बीड, दि.27 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना
खरीप हंगाम सन 2016 करीता नुकसान पंचनामा कार्यपध्दती बाबत शासनाने सुचना दिलेल्या
आहेत. त्यानूसार खरीप हंगाम सन 2016 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरणा केला आहे
त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाच्या बाबी जसे स्थानिक नैसर्गिक आपत्ती
(पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान, गारपीट, भू-स्खलन) व काढणी पश्चात
नुकसान (चक्रीवादळ व अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान झाल्यास होणारे नुकसान निश्चित करण्याकरीता
कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.
या योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून
48 तासाच्या आत या बाबतची सुचना दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण प्रकार व सर्वे नंबर सहित
विमा कंपनी संबंधित बँक, कृषी, महसुल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन माहिती
द्यावी. पिक विमा भरलेल्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसान
भरपाई निश्चित करण्यासाठी वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज
(7/12 व पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्यास पुराव्यासह) विमा कंपनीकडे सादर करावा.
बीड जिल्ह्यासाठी असलेल्या एच.डी.एफ.सी. इगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा दुरध्वनी
क्र.020-30862900 फॅक्स क्र.020-30862959, टोल फ्री क्र. 18002700700 आहे. अधिक माहितीसाठी
तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा
असे आवाहन उपाध्यक्षा तथा सभापती (कृषी) जिल्हा परिषद बीड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
तसेच बीड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा