बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ कर्जमाफीपात्र शेतकरी कुटुंबांना मान्यवरांच्या प्रमाणपत्राचे वाटप



          बीड दि. 18:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ व  कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबाना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भिमराव धोंडे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगिता ठोबरे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,यांच्यास इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पंधरा पात्र शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून  सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमास बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, औरंगाबाद विभागाचे सहनिबंधक जी.पी. परतूरकर, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत जिल्हयातील एकूण 2 लाख 93 हजार 76 कर्जमाफीस शेतकरी कुटुंब पात्र असून त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख 76 हजार 622 तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लाख 16 हजार 454 शेतकरी कुटुंब आहेत.
            यावेळी जिल्हयाती  पात्र शेतकरी सुर्यभान भाऊराव नरवडे, सौ. लताबाई दिलीप शिनगारे, राजाभाऊ गिन्यानदेव जाधव, सौ. रुक्मिण राजाभाऊ गवारे, बालासाहेब हरिभाऊ सोळंके, आंशीराम निवृत्ती अबुज, विष्णु पांडुरंग यादव, ज्ञानोबा एकोबा हिरापल्ली, श्रीमती शांताबाई नरहरी पवळ, महेबुबखाँ दाऊदखाँ पठाण, नवनाथ विलास आघाव, भास्कर यादव जायभय, शरद अनुरथ चव्हाण, श्री शंभु जनार्धन शेळके या शेतकरी कुटुंबाचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले तर आभार अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हयातील पात्र शेतकरी, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा