बीड, दि. 31 :- जिल्ह्याच्या विकासासाठी
सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना जिल्हा नियोजन
विभागाकडून वितरित करण्यात आलेला निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणेच्या
अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील नियोजित केलेली कामे वेळेत व दर्जेदारपर्ण पुर्ण
करुन कोणताही निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी
एम.डी. सिंह यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीअंतर्गत
सन 2017-18 करीता कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेल्या निधी व त्याअंतर्गतच्या
कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
या
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवने, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त
डॉ. मडावी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी
पुढे बोलताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले
की, जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विकास कामांकरीता कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित
करण्यात आलेला निधी जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून या निधीचा योग्य
विनियोग होणे आवश्यक आहे. यंत्रणांनी कामे विहीत मुदतीत पूर्ण करुन कोणत्याची प्रकारचा
निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी ज्या यंत्रणांनी त्यांच्या विभागातील
नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन घेणे गरजेचे असून ज्या यंत्रणांनी
प्रशासकीय मान्यता घेतली नाही त्या यंत्रणांनी
प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे सांगून ज्या यंत्रणांचे
प्रमुख निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी
श्री. सिंह यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी जिल्हा वार्षिक
योजनेअंतर्गत मंजूर अनुदान, झालेला खर्च, कामांची सद्यस्थिती आदी बाबींचा विभागनिहाय
सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस विविध यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा