बीड, दि.6 :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 160 वी
जयंती आणि त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्ष पुर्ण
झाल्याबद्दल तसेच ' स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' या
त्यांच्या जगप्रसिध्द उदगाराच्या शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान स्पर्धा बीड जिल्ह्यात तालुका व जिल्हा
पातळीवर घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती बीड जिल्हा
परिषदेचे शिक्षणाधिकारी तथा स्पर्धा समितीचे जिल्हा अध्यक्ष यांनी दिली आहे.
जिल्ह्यात
प्रथम क्रमांक कालिका बलभिम गणेश मंडळ, जवकर मंगल केंद्राजवळ, बलभिम चौक, बीड
यांनी पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक राजमुद्रा गणेश मंडळ, अहिल्यादेवी नगर, केज तर तृतीय क्रमांक शिवराज
गणेश मंडळ, रंगार चौक, गेवराई यांनी मिळविला आहे.
तालुकानिहाय गणेश मंडळ याप्रमाणे बीड
तालुक्यातील कालिका बलभिम गणेश मंडळ प्रथम, राष्ट्रीय गणेश मंडळ द्वितीय, वीरशैव
गणेश मंडळ तृतीय. गेवराई तालुक्यातील शिवराज गणेश मंडळ प्रथम, नवनिर्माण गणेश मंडळ
द्वितीय, श्रीगणेश मंडळ तृतीय. केज तालुक्यातील राजमुद्रा गणेश मंडळ प्रथम, नवरंग
गणेश मंडळ द्वितीय, श्रीसंत सावतामाळी गणेश मंडळ तृतीय. माजलगाव तालुक्यातील
शिवनेरी गणेश मंडळ प्रथम, शिवगर्जना गणेश मंडळ शेलापूरी यांना द्वितीय क्रमांक मिळाला
आहे. स्पर्धेसाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन आदि
देखावे तयार करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्यास
1 लाख रुपये, द्वितीय 75 हजार रुपये आणि तृतीय 50 हजार रुपये असे असून
तालुकास्तरावर प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 15 हजार रुपये आणि तृतीय 10 हजार असे
ठेवण्यात आले होते.
स्पर्धेचे
परिक्षक म्हणून शिक्षणाधिकारी (नि) डॉ.विक्रम सारुक, कैलास कला निकेतन
महाविद्यालयाचे प्रा. श्रीकांत पुरी,
सौ.के.एस.के. महाविद्यालयाचे प्रा.आसाराम चव्हाण यांनी सहभागी गणेश मंडळाची निवड
केली तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने
तालुक्यातील स्पर्धेत सहभागी गणेश मंडळाची गुणानूक्रमे निवड केली. असे जिल्हा
परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा