बीड, दि. 27 :- माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षा 2017 करीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
दक्षमा समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी
अधिकारी नामदेव ननावरे, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, डॉ. विक्रम सारुक शिक्षणाधिकारी
(मा) ,शशिकांत हिंगोणीकर शिक्षणाधिकारी (मा), जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची
उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी (मा) विक्रम सारुक यांनी इयत्ता 12 वी ची परीक्षा
दिनांक 28 फेब्रुवारी 2017 ते 25 मार्च 2017 तसेच इयत्ता 10 ची परीक्षा दिनांक 7 मार्च
2017 ते 1 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये होणार आहे. जिल्ह्यामध्ये इयत्ता 12 वी ची परीक्षार्थी
संख्या 38265 व इयत्ता 10 ची परीक्षार्थी संख्या 43613 आहे. इयत्ता 12 वी ची परीक्षा
केंद्र संख्या 89 व इयत्ता 10 वी ची परीक्षा केंद्र संख्या 143 आहे. अध्यक्ष, विभागीय
मंडळ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार एकूण 6 भरारी पथकाची नियुक्ती केलेली आहे. जिल्हास्तरावर
एक नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. जिल्ह्यातील इयत्ता 12 ची परीक्षा केंद्र संचालकांची
बैठक दि.25फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी परीक्षा
सुरळीत, शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी,
बीड यांच्या आदेशानुसार महसूल विभागातील व जिल्हा परिषदेतील वर्ग -1 व वर्ग-2 च्या
अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. सदर पथके नियोजनाप्रमाणे परीक्षा केंद्रांना
भेटी देतील व परीखा कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात पार पडेल यांची दक्षता घेतील.
केंद्र संचालक यांनी
विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश देण्यापूर्वी केंद्राच्या प्रवेशद्वारावर त्यांची तपासणी करुनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये
प्रवेश द्यावा. सदर विद्यार्थ्यांकडे कसलेही आक्षेपार्ह साहित्य असणार नाही याची खबरदारी
घ्यावी. आवश्यक सूचना देऊनही परीक्षा दालनात कॉपी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित
पर्यवेक्षक व केंद्र संचालक / सह केंद्र संचालक यांचेवर जबाबदारी निश्चित करुन कडक
कार्यवाही करण्यात येईल.
कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमुळे
हुशार व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना अवाजवी त्रास कुठलाही त्रास होणार नाही याची
सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांनी
परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांततेच्या वातावरणात पार पाडावी असे आवाहन करण्यात येत
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा