बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

बीड, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जिल्ह्यातील गेवराई, धारूर, माजलगाव व बीड तालुक्यात शेतपिकांची पाहणी केली. गेवराई येथील पाहणीवेळी आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे आदिंसह संबंधित मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. दरम्यान, कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे युद्ध पातळीवर वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, तूर, बाजरी, कापूस आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पिकांची पाहणी केली व प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा