महात्मा
गांधी तंटामुक्त गांव मोहीम
पत्रकारिता
पुरस्कारासाठी 15 जूनपर्यंत प्रवेशिका
पाठवा
बीड दि. 30 :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअतंर्गत
मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देऊन ही योजना जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे
पोहोचविणाऱ्या पत्रकारांसाठी शासनाने जिल्हा,विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार
देण्याची योजना जाहीर केली आहे. बीड
जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी आपल्या प्रवेशिका गुरुवार
दि.15 जून 2017 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महात्मा गांधी
तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समितीच्यावतीने करण्यात आले
आहे.
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रु. 25 हजार, द्वितीय
पुरस्कार रु. 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रु. 10 हजार आहे. महात्मा गांधी
तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी 2 मे 2016 ते 1 मे 2017 या
कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मूल्यमापनासाठी ग्राह्य
धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले
टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे
बातमीदार, स्तभंलेखक, मुक्तपत्रकार पात्र असतील. पारितोषिकांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी
भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अ, ब, क
वर्गवारीतील वृत्तपत्रे/नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच या
पारितोषिकांसाठी विचार करण्यात येईल.
एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक
आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जर एका
वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ
इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड
करुन संबंधित संपादकांनी त्याचा अर्ज पुरस्कार योजनेसाठी पुढे सादर करावा.
वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रांतून प्रसिध्द झालेले असेल तर त्या
संबंधिचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकांनी निवड समितीकडे
सादर करावा.
पुरस्कारासाठी गठित निवड समितीतील सदस्यांना स्पर्धेत
सहभागी होता येणार नाही. जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे
विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम
क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन
होईल. अधिक माहितीसाठी यासंबंधीचा
गृहविभाग, महाराष्ट्र शासनाचा दि.11 एप्रिल 2008 चा शासन निर्णय शासनाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचे अवलोकन करावे.
बीड
जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा
गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, प्रशासकीय
इमारत, नगर रोड, बीड-पिन 431122 (दूरध्वनी क्र. 02442-222327) यांचेकडे गुरुवार दि.15 जून 2017 पर्यंत पाठवाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा