बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा



          बीड दि.11 :- माजलगाव धरणाची पूर्ण साठा क्षमता 454 द.ल.घ.मी. असून पूर्ण संचय पातळी 431.80 द.ल.घ.मी. आहे. दि.10 ऑक्टोबरपर्यंत माजलगाव धरणामध्ये 80 टक्के पाणी साठा निर्माण झाला असून पाणीपातळी 430.90 मीटर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास व धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी सिंदफणा नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्यास नागरिकांनी नदीपात्राजवळ जाण्याचे टाळावे. असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा