बीड, दि. 5 :- बिंदुसरा नदीवरील
जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने या पुलावरून उस्मानाबाद व औरंगाबादकडून
येणारी वाहतूक बंद करण्यात यावी असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांच्याकडून कळविण्यात आले होते. परंतु
शहरातील दुचाकी व तीनचाकी वाहनांना या पुलावरून बंदी घातल्यामुळे वाहनधारकांना बीड
शहरात येण्यासाठी खूप बाहेरून यावे लागत असल्यामुळे या पुलावरुन दुचाकी व तीनचाकी वाहन धारकांना
वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यास योग्य होईल किंवा कसे याबाबत प्रकल्प संचालक, भारतीय
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते संबधित यंत्रणेचे पत्र दि. ०४
सप्टेंबर २०१७ अन्वये बिंदुसरा हा पूल ८४ वर्षे जुना व जीर्ण झाला असून पूलाचा डेक
स्लॅब वारंवार कोसळत असल्यामुळे वाहतुकीस
धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीवरील पूल सर्व प्रकारच्या
वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.
बिंदुसरा
पुलावरून होणारी हलकी व जड वाहनांची वाहतूकीमुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना तसेच
जीवित व वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था
होईपर्यंत या पुलावरून होणारी वाहतूक तूर्त बंद करण्यात आली आहे याबाबत जनतेने
सहकार्य करावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा