मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

केंद्र सरकारच्यावतीने खालापुरी येथे प्रजनन,माता-बालसंगोपन व किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान संपन्न अस्वच्छतेमुळे रोगांचे प्रमाण अधिक, संपुर्ण आरोग्यासाठी घराघरात शौचालय बांधून गाव हागणदारी मुक्त करा - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे






बीड, दि. 28:- अस्वच्छता, उघड्यावर शौचाश जाणे, आजूबाजूचा परिसर साफ न करणे यामुळे भयंकर अशा आजाराचा सामना करावा लागत आहे, आणि यामुळेच महिलांमध्ये कर्करोगामुळे गर्भाच्या पिशव्या काढण्याचे  प्रमाण वाढत आहे तसेच मुलांच्या पोटातही जंतांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य सरकारच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील खालापुरी येथे दोन दिवसीय (दिनांक27 2फेब्रुवारी) प्रजनन,माता-बाळ आरोग्य आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यजनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी  खालापुरी गावच्या सरपंच श्रीमती द्रौपदीबाई मुंडे, उपसरपंच परजने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, महिला बाल कल्याण विभागाचे उप-मुख्यकार्यकारी अधिकारी उदय साळुंके, शिरुर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.वाखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी पुरुषोत्तम पिंगळे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. खाडे, डॉ.आठवले, डॉ.हरनमारे, महिला बाल विकास अधिकारी सखाराम बांगर,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.जयश्री मुंडे, आरोग्य  तसेच महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी, आशा , अंगणवाडी कार्यकर्त्या  आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना ननावरे  पुढे म्हणाले की, कुटुंब वाचवण्यासाठी घरातील लहान- थोरांनी शौचालयाचा आग्रह धरला पाहिजे, येत्या पाडव्यापुर्वी शिरुर तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी जनतेनी लवकरात लवकर आपल्या घरात शौचालये बाधून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलताना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे  यांनी माता-बाल मृत्यूचे प्रणाण कमी करण्यासाठी, राष्ट्राच्या तसेच निरोगी समाजाच्या हितासाठी आई-बाळाच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देऊन वेळीच निदान करणे, गरोदरपणात आईची काळजी घेऊन तीला नऊ महिने सकस आहार दिल्यानंतर रुग्णालयात प्रसुती करुन घ्यावी, बाळाच्या निकोप आरोग्यासाठी आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे तसेच बाळ जन्मल्यानंतर लगेचच आईचे स्तनपान करु द्यावे आणि वेळोवेळी बाळाचे लसीकरण करुन घ्यावे,आता सर्व लसी सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत, मातांची तपासणी, प्रसुती आणि बाळांचे लसीकरण शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केद्रांधून करुन घ्यावे असे आवाहन त्यानी केले .
महिला बाल विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके यांनी मुला-मुलींमधिल रक्तातील क्षय रोग टाळण्यासाठी जंत नाशक आणि लोहयुक्त गोळ्यांचे नियमित सेवन करावे या सर्व गोळ्या शाळा महाविद्यालयातून उपलब्ध करूऩ देण्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सकस आहार, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा तसेच प्रश्न मंजूषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करणात आले. सकाळी खालापुरी गावातून जनजागरण रॅली काढून आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
कायर्क्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देवून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला, आभार प्रदर्शन क्षेत्रीय प्रचार सहायक अलीम खान यानी केले. कार्यक्रमाची सर्व जबाबदारी क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर,श्री. सादीगळे आणि श्री.दूधे यांनी सांभाळली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा