बीड, दि. 27 :-भारतीय दूरसंचार
प्राधिकरणातर्फे मंगळवार, दि. 28 फेब्रवारी 2017 रोजी हॉटेल यशराज, जालना रोड, बीड येथे ग्राहक जागृती
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सल्लागार, भारतीय दूरसंचार विनियामक
हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ग्राहकांना त्यांच्या
लँडलाईन, मोबाईल, केबल टिव्ही इ. सेवा बाबतचे
हक्क आणि अधिकार याबद्दल माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण 907.7 लाख भ्रमणध्वनी धारक असून 18.8 लाख लँडलाईन ग्राहक
आहेत. महाराष्ट्रातील एकूण नऊ दूरसंचार सेवा देणारे कंपनी आहेत. बऱ्याच ग्राहकांना TRAI ने ग्राहक हिताच्या दृष्टीने वेळोवेळी निर्गमित
केलेल्या नियमांची माहिती नाही. ग्राहकांना उपरोक्त सेवा बद्दलच्या तक्रारी करण्यासाठी
असल्यास ती कशी करावी, अपील कसे करावे, नंबर portability ची पध्दत कोणती. नको असलेल्या
जाहिराती कशा प्रकारे बंद करतात. नको असलेले कॉल्स कसे बंद करावेत. मूल्यवर्धीत सेवाबाबतची
नियमावली कोणती. सर्व ग्राहकांना डिजिटल सेट टॉप बॉक्स घेणे बंधनकारक आहे. त्याचे फायदे
कोणते याबाबत हा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा