बीड,
दि. 16 :- मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक
ठिकाणी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यांसह अवेळी पाऊस होण्याचे संकेत कुलाबा वेधशाळेकडून
दिले आहेत.
तरी नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरु असताना
बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु
नये कारण या कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे
सुरक्षित ठिकाणी बांधावीत. ज्या धान्याची कापणी झाली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी
हलवावीत. पावसानंतर, गारपिटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून
बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची
शक्यता असते त्यामुळे त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड
यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा