बीड, दि. 22 :- राष्ट्रीय
बालकामगार प्रकल्प बीड अंतर्गत कार्यरत धारुर बालकामगार विशेष प्रशिक्षण
केंद्रातील 30 विद्यार्थ्यांना तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या हस्ते विद्यावेतन
वाटप करण्यात आले. यावेळी बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी
यांची उपस्थिती होती.
भारत सरकारच्या श्रम
मंत्रालयाद्वारे धारुर येथील राष्ट्रीय बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रात बालकामगार,
अनाथ व गरीब कुटूंबातील मुले-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उत्तम
शिक्षण देण्याचे काम बालकामगार पुनर्वसन केंद्रातर्फे केले जाते. यामध्ये शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना
विद्यावेतन देण्यात येते याचे वाटप तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शिक्षण हे चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक
असून बालकामगार मुलांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे तसेच कौशल्य शिक्षण घेऊन
स्वत: मधील कौशल्याचा विकास करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास बालकामगार
प्रकल्पाचे कार्यक्रम व्यवस्थापक शेख अफसर, अनिल महाजन, नागनाथ सोनटक्के, प्रदिन
भांगे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एस.भांगे, एस.आर.मैंद,
ए.आय.मुंडे, के.जी.तिडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा