शनिवार, २९ जुलै, २०१७

सेवा केंद्र चालकांनी आगाऊ रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा फौजदारी कार्यवाही

सेवा केंद्र चालकांनी आगाऊ रक्कम
शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा फौजदारी कार्यवाही


            बीड, दि. 29 :-  शेतकऱ्यांचे पीक अर्ज दाखल करुन घेताना काही आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून पीक विमा रक्कमेव्यतिरिक्त आगाऊ स्वरुपात रक्कमेची मागणी करण्यात येत आहे. अर्जासाठी प्रती अर्ज 24 रुपये शासनामार्फत अनुदान देण्यात येत असूनही जर अशा प्रकारे आगाऊ स्वरुपातील रकमेची मागणी करताना आपले सरकार सेवा केंद्र चालक आढळून आल्यास किंवा तशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत आपले सरकार सेवा केंद्र बंद करुन सबंधित आपले सरकार केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच दि. 24 ऑगस्ट 2017 पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे नोंदणी व अर्ज मोफत भरणेबाबतच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही प्रकारचे शुल्क शेतकऱ्यांकडून आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे तहसीलदार, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा