शुक्रवार, १४ जून, २०१९

बीजभांडवल योजनांसाठी  योजनेसाठी
 कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
        
बीड दि, 14:- जिमाका साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड करीता सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अनूदान योजने अंतर्गत 750 लाभार्थी व बीजभांडवल योजने अंतर्गत 80 लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात.  मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या बारा पोटजातीतील अर्जदाराकडून विविध व्यवसायासाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहे.या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत पुढीलप्रमाणे  स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्जप्रकरणे स्विकारले जाणार नाहीत. कर्जप्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे
          जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांचेकडून घेतलेला असावा.अर्जदाराच्या कुटूंबाच्या उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांच्या कडून घेतलेला असावा.नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. रेशन कार्ड झेरॉक्स प्रती  आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड झेरॉक्स प्रती  व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन)  व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं 8, लाईटबील व टॅक्स पावती, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन, परवाने बॅच, व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. वरीलप्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षाकीत करून घोषणापत्र देण्यात यावे.
          वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स / हस्तलिखीत / टंकलिखीत केलेले अर्ज दि.15 जून 2019 ते दि.31 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45) स्थळ जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे स्विकारले जातील. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यातील मांग / मातंग समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी तसेच होतकरू, गरजू अर्जदारांनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन  व्ही.एस.सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बीड यांनी केले आहे.









वृत्त क्र. 256

                                           क्षयरुग्णांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग
                                  सोयी सुविधांचा लाभ घेऊन क्षयमुक्त होण्याचे आवाहन

      बीड,दि,14:- गेल्या 50 वर्षापासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत तरीसुध्दा दर दीड मिनिटाला एका क्षयरुग्णाचा मृत्यू व अंदाजे 10 लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याने आणि त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदानपासून व औषधोपचारापासून वंचित आहेत.
          सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यामध्ये सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत क्षयरोग तसेच एमडीआर/एक्सडीआर  क्षयरोग निदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोयी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमातंर्गत आजपर्यंत निक्षय सॉफ्टवेअर मार्फत 69,499 इतक्या क्षयरुग्णांची नोंद राज्यातील खाजगी वैदयकीय क्षेत्रातून करण्यात आलेली आहे तर शासकीय यंत्रणेमार्फत 1,40,627 इतक्या क्षयरुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.
           सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम – नॅशनल स्टॅटेजी प्लॅन सन 2017 ते 2015 नूसार कार्यक्रमात उपलब्ध अदयावत सुविधा व औषधोपचार सेवा सार्वजनिक तसेच खाजगी वैदयकीय क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी नि:शुल्क  उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या दिनांक 16 मार्च 2018 अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद कार्यक्रमातंर्गत होणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. इ.स. 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण केंद्रसरकारतर्फे ठरविण्यात आलेल आहे यासाठी अधिसूचना लागू करण्यात आली असून यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा या अधिसूचनेचा मुख्य उद्देश आहे.
            समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून योग्य व संपूर्ण औषधोपचार करण्याची नितांत गरज आहे. राज्यामध्ये खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास निम्म्याहून जास्त क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. क्षयरुग्णांना पूर्णपणे बरे करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्रसरकारतर्फे कार्यक्रमातंर्गत विविध सुविधा व उपक्रम राबविले जातात उदा. निक्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांच्या नोंदणीची सोय, नि:शुल्क रोगनिदान व औषधोपचार, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु. 500 पोषण आहारासाठी ही आर्थिक मतद रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाऱ्या मानधन, क्षयरुग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उपचार सहाय्यकास ड्रग सेसिंटिव्ह क्षयरुग्णामागे रु. 1000 व एमडीआर रुग्णामागे रु. 5000 मानधन, रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी रु.500 मानधन इ. सुविधा देण्यात येत आहेत. क्षयरुग्णाला कुठल्याही प्रकारचा खर्च न येता त्याने त्याचे औषधोपचार योग्य व पूर्णपणे घेणे व तो बरा होणे हा उद्देश आहे.
            या निमित्ताने सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नोंद करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.
            क्षयरोग रुग्णांची माहिती निक्षय (http://nikshy.in/) या संकेतस्थळावर नोंद करावी म्हणजे क्षयरुग्णांना व खाजगी व्यावसायिकांना वरील सगळ्या सुविधांचा लाभ घेता येईल. दि. 16 मार्च 2018 रोजीच्या भारत सरकारच्या राजपत्रातील अधिसूचेनुसार क्षयरोग हा एक नोटिफायबल आजार असून त्याविषयी शासनास कळविणे बंधनकारक असल्याचे घोषित केलेले आहे. सर्व सार्वजनिक  तसेच खाजगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे निदान झालेले/ उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याने सदर क्षयरुग्णांची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना (जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका इ.) कळविणे बंधनकारक आहे. दि. 16 मार्च 2018 रोजीच्या क्षयरोग अधिसूचनेनूसार आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
              क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांवर व वैद्यकीय व्यावसायिकांनी भारतीय दंड संहिता ( 1860 क्ष्श्स 45) च्या कलम 269 आणि 270 च्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते.
              औषधविक्रेत्यांसाठी – आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या दि. 30 ऑगस्ट 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधने कायदा 1945 या मध्ये सुधारणा करुन क्षयरोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.
              खालील संस्थाकडून क्षयरुग्णांची नोटिफिकेशनसाठी शासकीय यंत्रणेकडे माहिती येणे अपेक्षित आहे यामध्ये  सर्व खाजगी दवाखाने/सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक/ वैद्यकीय प्रयोगशाळा, सर्व औषध निर्माते, (फार्मासिस्ट, केमिस्ट आणि ड्रगिस्ट), अशासकीय संस्थामार्फत चालविली जाणारी रुग्णालये वा दवाखाने, सर्व सार्वजनिक दवाखाने/रुग्णाचे/वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो.
               क्षयरुग्णांना व इतर सर्वाना क्षयरोग संदर्भातील सोयी सुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी या टीबी हेल्पलाईन क्रमांकाचा – 1800116666 निश्चीत लाभ घ्यावा, असे  आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
*-*-*-*-*-*-*
वृत्त क्र. 257

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी
अर्ज दाखल करण्याचे आवाहन

        बीड,दि.14 :- (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) जिल्हा कार्यालय बीडमार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्यूत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमामध्ये सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सरासरी 60% किंवा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थींनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतांना पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
          अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, मार्कमेमो,फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुराव उदा. प्रवेशपावती किंवा बोनाफाईड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असून संपूर्ण भरलेला अर्ज साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, बीड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्राम गृहासमोर, नगर रोड,बीड येथे दि. 10 जुलै 2019 पर्यंत दोन प्रतींमध्ये  दाखल करावेत, असे आवाहन व्ही.एस.सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक, बीड यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा