बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यातील
काही भागात बुधवारी झालेल्या गारपीट आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी, खाडेवाडी, दिंद्रुड या गावातील नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.
माजलगाव तालुक्यातील जवळपास सात गावातील पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्हाधिकारी राम यांनी माजलगाव
तालुक्यातील नुकसानीचा संबंधित महसुल व कृषी
विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला व लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे
निर्देश दिले. यावेळी त्यांनी गोविंदवाडी, खाडेवाडी तसेच दिंद्रुड येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांशी
चर्चा करताना काळजी न करण्याचे आवाहन केले. संपुर्ण पंचनामे झाल्यानंतर लागलीच शासनाकडे
अहवाल पाठविण्यात येईल व शासन निर्णयानुसार सर्व नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल असेही
ते म्हणाले.
यावेळी उपविभागीय अधिकार महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार एन.जी.
झंपलवाड, तालुका कृषी अधिकारी देशमाने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक
आदि अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी,ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा