गुरुवार, १६ मार्च, २०१७

नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी गारपिट व पावसामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम







         
            बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी गारपिट  आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे यंत्रणांनी तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

          बुधवारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या तसेच काही भागात गारपिट झाली.या पार्श्वभूमीवर संबंधित नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परळी तालुक्याचा दौरा केला. त्यांनी गोवर्धन हिवरा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या ज्वारी पिकाच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर खारी तांडा येथील पिकांच्या नुकसानीची तसेच पडझड झालेल्या घरांची  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची तसेच इमारतींची पाहणी केली. यावेळी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांनी दिलासा दिला व सर्व नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल व नियमानूसार सर्व नूकसानग्रस्तांना मदत केली जाईल असे सांगितले. कृषी व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सर्व पंचनामे करण्याबरोबरच गारपिट व वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना होऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यात यावी असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कडवकर तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा