बीड,
दि. 27 :- राज्यात खरीप हंगाम 2017-18 साठी
प्रधानमंत्री पीक विमा योजना दि.20 जून व
23 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयानूसार जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयातील कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असल्याने
त्यांचा विमा हप्ता भरण्याची बँकेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बिगर कर्जदार
शेतकऱ्यांनी त्यांचा पीक विमा भरण्यासाठीचा
अर्ज त्यांचे खाते असलेल्या बँकेत किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार केंद्रावर ऑनलाईन पद्वतीने भरावा. या
शिवाय इतर कोणत्याही मार्गाने पीक विमा अर्ज भरु नये. असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह
यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
जिल्हयातील
काही शेतकरी नेट कॅफेवर जाऊन अग्री इंन्सूरन्स पोर्टल (Agri insurance Portal) वरील Farmer या option मधून अर्ज भरणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा पध्दतीने भरणा केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद
घ्यावी. नेटकॅफे चालकांनी अशा प्रकारे कोणतेही
अर्ज भरणा करत असतील अशा नेटकॅफे चालकावर दंडात्मक
कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच काही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC),आपले सरकार सेवा
केंद्र चालक पीक विमा हप्ताच्या रक्कमेच्या व्यतिरिक्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास
आल्यास त्यांचेवरही दंडात्मक कार्यवाही करुन ब्लॅक लिस्टमध्ये नोंद करण्यात येईल याची
सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा