गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

जलसाठ्याजवळ जाणे टाळावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन



          बीड, दि. 14 :- जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 80 टक्के पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत व काही भरण्याच्या स्थितीत आहेत. जलसाठे पाहण्यासाठी नागरिक सहपरिवार गर्दी करीत आहेत. तसेच शाळकरी, महाविद्यालयीन मुले पोहण्यासाठी जात आहेत.  त्यामुळे पाय घसरुन पडणे,  पोहताना किंवा पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या युवकांचा आणि लहान मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या जलसाठ्यामध्ये कपारी तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्यामुळे कोणीही जलसाठ्याजवळ जाऊ नये व नागरिकांनी आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत या जलसाठ्यात पोहण्यासाठी पाठवू नये तसेच स्वत: आपल्या परिवारासह जलसाठ्याजवळ जाण्याचे टाळावे. शिक्षकांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याबाबत सुचना करावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा