माण होऊन कोणत्याही शेतकऱ्याद्वारे बोगस पिकविमा अर्ज सादर झाला नाही.
-6-

-6-

प्रश्न क्र.8 पिकविमा येाजना राबवित असताना शेतकऱ्यांच्या जीवनाविषयी आपली संकल्पना कशी होती? 

          शेतकरी हा देशाचा प्रमुख कणा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहावे व त्याचे जीवनमान उंचवावे, देशाला विकसित करायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा विकास होणे आवश्यक आहे. जिल्हयात वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. पिक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून दूर ठेवण्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. चांगले पर्जन्यमान झाले तर उत्तम पिकाद्वारे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल,  त्याचबरोबर अतिवृष्टी किंवा दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेता येईल. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणा व त्यांना शाश्वत उत्पन्नाची खात्री देणे यासाठी हया योजनेत जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याचा समावेश व्हावा म्हणून संपूर्ण प्रशासनाने दिवसरात्र मेहनत घेतली.
प्रश्न क्र.9. पिक विमा योजनेसारख्याच शासनाच्या आणखी काही योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी किंवा जिल्हयाच्या विकासासाठी आपले पुढील ध्येय काय आहे ?
          जिल्हयातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्यादृष्टीने तसेच जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या खालील योजना प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
1. जलयुक्त शिवार अभियान 2) मागेल त्याला शेततळे,3) गट शेती 4) POCRA Villages
प्रश्न क्र.10. या योजनेसाठी आपण लाभार्थींच्याही भेटी घेतल्या, याबद्दल आपला अनुभव काय?
या योजनेची यशस्वी अंमलबजावणी  करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या नियमितपणे भेटी घेण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांना या योजनेचे महत्व तसेच या योजनेतून होणारा फायदा या सर्वांची इत्यंभूत माहिती देण्यात येत होती. कृषी विभागामार्फत प्रत्येक गावात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली होती.
प्रश्न क्र.11.पिक विमा योजनेतून आपण इतर जिल्हयाला काय संदेश देऊ इच्छिता ?
          पिक विमा योजना ही शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारी खात्रीशीर योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही नैसर्गिेक संकटावर मात करता येते, यामध्ये नैसर्गिक संकट (जसे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट) दरम्यान होणाऱ्या पिेकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची खात्री देण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हापातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

-7-
-7-

प्रश्न क्र.12. आपल्याला मिळालेल्या या यशाबद्दल आपणास आपले अनुभव ऐकण्यासाठी इतर जिल्हे/ राज्यही उत्सुक असतील, याबद्दल काय सांगाल ?

          मार्गदर्शन- हो,हे खरे आहे. नुकतेच ओरिसा राज्याच्या विनंतीवरून प्रधानमंत्री फसल बिमा योजना त्या  राज्यामध्ये अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी  त्या राज्यातील सर्व उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक, सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सहकार विभागाच्या मा. प्रधान सचिव श्रीमती रंजना चोप्रा, मा.डॉ. त्रिबिकराम प्रधान, सचिव, सहकारी संस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन केले. इतरही काही राज्यांमधूनही या विशयाबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मला आमंत्रित करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
बीड