गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

पोकरा योजनेत अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवडीकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर 2022 असून, ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप अर्ज केले नसतील, त्यांनी पुढील दोन दिवसात तात्काळ पोकरा योजनेअंतर्गत अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवड अंतर्गत अंतिम मुदतीनंतर पोर्टलवरील फळबाग व बांबू लागवड घटक बंद होणार आहे. फळबाग व बांबू लागवड अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 असून लागवड पूर्ण करण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे. शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्राचे कृषि सहायक अथवा समूह सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा