शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८


जलयुक्त शिवार व शेततळयाची कामे
ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावेत
                                            --जिल्हाधिकारी एम.डी. सिंह
         बीड, दि.23:- जलयुक्त शिवार अभियानातील कामे तसेच  मागेल त्याला शेततळे योजनेचे यंत्रणांना दिलेले कामाचे उद्द्टि दिलेली कामे मुदतीत पूर्ण  करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  एम. डी. सिंह यांनी संबधित अधिका-यांना   दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपजिल्हाधिरी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी एम.डी सिंह यांनी जलयुक्त शिवार अभियान व मागेल त्याला शेततळे योजनेच्या कामाचा यंत्रनेकडून सविस्तर माहिती घेवून चालु वर्षात यंत्रणांना दिलेले कामाचे उद्दिष्ट वेळेत पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.  शेततळयासाठी  ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या  जिल्हयातील शेतकऱ्यांना शेततळयाचे काम करण्याचे मंजूरी आदेश दिले पाहिजेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेततळयाचा लाभ दिला पाहिजे असे सांगून जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे या योजनेची  कामे  मार्च अखेरपर्यंत एकही प्रलंबित राहणार नाहीत याची यंत्रणांनी  दक्षता घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सन 2015-16 पासून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत तीन टप्यात 722 गावांची निवड करण्यात आली असून टप्पा क्र. 1 अंतर्गत निवड केलेल्या 271 गावांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. टप्पा क्र. 2 मध्ये सन 2016-17 मध्ये जिल्हयातील 256 गावांची निवड करण्यात आली असून गावातील कामांचा कालावधी 2018 मार्च अखेर समाप्त होणार आहे. यामध्ये विविध यंत्रणाची एकूण 5073 कामे प्रस्तावित करण्यात आली असून जानेवारी 2018 अखेर 3443 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याकामामध्ये बांधबंदिस्ती, खोल समतल चर, माती नाला बांध, पाझर तलाव, गांव तलाव, सिंचन तलाव दुरुस्ती, सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती, पुर्नरुजीवन, शेततळी, जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश असून उर्वरित कामे मार्च- 2018 अखेर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे नियोजन व कालबध्द कार्यक्रमाबाबत तालुकानिहाय व क्षेत्रीय कर्मचारी निहाय जिल्हाधिकरी एम.डी. सिंह यांनी सविस्तर  आढावा घेवून  प्रलंबित  कामे मार्च 2018 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी  अमलबजावणी यंत्रणांना केल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी टपा क्र. 3 मध्ये सन 2017-18 साठी जिल्हयातील एकूण 195 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांची एकूण 3385 कामे आराखडयात प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण आराखडा 139.81 कोठी रुपयाचा आहे. टप्पा क्र. तीन मध्ये बांधबंदिस्ती ,खोल समतल चर इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे 89265 या क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच माती नाला बांध,अर्दन स्ट्रक्चर,सिंमेट नाला बांध,पाझर तलाव,गाव तलाव,कोल्हापुरी बंधारा,सिंचन तलाव दूरुस्ती,सिंमेट नाला बांध व माती नाला बांध दुरुस्ती,पुर्नरुजीवन शेततळी,वनविभागामार्फत वनतळी, गुरे प्रतिबंधक चर जलस्त्रोतातील गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावे कामांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकी मान्यता घेवुन निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            यावेळी तसेच मागेल त्याला शेततळे कार्यक्रमातंर्गत जिल्हयात 6 हजा 500 शेततळे उभारण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे.  एकूण 12हजार 312 शेतक-यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले असून 7 हजार 903 शेतक-यांना कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दि. 15 फेब्रुवारी 2018 अखेर एकून 3 हजार 754 शेततळयाची कामे पूर्ण झाली असून 526 कामे प्रगती पथावर असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णू मिसाळ  यांनी यावेळी दिली. या आढावा बैठकीस जिल्हा व तालुकास्तरीय समितीचे सदस्य, यंत्रणेचे अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.
*******


शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८


कुष्ठरोग हा शाप नाही
        कुष्ठरोग म्हटले की, आपल्या डोळयासमोर एखाद्या मंदिरासमोर,बसस्टॅण्डवर,रेल्वेस्टेशनवर हातापायानां चिंध्या बांधलेला विकृत माणूस आपल्या नजरे समोर तरळतो व नकळत आपल्या मनात तुच्छतेची भावना प्रगट होते. कुष्ठरोग झालेला माणूस कुंटंबातुन व समाजातुन बहिष्कृत केल्या जातो. या रोगापेक्षा बहिष्कुत जीवन जगण्याचे दुख: त्याला जास्त छळते.दुस-याच्या दयेवर जगण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच उरत नाही.काही कुंटुंबात कुष्ठरोग हा शाप समजल्या जातो तर काही त्या व्यक्तीला  कर्माची फळे म्हणून घरातुन हाकलुन देतात. यातुनच माणूस मग अंधश्रध्देकडे वळतो. पण कुष्ठरोग हा शाप किंवा कर्माचे फळही नसून त्याची लक्षणे दिसताच त्यावर उपचार केला तर तो निश्चितपणे बरा होऊ शकतो.कुष्टरोग्यांनी नियमित उपचार घ्यावे व आपले मानसिक संतुलन बिघडू देऊ नये.कुष्ठरोगाची लक्ष्णे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी. मोफत उपचाराबरोबरच जुन्या कुष्ठरुग्णासाठी,त्यांना जगण्याच बळ मिळावे,समाजाच्या दयेवर जीवन न जगता स्वत:ला उदरनिर्वाह करण्याचे साधन मिळावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी काही योजनाही काढल्या आहेत.
                                                                                                                 बेबीसरोज अंबिलवादे,
                                                                                                               जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                          बीड


            कुष्ठारोगाचे रुग्ण लवकर बरे व्हावेत व त्यांनाही सामान्य व्यक्ती प्रमाणे जीवन जगता यावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी मोफत उपचार पध्दती सुरु केली असून जुन्या विकृती आलेल्या कुष्ठरोग्याच्यां पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध प्रकारची मदत केली जाते. तळपायाला पूर्ण बधीरता आलेल्या विकृत कुष्ठ रुग्णाने मागणी केल्यास एम.सी.आर. चप्पल वर्षातुन दोन वेळेस वाटप करण्यात येते.डोळयास बाधा झालेल्या विकृत कुष्ठ रुग्णास गॉगल देण्यात येतो.ज्या कुष्ठ रुग्णाची हातापायाची बोटे किंवा डोळयाना लॅगाप्थालमस्ची बाधा झाली असल्याने व शस्त्रक्रीय करण्यास रुग्ण पात्र असेल तर अशा सर्व रुगणास बीड जिल्हया जवळ असलेल्या वडाळा जि. अहमदनगर ,मिरज,जिल्हा सांगली येथे पाठविण्यात येते. या काळात त्यांचा रोजगार बुडतो म्हणून शस्त्रक्रिया करुन घेणा-या रुगणास शासनाच्या नियमानुसार भत्ता देण्यात येतो. कुष्ठ रुग्णास स्वत:ला किंवा त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीस स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नाशिक येथे आयटीआय मध्ये मोफत  कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.ज्या जुन्या कुष्ठ रुग्णांचे कुष्ठ बरे होऊ शकत नाही ते उदरनिर्वाहासाठी काही काम करु शकत नाही त्यांना  आर्थिक पुनर्वसनासाठी शासनाकडून अंत्योदय अन्न योजना,संजय गांधी निराधार पेन्शन योजना, इंदिरा गांधी आवास योजनांचा लाभ दिल्या जातो.
            कुष्टरोग हा त्वचाचा आजार नसून तो नसांचा आजार आहे. माईक्रोबॅक्टेरियम लेप्रा नावाचा बॅक्टरिया नसामध्ये गेल्यामुळे कुष्ठरोग होतो.या जंतुमूळे नसा हळु हळु निकामी होऊन त्यावरील मास झडु लागते. कुष्ठरोगी रुगणामध्ये विकृती यायला लागते. कुष्ठरोग हा रोग्याच्या संपर्कात आल्याने होत नाही.रोग्याच्या शिंकण्यातुन आणि खोकल्यातुन हे जंतु दुस-या व्यक्तीच्या शरीरात जातात. ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल त्याला कुष्ठरोगाची बाधा खूप लवकर होते.           

            कुष्ठरोग होण्याची कारणे,आजाराची लक्षणे व त्यावर  शासनाचे मोफत उपचार ठेवले असून ते  पुढीलप्रमाणे आहे.कुष्ठरोग हा मायकोबॅक्टरियम लेप्री नावाच्या कुष्ठजंतु जिवाणूमुळे होतो. या कुष्ठ जंतुचा शोध डॉ. एच.ए.हॅनसन यांनी सन 1873 मध्ये लावला आहे. कुष्ठ रोगाची लक्षणे:- लाल पांढरट थोडासा तेलकट चट्टा येतो, कानाच्या पाळया जाडसर गाठी आल्यासारख्या जाड होतात,त्या ठिकाणी त्वचेवर केस राहत नाहीत.चटटयावर घाम येत नाही.हातापायानां मुंग्या येतात. हातापायाच्या जखमा दुरुस्त होत नाहीत.मज्जातंतु जाडसर होतात, दुखतात. त्वाचा व मज्जातंतु या अवयवानां  बाधा पोहचते.कुष्ठरोग हा दोन प्रकारचा असतो सांसर्गिक कुष्ठरोगामध्ये पाच एमबीपेक्षा जास्त बधीर चट्टे व एक मज्जातंतु एक किंवा एक पेक्षा जास्त असतात. असांसर्गिक कुष्ठरोगामध्ये पाच एमबीपेक्षा कमी बधीर चट्टे असतात.
            कुष्ठरोग पसरण्याची कारणे:- औषधोपचार न घेणारा सांसर्गिक रुग्ण त्याच्या खोकलन्यातुन जंतु हवेत पसरतात,त्याच्या श्वासोश्वासातुन हे जंतु निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमी असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसतात. कुष्ठरोगाची लक्षणे दिसण्यासाठी जंतुचा अशयघन काळ किमान तीन वर्षाचा व कमाल 30 वर्षापर्यत असतो. रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असलेल्या कोणत्याही स्त्री,पुरुष,बालक,नोकरदार,व्यवसायिक,बेरोजगार अशा कोणत्याही व्यक्तीस कुष्ठजंतुचा संसर्ग होऊ शकतो. कुष्ठरोगी व्यक्तीचे निदान सर्व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर यांच्याकडून तपासणी नंतर व प्रयोगशाळेत त्वचेची तपासणी केल्यानंतर कुष्ठरोगावर पुढीलप्रमाणे उपचार होऊ शकतात.
            रुग्णाच्या कुष्ठाच्या प्रकारानुसार रुग्णास 6 महिने किंवा 12 महिने नियमित उपचार घ्यावे लागतात. यात 28 दिवसाची एक स्ट्रीप असते. औषधाची मात्रा दिवसातुन एकच वेळ घ्यावी लागते. रुग्णांना घरी कुंटुंबात राहून औषध घेता येते. औषधाचा एक डोस घेतल्यानंतर शरीरातील 90 टक्के कुष्ठ जिवाणू मरतात व अशा रुगणांकडून कोणालाही  सोबत राहणा-या व्यक्तीलाही संसर्ग होत नाही उपचार नियमितपणे घेतले तर रुग्ण पूर्ण बरा झाल्यावर सर्वसामान्य जीवन जगू शकतो.
            पहिल्या प्रकारात पीबी असांसर्गिक रुग्णांस 6 महिने नियमित उपचार घ्यावा लागतो. पहिल्या दिवशी 2 अरसीन व 1 डॅप्सोन व नंतर मात्र 28 दिवसापर्यंत रोज 1 डॅप्सोन दुसरा प्रकार एमबी सांसर्गिक रुग्णांस 12 महिने नियमित उपचार घ्यावा लागतो.पहिल्या दिवशी 2 आरसीन 1 डॅपसोन 3 क्लोफॅझीमीन नंतर 28 दिवसापर्यंत रोज 1 डॅप्सोन 1 क्लोफॅझीमन असा उपचार रुग्णास घ्यावा लागतो.
            कुष्ठरोग्याच्या उपचारासाठी कोणताही खर्च लागत नसून सर्व शासकीय दवाखाने,प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा सामान्य रुगणालय,शासकीय वैद्यकीय माहाविद्यालय,नगरपालीका आणि महानगरपालीका येथे  रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
            जुन्या औषधोपचार पूर्ण केलेल्या व विकृतीग्रस्त रुग्णाना सेवा आणि सल्ला पाहिजे असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयबीड,वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई,उपजिल्हा रुगणालय,परळी या ठीकाणी कुष्ठ रुग्णांना हात,पाय,डोळयाची काळजी कशी घ्यावी याबाबत सल्ला व आरोग्य शिक्षण देण्यात येते. त्यांसाठी त्यांनी वरील ठिकाणी संपर्क साधावा.
            कुष्ठरोगाची जनजागृती करण्यासाठी व त्यानां कुष्ठ रुग्णाना औषधोपचाराबरोबच मानसिक बळ मिळावे म्हणून शासनातर्फे 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग होऊ नये त्यासाठी व झाल्यानंतर काय उपाय करावेत यासाठी जिल्हाधिकाकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन स्पर्श अभियानातंर्गत बीड येथे रॅलीची आयोजन करुन फलकाव्दारे विविध म्हणी घोषवाक्य, बसस्टॅण्ड,मंदिरे,इत्यादी गर्दीच्या  ठिकाणी हस्त पत्रिका वाटण्यात आल्या. विविध शाळेमधून प्रश्नमंजुषा,ग्रामसभा,पथनाटय स्क्रीप्ट तयार करण्यात आली.  तसेच कुष्ठरोगाविषयीची कुष्ठरोग तज्ज्ञामार्फत माहिती देण्यात आली. बीड जिल्हयामध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर 10,000 लोकसंख्येमध्ये 0.5 एवढे असून सध्या जिल्हयात डिसेंबर 2017 अखेर 154 कुष्ठरुग्णांवर औषधोपचार चालु आहे नवीन कुष्ठ रुग्ण 6.40 असून या वर्षात माहे डिसेंबर 2017 अखेर 129 नवीन कुष्ठ रुग्णांना शोधण्यात आले आहे. बीड जिल्हयात आतापर्यंत उपचार पूर्ण केलेले जुने आणि नवीन विकृती ग्रेड 1 व 2 चे एकून 955 कुष्ठरुग्ण असून त्यांच्यावर उपचार चालु आहेत.


बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

गौण खनिज यंत्र सामुग्री व साधन सामुग्रीवर
शास्तीची तरतुद निश्चित करण्यात आली
बीड,दि,7:- महाराष्ट्र शासनाने दि. 12 तानेवारी 2018 रोजी राजपत्रव्दारे जमीन महसूल(गौण खनिजाचे उत्खनन व ती काढणे) नियम 1968 मध्ये सुधारणा करुन नवीन नियम 9 हा समाविष्ठ करुन त्याव्दारे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (8) अन्वये गौण खनिज काढण्यासाठी,हलविण्यासाठी,गोळा करण्यासाठी व दुस-या जागी नेण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली यंत्रसामुग्री व साधनसामुग्रीवर त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहतुक साधने याच्यांवर पुढीलप्रमाणे शास्तीची तरतुद करण्यात आली आहे.
वाहने,साधनाचा प्रकार,शास्तीची रक्कम ड्रील मशीन 25,000/- रुपये, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॅाली, हॉप बॉडी ट्रक, सक्शन पंप 1,00,000/- रुपये, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रालर,क्रप्रेसर 2,00,000, ट्रालर बार्ज, मोटोराज्ड बोट 5,00,000/- रुपये आणि एकस्कॅवेटर, मॅकनाईज्ड लोडर 7,50,000 रुपये याप्रमाणे शास्तीची रक्कम आहे.
महाराष्ट्र जमिन अधिनियम 1966 चे कलम 48 (7) अन्वये गौण खनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट रकमेच्या व्यतिरिक्त राहील. जप्त केलेल्या यंत्रसामुग्री व वाहतुकीची साधने यांच्या बाजारमुल्यापेक्षा अधिक नसेल इतथ्या रकमेच्या वैयक्तीक जातमुचलका घेण्यात येईल. यामध्ये जातमुचलक्याचा निष्पादक किंवा कुंटुंबातील सदस्यांच्या अचल संपती जसे जमीन,घर यांचे विवरण सादर करुन त्यासंबधीची सांक्षाकित कागदपत्रे किंवा जिल्हयाधिका-यांच्या नावाने ताबे गहान ठेवलेल्या प्रतीभुती किंवा राष्ट्रीयकृत बँकेची बँक हमी सादर करावी लागेल.
वैयक्तीक जातमुचलका निष्पादकाने जप्त केलेली यंत्रसामुग्री, साधन सामुग्री व वाहतुकीची साधने अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन वाहतुक किंवा विल्हेवाटीसाठी वापर नाही अशी हमी देणे बंधंनकारक केले असून
सबब अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक  करणा-याला गौणखनिजाच्या बाजारमुल्याच्या पाचपट दंडा व्यतिरिक्त जप्त वाहनांची शासती रक्कम व वैयक्तीक जातमुचलका अशी तिहेरी कार्यवाहीला समोरे जावे लागणार असल्यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियत्रंण व प्रतिबंधाकरिता अशा प्रकारची कार्यवाही महसूल उपविभाग बीड कार्यक्षेत्रात यापुढे करण्यात येणार असल्याची माहिती बीडचे उपविभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.*********


जिल्हा व सत्र न्यायालयात
शासकीय वाहनाचा जाहिर लिलाव
            बीड,दि,7:- जिल्हा व सत्र न्यायालय बीड अंतर्गत पुढील निर्लेखित शासकीय वाहनांचा जाहिर लिलाव दि.16 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथील प्रांगणात होणार आहे. इच्छुक खरेदीदारांनी या संधीचा फायदा घ्यावा. लिलाव करण्यात येणा-यावाहनाचा तपशील,निर्मिती वर्ष व संख्या पुढीलप्रमाणे आहे.
            मारुती इस्टीम पेट्रोल कार क्रमांक एम.एच.01.बी.ए.1314 निर्मिती वर्ष 2001, संख्या एक हे वाहन कार्यालयीन वेळेत जिल्हा न्यायालयाच्या परिसरात निरिक्षणासाठी उपलब्ध आहे. लिलावाच्या अटी व शर्तीसाठी सहाय्यक अधिक्षक,लेखा व वित्त विभाग,जिल्हा सत्र न्यायलय,बीड यांच्याकडे संपर्क साधावा अशा सूचना बीड जिल्हा न्यायालयांचे प्रबंधक यांनी केल्या आहे.*******




मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

पर्यावरण मंत्री रामदास कदम
यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

बीड,दि,6:- राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम  हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी,2018 रोजी सकाळी 6.20 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बीड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत चर्चेसाठी राखीव. सकाळी 11.00 ते 1.00 वाजेपर्यंत बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा या मतदारसंघाच्या पदाधिका-यां समवेत शासकीय विश्रामगृह बीड येथे आढावा. दुपारी 1.00 ते 3 वाजेपर्यंत अंबाजोगाई,माजलगाव या मतदार संघाच्या पदाधिका-या समवेत बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा. दुपारी 3.00 ते 4.00 वाजेपर्यंत राखीव. स्थळ शासकीय विश्रामगृह, बीङ दुपारी 4.00 ते 4.30 वाजेपर्यंत शिवसेना पदाधिका-या समवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात चर्चा. दुपारी 4.30 वाजता शासकीय वाहनाने बीड येथून औरंगाबादकडे प्रयाण. 
******


शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी
दि. 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
            बीड,दि,3:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत 50 टक्कयापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनां मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे तसेच भोजन,निवास व इत्तर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात  यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी वरील दिनाकांपूर्वी सहाय्यक आयुक्त,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड बीड येथे अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहे.  ******

शिष्यवृत्तीसाठी मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांनी
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
            बीड,दि,3:- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क (फ्रीशीप) योजनासह इतर सर्वच शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन (मॅन्यूअली स्वरुपात) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017-18 शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी मॅट्रीकोत्तर  मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी तसेच  अनु.जाती फक्त प्रथम वर्ष,विजाभज,इत्तर मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्याची संबधित महाविद्यालयाकडून किंवा Mahaeschol.maharashtra.gov  या ऑफलाईन प्रणालीवरुन ऑफलाईन अर्जाचा नमुना प्राप्त करुन अर्जासोबत वरील शासन निर्णय दिनांक 29-1-201 प्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडून संबधित महाविद्यालयास सादर करावेत. संबधित महाविद्यालयांनी बी स्टेटमेंटसहित सर्व अर्ज दि. 15 फेब्रुवारी 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बीड कार्यालयात सादर करावेत.
            अनु.जाती प्रवर्गातील व्दितीय,तृतीय,चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जाचे Mahaeschol.maharashtra.gov या प्रणालीवरुन महाविद्यालयांनी दि. 2 फेब्रुवारी 2018 ते 7 फेब्रुवारी 2018 या कालावधीत नुतणीकरण करुन घ्यावे. नुतणीकरणाचा दि. 7 फेब्रुवारी 2018 ही अंतिम मुदत असून यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. नुतणीकरणापासून प्रवेशित पात्र विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालयाला सूचित करण्यात येते की, या कार्यप्रणाली बाबत दि. 5 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,बीड येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी या कार्यशाळेस शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचारी व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. ******

ग्रामपंचायत निवणुकीच्या संबधितांनी
संगणीकृत नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना
बीड,दि,3:- माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांसाठी संबंधितांचे नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्विकारण्याचे जाहिर केले होते परंतू मा. राज्य निवडणूक आयोगाचे 2 फेब्रुवारी 2018 च्या सुधारित आदेशानुसार पारंपारिक पध्दती ऐवजी संगणकीकृत ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार असल्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा नोडल अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहे.*******




शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

संत संस्कृतीचा पाया रचणारे                           
     संत नरहरी सोनार
मानवी जीवनाला सुवर्णाप्रमाणे आध्यात्मीक व मोहक मुलामा देणारे अनेक संत जगाच्या पाठीवर होऊन गेलेत. या संतानमुळे माणसाला जीवन जगण्याची आध्यात्मिक कास मिळाली. संत नसते तर काय झाले असते असा विचार कधी कुणी केला तर संत नसते तर जशी लाईट गेल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो तसेच आपले जीवन अंधारमय झाले असते. संत म्हणजे माणसाच्या जीवनाचा व संस्कृतीचा पाया आहे.  पाया नसेल तर भिंत कोसळुन पडेल तसेच संताचे अस्तित्व नसेल तर माणसाचे जीवनही आधुरे आहे. संत हे संस्कृतीचा पाया आहे. संत जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाच्या जीवनाचा रथ वेगवान घोडयाप्रमाणे धावत राहील. संत का? असावेत तर ते नैराश्यातुन अशावादाचा मार्ग दाखवितात. वारकरी साप्रादायाची पंरपरा आपल्याला फार पूर्वीपासून लाभली आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभुती जगाच्या कल्यणासाठी विविध जातीधर्मामध्ये संतानी जन्म घेतला आहे. यात महिला संतही काही कमी नव्हत्या संत कान्होपात्रा,संत जनाबाई संत मुक्ताबाई,संत मिराबाई, संत चोखा महार,संत सावता माळी,संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत नरहरी सोनार अशी विविध संत होऊन गेली आहे. वारकरी साप्रादायामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन वारकरी साप्रादाय वाढविण्याचा प्रयत्न  आठरा प्रगट जाती जमातीच्या लोकांनी केला असून यात पंढरपुरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला त्यांच्याबद्लचा हा लेख प्रपंच.
.                                                                                                   लेखिका
                                                                                     बेबीसरोज ग.अंबिलवादे(लोळगे),बीड
                                                                                              भ्र.9921136185


            संत हे गुरुच्या ठिकाणी असतात. देवानांही गुरु करावे लागलेत. श्रीकृष्णाने संदीपानी ऋषीला गुरु केले. रामाने वसिष्ठानां गुरु केले. श्री चक्रधर स्वामीनी श्री गोविंदप्रभुनां गुरु केले आणि दत्तात्रय महाराजांनी तर एक नव्हे दोन नव्हे तर चोवीस गुरु केले.कारण संत आणि गुरु हे संसाराच्या सिडीवरुन न डगमता कसे पाय उतार व्हायचे याचे तत्वज्ञान शिकवतात. म्हणून शिवाजी महाराजानीही राज्याची घडी नीट बसाविण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन लाभावे म्हणून तुकाराम महाराजांना गुरु मानले होते. संताचे शब्द ही आमृतवाणी आणि मराठी शारदेचा अंभच ठरावा इतकी ताकद त्यांच्या शब्दामध्ये  आहे.
               संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा सुंदर दागिने घडविण्याचा होता. त्यांची कलाकुसर महाराष्ट्रभर प्रसिध्द होती. त्यांच्यातील कलाकुसर, मितभाषी, लाघवी बोलण्याची लकब, प्रेमळ स्वाभाव, धार्मिक वृत्तीमुळे लोक त्यांचे नाव ऐकुनच त्यांच्याकडे दागिने घडविण्यासाठी येत असत. संत नरहरी सोनाराची वाणी जीवन जगतांना विवेकाची वाट दाखवित असे. वारकरी पथांची भागवत धर्माची पताका संत नरहरी सोनारानी महाराष्ट्रभर फडकवली आहे. खरे तर नरहरी शिवभक्त होते पण त्यांच्या भक्तीने मनातील व्दैतभावनं त्यांना विठ्ठल भक्त बनविले आहे. त्यांची ही थोडक्यात आख्यायिका.
               अच्युपंत आणि सावित्री यांची पोटी शिवाच्या प्रसादाने अमुल्य असे रत्न प्राप्त झाले त्यांचे नाव त्यांनी नरहार असे ठेवले. आठव्या वर्षी नरहरची मुंज झाली आणि त्यांना चांगले संस्कार लागावे म्हणुन गुरुकुळात पाठविण्यात आले. नरहरवर आध्यात्मिक संस्कार झाल्यमुळे त्यांना शिवाच्या भक्तीतच आनंद वाटु लागला. गुरुकुळातील संस्कार पूर्ण झाल्यानंतर ते आईवडिलाकडे गृहस्थ आश्रमी आले. घरात त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली पण नरहरवर आश्रमांत संन्यासव्रताचे संस्कार झाल्यामुळे संसार हा त्यांना नाशिवंत व मिथ्य वाटु लागला पण केवळ गुरु आज्ञेमुळे व आई वडीलाच्या आग्रहाखातर त्यांनी गंगा नावाच्या मुलीशी विवाह केला. गंगाही धार्मिक वृत्तीची व पती आज्ञा पाळणारी असल्यामुळे नरहरीच्या जीवनात संसाराबरोबरच आध्यात्माचे पालन चालु होते.कारण पत्नी धार्मिक,सोज्वळ,पती आज्ञा पाळणारी असेल तर संसरातही स्वर्ग नांदतो हे गंगाने दाखवुन दिले आहे. नरहर केवळ जगाच्या देखव्यासाठी संसार करत होते. खरे तर त्यांचा पींड हा सन्याशी वृतीने राहून जगाच्या कल्याणाचा होता. नरहरी मात्र संसारात न रमता शिवनामातच आनंद मानत होते. 
      देवाचा  मी सोनार,नाव माझे नरहर,दागिने सोन्याचे घडवितो, हिरे कोदंणात मढवितो, अशी कलाकुसर सुंदर नाव माझे नरहर//1// भाव शिवचरणी ठेवतो, बेलपत्री नित्य वाहतो, मुखाने म्हणतो हरहर नाव माझे नरहर//2// सोने हरीनामाचे चोरतो, नाते शिवाशी जोडतो, व्यवहार कौशल्या चतूर नाव माझे नरहर //3//प्रपंच नेटका मी करतो लाघवी वाणी मी बोलतो, लक्ष असते पिंडीवर नाव माझे नरहर  //4//अज्ञानाचा अंधकार मिटवितो वाट मोक्षाची मिळवितो,जन्म घेऊन धरतीवर नाव माझे नरहर//5//जन्म सावित्रीच्या पोटी घेतो,व्यापार शिवनामाचा करतो,जामुवतांने घेतला आवतार नाव माझे नरहर //6/ पंढरपूर पावण भूमीत अनुराधा  या नक्षत्रात, झाला नरहरी आवतार देवाचा मी सोनार  नाव माझे नरहर  //7// याप्रमाणे नरहरी संसारात राहूनही शिवनामाचे सोने हरिनामाच्या कात्रीने चोरुन संसारसागराच्या भवचक्राचे छेदन करीत जीवनाचे हित कशात आहे. हा संसार म्हणजे दुखाचा भवसागर आहे हे ज्ञान त्यांना असल्यामुळे ते या भवचक्राची एक एक सिडी प्रभुनामाच्या गजराने पार करत होते. आध्यात्माचे ज्ञान झाल्याने नाशिवंत गोष्टीत त्यांना कधीच रममान व्हावे वाटले नाही. त्यांच्या मनातील व्दैत आव्दैताचा भाव नष्ट करण्यासाठी एक चमत्कार घडला.
              असेच सकाळी आपला पुजापाठ आटोपुन ते दुकानात इश्वर चितंन करत बसले असता. एक सावकार दुकानात आले आणि म्हणाले नरहरी सोनाराचे दुकान हेच आहेना? हो मीच नरहरी सोनार. अंत्यत विनम्रपणे ते म्हणाले कोणता अलंकार घडवायचा आहे आपल्याला. तेव्हा सावकार म्हणाले मी जवळच्या गावात राहणारा सावकार, तुम्ही खूप चांगले सुवर्ण अलंकार घडवतात असे मी ऐकले आहे. मला विठ्ठलासाठी  एक सोन्याचा करदोडा करायचा आहे. नरहरी  म्हणाले तुम्हाला पाहीजे तसा करदोडा मी बनवून देईन, तुम्ही माप व्यवस्थित आणून द्या.सावकाराने रेशमाच्या दो-याने माप आणून दिले आणि म्हणाले मला आगदी या मापाच्या तंतोतंत करदोडा बणून हवा आहे. नरहरी म्हणाले या मापाच्या तंतोतंत सुवर्णाचा करदोडा बनून देतो. दोन तीन दिवसानी सावकार करदोडा घेण्यास आले. सावकारांनी करदोडा हातात घेतला अन् त्यांना संत श्री नरहरीच्या कलाकौशल्याचा खरच हेवा वाटु लागला. ते म्हणाले खरंच तुम्ही खूपच सुंदर सुवर्ण करदोडा बनविला आहे. नावप्रमाणेच तुमचे कामही कौतुकास्पद आहे हे आज मला कळले. हा हिरे,रत्न,पाचु जडीत करदोडा घेऊन मोठया आनंदाने सावकार विठ्ठलाच्या मंदिरात गेले. पुजाअर्चा करुन करदोडा कमरेला बांधू लागले पण तंतोतंत केलेला करदोडा चार बोटे मोठा झाला. सावकार नरहरीच्या दुकानात आले आणि म्हणाले करदोडा चार बोटे मोठा झाला आहे. नरहरी म्हणाले मी तर आगदी तंतोतंत केला आहे. सावकार म्हणाले बहुतेक माझ्याच हातून माप जास्त झाले असावे. नरहरीने तो चार बोटे कमी करुन दिला. पुन्हा सावकार मंदिरात गेले करदोडा बांधू लागले तर तो चार बोटे कमी पडला सावकारालाही आश्चर्य वाटले.
               सावकार नरहरीला म्हणाले नरहरी तुम्ही स्वत:च मंदिरात चला आणि विठ्ठलाच्या कमरेचे माप घ्या. नरहरी मोठया अडचणीत आले. पण धीर करुन म्हणाले माफ करा सावकार मी शिव मंदिराशिवाय कोणत्याच मंदिरात जात नाही. सावकार जिद्दीलाच पेटले ते म्हणाले नाही तुम्ही स्वत: मंदिरात माप घ्यायला आल्याशिवाय मी परत जाणार नाही. नरहरी म्हणाले मी माझ्या डोळयावर पट्टी बांधुन येईल, विठ्ठलाची मुर्ती पाहणार नाही. मग त्यांनी डोळयावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मुर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तेव्हा त्यांना हाताला महादेवाची पींड लागली. त्यांनी डोळे उघडून पाहीले तर विठ्ठलाची मुर्ती समोर उभी. त्यांनी पुन्हा डोळयावर पट्टी बांधली तर पुन्हा तोच चमत्कार, महादेवाची पींड हाताला लागली. आता त्यांच्या सर्वागांला दरदरुन  घाम सुटला होता.अंगावर काटा उभा राहीला होता. थरथरत्या हाताने ते पुन्हा पुन्हा मुर्ती चाचपडू लागले. देहभान विसरुन मुर्तीकडे पाहतच राहिले. विठ्ठलाच्या मुर्तीमध्येच त्यांना त्यांचे आरध्य दैवत शिवाची र्पिड दिसत होती. त्यांनी सद्गतीत अंतकरणाने मनोभावे प्रार्थाना केली आणि पश्चताप दग्ध होऊन म्हणाले मी शिव आणि विठ्ठल वेगळे मानले पण हे दोघेही एकच आहेत.अशा या हरीहराच्या साक्षत्काराने शिवभक्त हे विठ्ठल भक्त झाले. पुढे ते संसारात जास्त रमले नाहीत. त्यांना त्यांना नाशिवंत भवसागर पार करुन मोक्षाचा पैलतीर गाठायचा होता. प्रपंच्याचा मोह त्यागुन ते हरनामात व्यापुन गेले होते. आपल्या अमोघ वाणीतुन ते समाजाला आध्यात्माचे प्रबोधन करत असतांनांच आता शेवटची जीवनमुक्तीची घटिका येऊन थांबली होती त्यांना माहित होते काळ हा कुणासाठी थांबत नाही शेवटी हरनामाची अक्षरे ओठात आणि परमेश्वराची मुर्ती डोळयात साठवत त्यांनी शककर्ता शालिवाहन बाराशे पस्तीस जाटा प्रमादी नामे संवत्सर पूर्ण/ माघ प्रतिपदेला वैकुंठ गमण केले. अशा या संतानी समाजासाठी आपला देह झिजविला. संत संस्कृतीचा पाया रचनारे संत नरहरी सोनार त्यांना कोटी कोटी प्रणाम.