बुधवार, २३ जानेवारी, २०१९


जिल्हाधिकारी कार्यालयात
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

            बीड, दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी    यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रंकुमार कांबळे, तहसीलदार के.ए.वाघमारे, तहसीलदार श्रीमती मनीषा तेलभाते,  नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड, नायब तहसीलदार श्री.मंदे, नायब तहसीलदार श्री.महाजन, नायब तहसीलदार सय्यद कलीम आणि विविध शाखेतील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
             
-*-*-*-*-

                                 


गुरुवार, १७ जानेवारी, २०१९







वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजनेची बैठक संपन्न

जिल्हयातील विविध विकासासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे
यांनी केली 96 कोटी 97 लक्ष रुपयाची
अतिरिक्त निधीची मागणी

                 बीड, दि ,17 :-(जिमाका) जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 17 जानेवारी 2019 औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात संपन्न झाली.  बीड जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 96 कोटी 97 लक्ष रुपयाची  अतिरिक्त वाढीव निधीची मागणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली.
                 यावेळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. के. आगवाने आदींची उपस्थिती होती.
          सन 2019-20 यावर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 235 कोटी 83 लक्ष रुपयाची वित्तीय मर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे. परंतू बीड जिल्हयाच्या सर्वांगिंन विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. जिल्हयातील कृषि व सलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक सामुहिक सेवा, पाटबंधारे व पुरनियंत्रण, उर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य अर्थिक सेवा, टंचांई/नैसर्गिक आपत्ती , पशुसंवर्धन, नगरविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, सामान्य शिक्षण , आरोग्य, तंत्रशिक्षण या कामासाठी निधीची आवश्यकता आहे.
          यावेळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात अनेक गुणवंत व चांगले खेळाडू आहेत.  या खेळाडूंना चालना मिळावी व राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून  राज्याचा तसेच जिल्हयाचा  नावलौकिक वाढवावा यासाठी क्रीडांगण विकासासाठी बीड जिल्हयाला अधिकचा निधी देण्याची मागणी करत बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या शाळांच्या कामाचे उद्घाटन येत्या 26 जानेवारी रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अधिकचा निधी  देण्याची मागणीही पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी केली.
                जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी जिल्हा वार्षिक योजना 2019-20 चा तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडयामध्ये जिल्हयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची पॉवरपॉईंटच्या माध्यमातून मंत्री महोदयांना माहिती देत जिल्हयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या वाढीव निधीची मागणी केली.  या बैठकीस जिल्हास्तरीय सर्व कार्यालयप्रमुख उपस्थित होते.
-*-*-*-*-*-


अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठीच्या योजनांचा लाभ
गरजू लाभार्थ्यांना होणे गरजेचे
                                                                                  

 - उपाध्यक्ष ज. मो.अभ्यंकर

                 बीड, दि ,17 :-(जिमाका) शासन अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवित असून या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे असून अल्पसंख्यांक समाजातील गरजू लाभार्थी  या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी अशा सुचना अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
                बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य अल्पंसख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी आज अल्पसंख्यांक समाजाच्या योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती उस्मानी नजमा, शिक्षणविस्तार अधिकारी व्ही.एन.राठोड, शासकीय तंत्रनिकेतन अधिविख्याता जे.एफ.सय्यद, शिक्षणविस्तार अधिकारी श्री. धोत्रे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आ‍र्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक  सय्यद इम्रान काद्री, अ. का. सय्यद कलीम अहमद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                  बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी विविध समाजाच्या मंडळांची  भेट घेतली. यावेळी विविध संघटना, संस्था व नागरिका कडून निवेदने उपाध्यक्षांना प्राप्त झालेल्या निवेदनाचा आढावा घेवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना देवून                  या बैठकीत पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच अल्पसंख्यांक समाजातील गरजू लाभार्थ्यांना शिक्षणाच्या संधी वाढविणे, एकात्मिक बाल विकास सेवांची पुरेशी उपलब्धता शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे, सर्व शिक्षा अभियान, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्यांक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यवृध्दी, आर्थिक कार्यासाठी कर्जसहाय्य आदी बाबीवर आढावा घेऊन योग्य ते कार्यवाही करण्याच्या सुचना उपाध्यक्ष श्री. अभ्यकंर यांनी संबंधितांना केल्या.
-*-*-*-*-*-

बुधवार, १६ जानेवारी, २०१९








पाटोदा येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते
पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

                   बीड, दि ,16 :-  पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत व    निवासस्थान बांधकामाचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
                या कार्यक्रमास आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हंगे, पंचायत समिती सभापती पुष्पाताई सोनवणे, पाटोदा नगराध्यक्षा अनिता नारायणकर, उपसभापती संगीताताई मिसाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, प. स.सदस्य सुवर्णाताई लांबरुड, महेंद्र नागरगोजे,देविदास शेंडगे, विद्याधर येवले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ए. एम. बेदरे, उपअभियंता डी. आर. साळवे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्हयात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या सर्व पंचायत समितीच्या अद्यावत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असल्याने याचा फायदा सर्वांना होणार असून गरजू नागरिकांची कामेही वेळेत पूर्ण  होण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्याची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. येणाऱ्या काळात ज्या गावांची रस्त्यांची मागणी आहे त्या गावांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. असे सांगून  जिल्ह्यातील रस्त्याची कामे पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील गावांना तसेच नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील नागरीक व शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उभारण्यास मदत होईल.  महामार्गाच्या रस्त्यामुळे दळनवळणाची सुविधा चांगली झाल्याने नवीन उद्योगाची उभारणी होईल त्यामुळे त्या भागातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
                पाटोदा येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत दोन मजली असून या इमारतीच्या बांधकामासाठी 350 लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पंचायत समिती सभापती, अधिकारी, कर्मचाऱ्यासाठी एकूण 20 निवासस्थानाचे बांधकाम होणार असून यासाठी 460 लक्ष खर्चास प्रशासकीय मंजूरी प्राप्त आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची आष्टी,पाटोदा,शिरुर तालुक्यातील 424.43 कि.मी. लांबीची 95 कामे मंजूर असून या कामासाठी 250.55 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पाटोदा येथे 356 लक्ष रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणाऱ्या राज्यमार्ग 56 ते ढवळेवाडी रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. तसेच पालकमंत्री पंकजा मुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांच्या महिलांना व पाटोदा पंचायत समितीकडून अपंग लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदीसाठी आणि घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच सुवर्णपदक विजेता खेळाडू धनराज गंगाराम नागरगोजे याचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
               यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज भूमीपूजन झाल्यामुळे या भागातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तसेच जिल्हयातील सर्व पंचायत समितीच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्यामुळे येणाऱ्या काळात सर्व तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या अद्यावत नविन इमारती तयार होतील, असे सांगून पाटोदा शहर पाणी पूरवठा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच जनावरांसाठी चारा छावण्या, नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी मनरेगाची कामे सुरु करण्याची  गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              यावेळी बोलताना भिमराव धोंडे म्हणाले की, जिल्हयात कमी पाऊसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न  निर्माण झाला असून टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. पाटोदा, आष्टी, शिरुर तालूक्यातील रस्त्याची कामे सुरु झाल्यामुळे त्या भागातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. असे सांगून त्यांनी पीकविमा, रोहयोच्या माध्यमातून विहीर मंजूरी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूरी आदी प्रश्न  त्यांनी यावेळी उपस्थित केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी केले. या कार्यक्रमास या भागातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९




जिल्हा वार्षीक नियोजन समितीच्या सभागृहामध्ये पालकमंत्री यांच्या
उपस्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक सपंन्न

         बीड, दि.15:- (जिमाका) दि. 15 जानेवारी 2019 रोजी जिल्हा वार्षीक नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी स्वत: ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रात्यक्षिक करुन पाहिले व काचेच्या पारदर्शी स्क्रिनवर केलेल्या मतदानाची खात्री केली.
                  यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी या मशिन बद्दल यथोचित माहिती दिली. यावेळी खासदार डॉ.प्रितम मुंडे, आ.भिमराव धोंडे,आ.लक्ष्मन पवार,आ.आर.टी. देशमुख यांनीही ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रात्यक्षिक करुन मतदानाची खात्री करुन घेतली व समाधान व्यक्त केले.
                 यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर,आ.सुरेश धस,आ. संगिता ठोबंरे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार,रमेश पोकळे,कुंडलिक खांडे,जि.प.सदस्य,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सर्व उपविभागीय अधिकारी,तहसिलदार, विविध खात्याचे विभाग प्रमुख इत्यादी उपस्थित होते.





दूष्काळी उपाययोजनांसह क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी भरीव तरतूद
                                    -- पालकमंत्री पंकजा मुंडे
·      जिल्हा नियोजन समितीची  2019- 20 च्या प्रारुप आराखडयास मंजूरी
·      अतिरिक्त 81 कोटी 97 लाखांच्या मागणीसह 327 कोटी 57 लाख रुपयांचा आराखडा

         बीड, दि.15:- (जिमाका) जिल्हयाच्या विकासासाठी  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून   मोठी आर्थिक तरतुद करीत असून त्याचा विनियोग तातडीने होणे गरजेचे आहे. दूष्काळी उपाययोजनासह विशेषता युवकांच्या व क्रीडा विकासाच्या बाबी लक्षात घेता याच मातीतील कुस्ती,मल्लखांब,कबड्डी, पोहणे आदी खेळांना प्रोत्साहन मिळेल अशा सोयीसुविधा संपन्‌न क्रीडांगणाचा विकास पायलट प्रकल्प म्हणून केला जावा, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.  
         जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्राचा सन 2019- 20 साठी 327 कोटी 57 लाखाचा प्रस्तावित तरतुदीसह एकूण 81 काटी 97 लाखाच्या विविध विभागाच्या अतिरिक्त मागण्यासह सादर करण्यात आलेल्या प्रारुप आराखडयास मंजूरी देण्यात आली.
         जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री  श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक संपन्‌न झाली. बैठकीस खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ. जयदत्त क्षीरसागर, सुरेस धस, आ. भिराव धोंडे आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी देशमुख,आ. श्रीमती संगिता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी.सिह. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच समितीचे सर्व सन्माननिय सदस्य,विविध शासकीय विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
          प्रारुप आरखडयावरील चर्चेप्रसंगी बोलतांना श्रीमती मुंडे म्हणाल्या प्राथमिक शाळांचे वर्गखोल्यांच्या दूरुस्तीसाठी मोठी तरतूद केली असून त्यामुळे जिल्हयातील शाळांना नवे रुप प्राप्त होईल.अंगणवाडींचे बांधकाम करण्यासाठी देखील असणा-या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतांना केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने यापुढे अंगणवाडी बांधकामासाठी प्रीकास्टींग तंत्राचा वापर करण्यात येईल व यातुन जिल्हयासाठी मंजूर झालेल्या सर्व अंगणवाडयांचे बांधकाम केले जाईल याकडे यंत्रणेने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.
           पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या यंदा दुष्काळामुळे शासनापुढील प्राधान्यक्रम बदलेले आहेत. परंतू ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरव्दारे पाणी पुरवठा गरज असलेल्या गावांना व भागाला व्हावा यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन ते तालुकास्तरावर देण्यात आले आहेत. याचा फायदा वेळेत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी होईल, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
         या प्रसंगी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हयातील क्रीडा विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. आ. लक्ष्मण पवार यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्धतेबाबत मागणी मांडली. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न जिल्हयात गंभीर असल्याची बाब सांगितली. आ. सुरेश धस यांनी जिल्हयासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कुकडीमधून पाणी घेण्याबाबत मागणी मांडली तसेच 2016 च्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या तलावांची दूरुस्ती होण्याची गरज मांडली तसेच यावेळी आ. आर.टी. देशमुख आ. श्रीमती संगिता ठोंबरे यासह विविध सदस्यांनी आपली मते मांडली.  
        यावेळी लोकसंख्येवर अधारित जिल्हयात 13 प्राथमिक आरोग्य केंद्र व 38 उपकेंद्रांच्या मंजूरीबाबत ठराव मांडण्यात आला व अध्यक्षाच्या मान्यतेने विविध विषयांवरील ऐनवेळेच्या दाखल ठरावानां मंजूरी देण्यात आली.                        
         जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी नाविन्यपूर्ण योजनेतून 11 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातुन वैशिष्टयपूर्ण कामांना चालना दिली जाईल असे सांगितले. यासह आज सादर केलेल्या प्रस्तावित तरतुदीमध्ये सर्वसाधारणसाठी 235 कोटी 83 लाख रुपये, जिल्हा वार्षिक उपयोजनांसाठी 89 कोटी 60 लाख रुपये, आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्रासाठी 2 कोटी 14 लाख रुपयांचे नियोजन प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी बी.के. आगवाने यांनी जिल्हा वार्षिक योजनच्या आराखडयाचे सादरीकरण केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  सचिन मडावी यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचे सादरीकरण केले.
       प्रारुप आराखडयामध्ये राष्ट्रीय शाश्‍वत कृषी अभियान,कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान, सिंचन विकास, शेतकरी प्रशिक्षण आदिसांठी 13 कोटी 49 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली तसेच कृषी सलग्न सेवा, पशु संवर्धन, जलसंधारण यासाठी देखील भरीव निधी मंजूर करण्यात आला.वने, ग्रामविकास, नगरविकास, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य्‍, पाणीपुरवठा, मागसवर्गीयांचे कल्याण, महिला व बालविकास आदी कामांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी मांडलेल्या 81 कोटी 97 लाख रुपयांच्या आतिरिक्त मागणी प्रस्तावांना देखील मान्यता देण्यात आली.
                                             *********

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९


   प्रासंगिक लेख

                                 शिवरांयाच्या मनात  स्वराज्य स्थापनेच                
                                    बीज पेरणा-या राजमाता जिजाऊ

                 बुलढाणा जिल्हयातील सिंदखडराजा येथे आई म्हाळसा व वडील लखोजीराव जाधव या राजघराण्यात जीजाबाईचां जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. राजघराण्यात जन्माला आल्या असल्याने राजकारणाच्या न्याय,नितिचे बाळकडू त्यांना लाहनपणीच मिळाले. ज्या वयात मुली चुलबोळक्याच्या खेळात तल्लीन असतात त्या वयात जिजाऊन तलवारची मूठ मजबूतपणे पकडत युध्दाचे धडे घेतले. मुलगी म्हणून त्यांनी केवळ स्त्रीसुलभ कल्पनेला कवटाळत न बसता युध्दकौशल्यात प्राविण्य मिळविले. अल्पवयातच त्यांचा शहाजीराजे भोसलेसोबत   विवाह झाला.      
                      जिजाबाई चतूर,मुद्सुद्दी,बुध्दीमान,करारी व्यक्तीमत्वाच्या स्त्री होत्या. आलेल्या बिकट परिस्थितीला तोंड देण्याच धैर्य त्याच्यांत होत. जिजाबाईच्या पठडीत केवळ शिवबाच घडले नाही तर त्यांच्या सोबत मावळेही तेवढयाच ताकतीने स्वराज्यासाठी लढायला तयार झाले. त्या केवळ शिवबांच्याच माता न होता आवघ्या महाराष्ट्राच्या माता झाल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत व माणसाच्या मनात,आचरणात स्वाभिमानाचे बीज पेरल. शिवबांच्या मनात केवळ कतृत्वाची ठीणगीच न पेटवता राजनिती, सामाजिक मुल्यही शिकविले. त्यांनी बालपणीच शिवरायांना स्वराज्याच स्वप्न दाखविल. जिजाऊ त्यांना शिवबा न म्हणता बाळराजे म्हणत असत याचाच आर्थ त्यांना राजा होऊन स्वराज्य स्थापन करायची, पिडीत जनतेची सुटका करुन स्वराज्याची धुरा सांभळायची जाणीवच त्यांनी या शब्दातुन करुन दिली होती. जिजाऊनी आपल्याच शाळेत शिवबांना राज्याची कर्तव्य,नितीमुल्ये,स्वतंत्र्य,समता,बंधूता याचे धडे दिले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तसेच शिवबांना स्वराज्य स्थापन्याची प्रेरणा देणा-या,त्यांच्या मनात अन्ययाविरुध्द लढण्याची अंगार पेटविणा-या राजमाता जिजाऊंनी मानवी मुल्याचे विचारही पेरले.
              शुरवीर जिजाऊ बाहेरुन जेवढया कणखर होत्या तेवढयाच आतुन नारळासारख्या मऊ,प्रेमळ होत्या. ज्यावेळी शत्रुंचे सरदार भर रस्त्यावर आया बहिनींची आब्रु वेशीवर टांगत होते, जनावराप्रमाणे मुलींचा लीलाव होत होता,स्वतंत्र्य विसरुन समाज निमुटपणे अन्याय सहन करत होता. शेतक-यांनी मोत्यासारख पीक घेऊन,रक्कताच पाणी करुन पीकविलेल धान्य बादशहाच्या कणगीत जमा होत होत. कष्टाने घाम गाळून पिकवलेल्या सोन्यासारख्या पीकाचा एक घासही शेतक-यानां सुखाने खायला मिळत नव्हता. हा अन्याय,अत्याचार पाहून जिजाऊच अंतकरण तुटत होत. त्या डबडबल्या उोळयानी हिंदवी स्वराज्य स्थापन करणा-या पराक्रमी पुत्राची वाट पाहत होत्या. यासाठी त्यांना तेजस्वी,पराक्रमी,लढाऊ,सामर्थ्यावान अन्यायाला छेदुन पारतंत्र्यात अडकलेल्या समाजाला मोकळा श्वास घेण्यासाठी,  शत्रुविरुध्द लढणारा, रयतेला गुलामगिरीतुन मुक्त करणारा  पुत्र हवा होता. स्वराज्य संकल्पनेचे डोहाळे जिजाऊना लागले होते.  
               अन्याय,अत्याचाराला कुठे तरी आळा बसावा,महिलांना निर्भयपणे वावरता यावे यासाठी वीरमाता जिजाऊ आपल्या मनाशी दृढ निश्चय करुन हिदंवी स्वराज्याची स्थापना करणारा वीरपुत्र जन्माला यावा म्हणून त्यांच्या कुलदैवताकडे साकडे घालत हेात्या.देशात माजलेला हलकल्लोळ थांबविण्यासाठी,जनतेवर होणार अन्याय थांबविण्यासाठी, रयतेच्या रक्षण करण्यासाठी,हिंदवी स्वराज्याची स्थापना करणयासाठी माझ्या पोटी शुरवीर पुत्र जन्माला यावा म्हणून करुणा भाकत होत्या. आपला पदर त्या भवानी मातेसमोर पसरुन ज्या माय माऊल्यांची इज्जत लुटल्या जात होती. त्यांचे रक्षण करणारा लढावू पूत्र  या पदराखाली माझ्या माय माऊल्यांना सुखाने जगता येईल असा पुत्र दे म्हणून ध्यास घेतला होता. इ.स. 1630 मध्ये पुणे जिल्हयातील जुन्नर शहराजवळ घनदाट वनराईच्या कुशीत वसलेल्या शिवनेरी किल्यावर शिवबांचा जन्म झाला. जिजाऊंचे पाच पुत्र मृत्युमुखी पडले होते. हा सहावा पूत्र तुळजा भवानीचा प्रसन्नतेचा प्रसाद होता. एकटे शिवाजी जगले  जिजाऊचीं ही करुणामय प्रार्थानां सफल झाली होती. तळपत्या सुर्याचे तेज घेऊन जन्माला आलेल्या बाळराजानां मॉ जिजाऊने महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून स्वराज्य स्थापनेचे तोरण बांधायची संकल्पना त्यांच्या तनामनात रुजवली होती.या पुत्राला राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार करायला सुरुवात केली. चौदा वर्षाचे शिवबा असतांना जिजाऊ पुण्याला रहायला गेल्या. त्याकाळी पुण्याची अवस्था खुप दयनिय होती. जिजाऊच्या देखरेखीखाली पुण्याचा पुर्नविकास झाला.
            जिजाऊच्या पठडीत शिवबा तयार होत होते. त्यांना केवळ राजनिती,समान न्याय देण्याची वृत्तीच न शिकवता अन्याय करणाराला कठोर शासन देण्याचे धाडसही शिकविले. निर्भयपणे युध्दाचा सामना करण्याचे धडे दिले,शस्त्राच्या प्रशिक्षणावर स्वत: लक्ष दिले. स्वराज्याची स्थापना केवळ एकटे शिवबा करु शकणार नव्हते शिवबांना संघटन कौशल्यही शिकविले. राज्य चालविण्यासाठी केवळ शक्तीच पुरेशी नसून युक्तीही महत्वाची होती. म्हणूनच शाहिस्तेखानाला युक्तीने पराजित करण्याचे कौशल्य जिजाबाईनीं दिले होते.  जिजाऊ नुसते प्रशिक्षण देऊनच थांबल्या नाही तर शिवबा मोठया मोहिमेवर असतांना त्या स्वत: राज्य कारभारावर बारीक लक्ष ठेवायच्या. राज्यांचा सर्व स्वा-यांचा तपशील त्या ठेवत असत. त्यांच्या खलबतात, सल्लामसलतीत भाग घेत असत. राजाच्या गैरहजेरीत स्वत: राज्यांची धुरा जिजाऊ सांभळत हेात्या.
            स्वराज्य स्थापन्यसाठी जे बीज राजमाता जिजाऊने शिवबांच्या मनात पेरल होत. त्याला केवळ अंकुरच न निघता तो आता महान वटवृक्ष झाला होता. शिवाजी राज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली पाहून राज्यभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1674 साली त्यांनी स्वतंत्र्य हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. शिवरांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ठिणगी टाकून ती संकल्पना सत्यात उतरविण्यसाठी राजमाता जिजाऊने अपार कष्ट घेऊन,स्वत: हातात शस्त्र घेऊन त्या हिंदवी स्वराज्यसाठी तर लढल्याच पण आपल्या तालमीत सर्वांगीन विकासासाठी  रयतेला गुलामगिरतुन मुक्त करण्यासाठी राष्ट्राला शूरविर पुत्र अर्पण केला. आपणही अन्याय अत्याचाराविरुध्द आपल्या पुत्राला लढण्याची शिकवण आजच्या मातांनी देण्याचा संकल्प केला तर काही अंशी तरी राजमाता जिजाऊच्या तत्वावर आपण वागत असल्याचा आनंद आपल्याला मिळेल अन् ख-या अर्थाने राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊचीं जयती साजरी होईल, अशी अपेक्षा.  
                                                                                                                            बेबीसरोज अंबिलवादे,
                                                                                                                                    बीड
.

सोमवार, ७ जानेवारी, २०१९


प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या फिरत्या वाहनाला
पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट
            बीड दि. 7 :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची फिरत्या वाहनाद्वारे प्रचार व प्रसार वाहनाला परळी येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जुगलकिशोर लोहिया, गोपीनाथ पवार,मुद्रा योजनेचे सदस्य बाळासाहेब चव्हाण, सुशील हरगुळे,  अरुण पातक, योगेश मेनकुदळे,सचिन गिते उपस्थित होते.
           यावेळी बोलताना मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, जिल्यातील जास्तीत जास्त तरुणांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा, उद्योजक बनण्याचे स्वन्प उराशी बाळगून त्यादृष्टीने नियोजित प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल, अशा शुभेच्छा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.
             जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्मय समितीवर अशासकीय सदस्यांची निवड
       जिल्हा प्रशासनाच्या जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीवर अशासकीय सदस्यांची निवड केली असून त्यामध्ये ॲड. अरुण अशोक पाठक, पाठक निवास, पंचशील नगर, परळी वै., मोहम्मद अजहरुद्यीन मोहम्मद सलीम ,अ‍जीजपुरा, ता.जि. बीड, सुशील पुभूआप्पा हरंगुळे ,अंबेवेस,परळी वै.,शेख फारुक शेख शबीर,चौरे इस्टेट,बागलाने नगर,जालना रोड,बीड, महेश फुलचंद शेप, दिख्खत निवास, प्रशांत नगर, ता. अंबाजोगाई जि.बीड, संजय शाहुराव सानप ,वडझरी ता. पाटोदा जि. बीड, दिपक प्रकाश सुरवसे, गेवराई जि.बीड,  संतोष बाबुराव सोळंके, नागापूर ता.परळी वै., बाळासाहेब भाऊराव चव्हाण, कौठळी तांडा ता. परळी वै. यांचा समावेश आहे.
*-*-*-*-*-*-*


शनिवार, ५ जानेवारी, २०१९









धारुरच्या विकासासाठी 24 कोटी रुपये
-- पालकमंत्री पंकजा मुंढे

              बीड,दि.05:- (जिमाका) लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण आरोग्य,पोषण यासाठी काम करतांना शासनाने शिक्षण,रहिवासी तसेच अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय, उज्वला गॅस  देण्यासाठी योजना राबविल्या आहेत.यातुनच धारुरच्या विकासासाठी 24 कोटी रुपये निधी दिला, असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंढे  यांनी केले.
              किल्ले धारुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन श्रीमती मुंढे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी खासदार डॉ. प्रितम मुंढे,आमदार श्रीमती संगिता ठोंबरे,आमदार आर.टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार,केशवदादा आंधळे,रमेश आडसकर,मोहनराव जगताप, सहाल चाऊस,उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार,नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी आदी उपस्थित होते.
        मंत्री श्रीमती मुंढे म्हणाल्या,जिल्हयाचा चेहरा मोहरा बदलताना एक विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या विविध योजनातून मोठा निधी दिला. यामध्ये 25/15 योजनेतून 60 कोटी रुपये,शाळा दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपये यासह ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी निधी दिल्याचा उल्लेख श्रीमती मुंढे यांनी केला.
            त्या म्हणाल्या,विद्यार्थी युवकांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अभ्यसासिका उभारुन त्यामध्ये सोलर विद्युत  पुरवठा देऊन कायम स्वरुपी व्यवस्था निर्माण करणार आहे. महिलांच्या उन्नतीसाठी गावांमध्ये बचतगटासाठी वास्तु उभारणार आहे, असे मंत्री पंकजा मुंढे यांनी सांगितले.
            यावेळी दिनदयाळ अंत्योदय योजनेच्या लाभार्थी बचतगटांना निधीचे प्रमाणपत्रे देण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विविध सामाजिक संस्थांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला. याप्रसंगी नवीन प्रशासकीय इमारतीची मंत्री श्रीमती मुंढे यांनी पाहणी केली. नगर परिषदेच्या इमारतीसाठी शासनाने 1 कोटी 70 लाख रुपये खर्च करुन तीन मजली सुसज्ज वास्तु उभी करण्यात आली.   
                                                                           *******
                            
वृत्त क्र. 18


                              उच्च व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

          बीड,दि.5:- (जिमाका) पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी या परीक्षा  17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या. 17 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 रोजी घेण्यात येणार असल्याने या परिक्षा  24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                                        *******





ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर 47 हजार
मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करुन पाहिले

     बीड दि.05 (जिमाका) :- जिल्हाभरात सध्या 22 टिममार्फत M-3 व्हर्जनच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम सुरु आहे. सदर कार्यक्रम दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 1042 ठिकाणी 47270 मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनवर प्रत्यक्ष मतदान करुन पाहिले. जिल्हाभर सर्व 2311 मतदार केंद्रावर तसेच महाविद्यालय, सर्व शासकीय कार्यालय, आठवडी बाजार, प्रमुख चौक इत्यादी प्रमुख ठिकाणासह एकुण 3209 ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. डी. सिंह, भा.प्र.से. यांचे अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठी च्या निवडणूकीच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांची बैठक झाली.
           भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री.  सिंह यांनी तालुकानिहाय निवडणूक विषयक बाबीचा आढावा घेतला.
          नविन प्रकारच्या व्हीव्हीपॅट मशिनवरील सांकेतीक उमेदवाराचे नावासमोरील निळे रंगाचे बटन दाबल्यांवर व्हीव्हीपॅट मशिनवरील काचेच्या पारदर्शी स्क्रिनखाली मतदारांने मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, उमेदवाराचे सांकेतीक नाव आणि उमेदवाराचे सांकेतीक चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनच्या काचेमधून मतदारास दिसते आणि स्वत: खात्री करुन घेता येते.
जिल्हाभरात ही जनजागृती मोहिम आणखी एक महिनाभर चालू राहणार असुन सदर कालावधीत उर्वरित सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी ही मोहिम राबविणे बाबत मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बीड यांनी सूचना दिल्या.
प्रशिक्षणास जिल्हयातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, निवडणूक नायब तहसिलदार, निवडणूक विषयक कर्मचारी इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
                                               *-*-*-*-*-*





नगर-कडा रेल्वेमार्गावर 15 दिवसात रेल्वेचाचणी - पंकजा मुंढे
     बीड दि.0 5 (जिमाका) :- जिल्हयाच्या इतिहासात मोठी घटना ठरणारी नगर-परळी रेल्वे मार्गापैकी नगर-कडा मार्गावर 15 दिवसात रेल्वे चाचणी घेण्यात येणार असून जिल्हयाच्या व शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी केले.
     परळी येथे राज्य शासनाच्या 5 कोटी रुपये विशेष रस्ता अनुदानातून शहरातील विविध ठिकाणी कामांचा शुभारंभ मंत्री श्रीमती पंकजा मुंढे यांच्या हस्ते झाला यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार डॉ. प्रितम मुंढे, माजलगावचे आमदार आर.टी. देशमुख, केजच्या आमदार श्रीमती संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस तसेच रमेश पोकळे, रमेश आडसकर, धम्मानंद मुंढे आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीमती पंकजा मुंढे म्हणाल्या, गावांच्या विकासासाठी विविध कामे करण्यात येणार आहेत.जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी  35 कोटी रुपये दिले आहे त्यामधे बचतगटासाठी वास्तू उभारु असे त्यांनी सांगितले. परळी शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपये मुख्यमंत्र्याकडून मंजूर केले आहेत. त्याच बरोबर भव्य नंदीमुळी उभारुन  शहर सुशोभी करणासाठी प्रकल्प राबवू तसेच बीड जिल्हा परीषदेची  मोठी इमारत तयार होत आहे असे श्रीमती मुंढे म्हणाल्या.
खासदार डॉ. प्रितम मुंढे म्हणाल्या, राज्याच्या ग्रामविकास विभागाने 25:15 च्या माध्यमातून गावांमध्ये रस्ते निर्माण करताना जिल्हा परिषदेच्या शांळासाठी निधी दिला.
आमदार श्री. धस यांनी शहर व जिल्हयाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उल्लेख केला.आमदार श्री. देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक  योजना तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या  कामातून  शासनाने विकासाची कामे सुरु केली.आमदार श्रीमती ठोंबरे म्हणाल्या, जिल्हयासाठी मोठा निधी पालकमंत्री यांच्य माध्यमातून उपलब्ध होऊन रेल्वे, रस्ते, ग्रामविकासाची कामे केली आहेत.
मंत्री श्रीमती मुंढे यांच्या हस्ते लोकनेते दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी विविध संघटनांच्या वतीने  मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शहरातील  26 सिमेंट  रस्ते व नाली  बांधकामासाठी विकास कामे या विशेष अनुदानामधून  करण्यात येतील . या विकास प्रकल्पाशी संबंधित अभियंते श्री भांडे व श्री काकड यांचा सत्कार केला.

                                               *-*-*-*-*-*


गुरुवार, ३ जानेवारी, २०१९


                                           


 जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली
शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक संपन्न
                                   
          बीड,दि.3:-:-जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची  बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा कृषि अधिकारी श्री. चपळे  यांची  प्रमुख उपस्थिती होती.
             यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या  कौशल्य विकास, आरोग्य विषयक उपचार, कर्ज, वैरण विकास, शेतीमध्ये वीज जोडणी, घरी वीज जोडणी, विहीर, शेततळे, गँस जोडणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शुभ मंगल सामुहिक विवाह योजना, हॉस्टेल सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन बँक खाते, कुटुंब अर्थ सहाय्य योजना, रोहयो अंतर्गत वेतन या योजनांची मागणी केलेल्या प्राप्त कुटुंबियांची संख्या व त्यांना देण्यात आलेल्या योजनेच्या लाभाच्या माहितीचा तालुकानिहाय आढावा घेवून प्रलंबित योजनेचा लाभ  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना तात्काळ देण्याच्या सुचना केल्या.
            आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बैठका घेवून या कामाचा आढावा घ्यावा. शासनाच्या योजनेचा संबंधित कुटंबांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. ज्या कुटुंबांनी विहिर,शेततळे, शैक्षणिक मदत, घरकुल यासारख्याबाबीची मागणी केली आहे. त्या योजनेचा लाभ देण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही पुर्ण करावी, असे सांगुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना उभे करण्यासाठी  जास्तीत जास्त योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            या बैठकीस जिल्हयातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-     




  स्त्री शिक्षणाची क्रांतीकारक चळवळ उभी करण्यात
सावित्रीबाई फुलेंचे अमुल्य योगदान
                 --अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे
       बीड, दि,3 :- अंधकाराच्या गर्देतुन प्रकाशाकडे जायचे असेल तर त्यासाठी शिक्षण हा बहुमुल्य ठेवा असून शिक्षणाची क्रांतीकारक चळवळ उभी करण्यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी अमुल्य योगदान दिले. या महापुरुषांनी स्त्री शिक्षणाचा पाया आपल्या घरापासूनच सुरु केला. इतिहासाची पाने चाळतांना आपल्याला विविध राष्ट्रपुरुषाचा त्याग दिसून येतो. त्यांनी घालून दिलेल्या तत्वावर  आपण चाललो तर सामाजिक कार्यात आपलाही मोलाचा सहभाग लाभेल असे प्रतिपादन अपर  जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  केले.
          या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश माडीक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
             आधुनिक युगात महिलांचा सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात सहभाग असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला बरोबरीने काम करत आहेत. पूर्वीही तिचा शेतीमध्ये पन्नास टक्के वाटा होता त्यामुळे  कुटुंबातील पुरुषाने स्त्रीला सन्मानाने वागविले पाहिजे तरच आपण महापुरुषांच्या विचारांची सामाजिक मुल्ये रुजविल्याचे समाधान आपणास मिळेल. महापुरुषांची जयंती साजरी करण्यामागे शासनाचा हाच उद्देश आहे की, महापुरुषांच्या विचारांची उजळणी व्हावी व ते विचार समाजात रुजवावे असेही श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले.
           या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील व इत्तर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
                                                                    ********