गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

2 ऑक्टोबरला कर्जमाफीचे ग्रामसभेत चावडी वाचन


         
          बीड, दि. 28 :- महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अन्वये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रीया दि.22 सप्टेंबर रोजी संपली असून अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीचे दि.2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्तरीय समितीकडून वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन तसेच कर्जमाफी योजनेची प्रभावी व विहित मुदतीत अंमलबजावणी होण्यासाठी बुधवार दि.27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नियोजन समिती सभागृहातील बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योजनेच्या चोख अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा