शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ; गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा



          बीड, दि. 7 :- सद्यस्थितीत जायकवाडी धरणाची पाणी पातळी 462.646 मी असून धरण 78.81 टक्के क्षमतेने भरले आहे. जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणे जवळपास 90 ते 100 टक्के क्षमतेने भरलेले असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानूसार येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. तरी वरील धरणातून कमी अधिक प्रमाणात जायकवाडी धरणात विसर्ग चालू  असल्याने धरणातून कधीही विसर्ग सोडण्यात येवू शकतो. धरणाच्या खालील भागात धरणापासू 4 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीवर एक चणकवाडी बंधारा आहे त्याचा  वापर विद्युत निर्मितीसाठी होतो. सद्यस्थितीत बंधाऱ्याचे गेट काढण्यात आले आहे आणि गोदावरीचा पाणी प्रवाह मोकळा करण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला असता धरणाखालील भागातील गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा