बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा

बीड, दि, 28 (जि. मा. का.) : केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी जलशक्तीअभियानांतर्गत बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलशक्ती अभियान - कॅच द रेन ही एक कालबद्ध मोहीम आहे. दि. 29 मार्च 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा या अभियानाचा कालावधी आहे. हा केंद्र शासनाच्याविविध मंत्रालयांचा व राज्य शासनांचा एकत्रित उपक्रम आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती,रोजगार हमी योजना, कृषि, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,बांधकाम विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग, महिला वबालकल्याण विभाग, पाटबंधारे विभाग व जलसंधारण विभाग आदि विभाग या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत कामे हाती घेऊन पूर्ण करण्यातआली आहेत. या कामांची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनामार्फत एक समिती नियुक्त करण्यातआली असून, या समितीमार्फत जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांना भेटी देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदीयांनी आज या अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला तसेच विविध मौलिक सूचनाकेल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यात या अभियानांतर्गतविविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, जिल्हाधिकारीकार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयसीआयसीआय यांच्या माध्यमातून 100 गावांमध्येजलपुनर्भरणाची (रेनवॉटर हार्वेस्टिग) कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील शासकीय व वैयक्तिकइमारतींवरील छतांवर पडणारे पावसाचे पाणी नजीकच्या विहिरीत सोडण्यात येते. यामुळे विहिरीचापाणीसाठा व भूजलपातळी वाढण्यास मदत होत आहे. पुढील टप्प्यात 500 गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे कार्यान्वित होणार आहेत. जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे म्हणाले, पावसाच्यापाण्याचे पुनर्भरण करणे, नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करणे, पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर, जलसाठ्यांचे जिओ टॅगिंग करणे आदि जलशक्ती अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत.जिल्ह्यात जलसंवर्धन व जलपुनर्भरणाची 385 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 356 कामे सुरू आहेत. पारंपरिक व अन्य जलसाठ्यांचे पुनरूज्जीवन अंतर्गत 143 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 43 कामे सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा