मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


                    
            बीड, दि. 18 :- सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात म्हणजेच मागासवर्गीय, पददलित, दिव्यांग, वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या संस्थाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. प्राप्त प्रस्तावांची राज्यस्तरीय समितीमार्फत छाननी करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन 2017-18 वर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कारासाठी सामाजिक संस्था व समाज सेवकांनी रविवार दि.30 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत.
            सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड संत रविदास इत्यादी सन्माननीय व्यक्तीच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात.

            पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बीड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड (राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार) यांच्याकडे रविवार दि.30 एप्रिल 2017 पर्यंत सर्व कागदपत्रासह दाखल करावेत. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासोबत कार्य केल्याचा पुराव्याची कागदपत्रे तीन प्रतीत जोडावीत.विहीत मुदतीनंतर व विहीत नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीसर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा