शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा सहभाग मिळाल्यास निश्चितच विकासाच्या कामाला गती मिळेल - विभागीय आयुक्त डॉ.भापकर



          बीड दि.12:- जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा सहभाग मिळाल्यास निश्चितच विकासाच्या कामाला गती मिळेल असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावरील आयोजित बैठकात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा  जयश्री मस्के, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, श्रीमती वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपायुक्त प्रल्हाद कचरे,  श्री.बोथरा, श्री.कुंभार, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुत्रावे, श्रीमती रिता मेत्रेवार, मनोज चौधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जि.प.सभापती युध्दजित पंडित, संतोष हांगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना विभागीय आयुक्त म्हणाले की, शासनस्तरावरुन विविध योजना राबविल्या जात  असून त्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी विकासाच्या कामामध्ये अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग असल्यास तो जिल्हा विकासामध्ये अग्रेसर राहण्यास निश्चितच मदत होईल. जिल्हृयाचे महसूली वसूलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामांना प्राधान्य देण्याची गरज असून दिलेले उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावेत. तसेच जिल्ह्यातील वाळू लिलावाबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी. जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाच्या माध्यमातून अचानक प्रत्यक्ष भेटी देऊन कारवाई करावी. जिल्ह्यातील एनएलआरएमपीचे काम कमी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्ह्यात एमजीनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या  कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यवाही पूर्णकरावी तसेच विहिरी व शेततळ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करुन लवकरात लवकर जिल्हा हागणदारीमुक्त करावा. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुलांना शिक्षकांनी चांगले शिक्षण दिले पाहिजे चांगली सुविधा, उपक्रम तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शाळा डिजिटलायझेशनच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महसूल आयुक्तांनी महाराजस्व अभियान आढावा, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, वक्फ जमिनीच्या नोंदी,  शेतकरी आत्महत्या, शासकीयवसूली, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीस दंडात्मक कार्यवाहीचा आढावा, महसूली जमा व शासकीय भरणा प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, एमजीनरेगाच्या कामांचा आढावा, जलयुक्त शिवार कामाचा आढावा, जीओ टॅगींग, पुरवठा विभागाचा आढावा, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी कल्याण अभियान यासारख्या विविध विषयावर महसूल आयुक्त डॉ.भापकर यांनी आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील प्रलंबितअसलेल्याविकासाची कामेआणि देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. या बैठकीस महसूल अधिकारी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा