बुधवार, २६ जुलै, २०१७

मिशन दिलासा कार्यक्रमातंर्गत गरजू वंचित घटकांना मदतीचा हात - जिल्हाधिकारी एम.डी. सिंह





बीड -जिल्हयात मिशन दिलासा कार्यक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याबरोबरच जिल्हयातील पीडित व गरजू वंचित घटकांनाही आधार देण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. याकामामध्ये सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक संस्था व नागरिकांनीही पुढाकार घ्यावा आणि पीडित व गरजू वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मिशन दिलासा कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास बीड अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, विकास माने, गणेश निऱ्हाळी, महेंद्रकुमार कांबळे,उप जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.एन.आर. शेळके, भागीरथ बियाणी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले की, जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या योजना विविध विभागाच्यामार्फत जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हयाचा विकास होण्यास मदत होणार आहे असे सांगून जिल्हयात दिलासा कार्यक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध विभागामध्ये सुरु असलेल्या योजनांचा लाभ देवून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बीड येथील शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी दत्ता रामकिशन वाघिरे उदंड वडगाव इयत्ता 10 वीमध्ये 96.60 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्याबाबत मशिन दिलासाअंतर्गत आवाहन करण्यात आले होते त्यास प्रतिसाद देवून भगीरथ बियाणी यांनी या विद्यार्थ्याची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुला-मुलींचे निवासी वसतीगृह, बीड यांनाही मदत केल्याने त्यांच्या सामाजिक कार्याबदृल त्यांचे जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी भगीरथ बियाणी यांचे आभार व्यक्त केले आणि अशा सामाजिक कार्यात जिल्हयातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाबद्दल अनुभव सांगतांना म्हणाले की, दत्ता रामकिशन वाघिरे यांच्या सारखीच कौटुंबिक परिस्थिती होती. या सर्व अडचणीवर मात करुन मी शिक्षण घेतले आणि माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिद्दीने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालो आहे असे सांगून दत्ता वाघिरेनेही आपली जिद्द कायम ठेवून उच्च शिक्षण घ्यावे व जीवनात मोठा अधिकारी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन वाघिरेच्या आई वडीलानीही मुलाबरोबर मुलींनाही शिक्षणामध्ये पाठबळ देवून मदत करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना भगीरथ बियाणी म्हणाले की, दत्ता वाघिरे यांच्या शिक्षणाबरोबर इतर आवश्यक असणारी सर्व मदत करण्याची आपण जबाबदारी घेतली असून सर्व नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, सामाजिक बांधिलकी समजून काम केले पाहिजे. वंचितांना व गरजवंताना आवश्यक ती मदत केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दत्ता रामकिशन वाघिरे यांनी आपल्या मनोगतात म्हणाला की, माझ्या घरची परिस्थिती साधारण असून मला शिक्षणामध्ये आई-वडील, गावकरी, गुरुजनांनी मोलाची मदत केली. मी माझ्या जीवनातील माझे ध्येय पुर्ण करुन स्वतंत्र भारताचा आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करीन असे सांगून आपण सर्वांनी मला मदतीचा आधार देवून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याची पुर्तता करण्यासाठी मी जिद्दीने प्रयत्न करुन आपल्या सर्वांच्या अपेक्षा पुर्ण करणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.


यावेळी शिवाजी विद्यालयाचा उदंड वडगाव येथील रहिवासी असलेला विद्यार्थी दत्ता वाघिरे यास कपडे व इतर साहित्य तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुला-मुलींचे निवासी वसतीगृह, बीड यांना किराणा साहित्य भगीरथ बियाणी यांनी केलेली मदत मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एम.डी. सिहं यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अधिकारी-कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा