बीड, दि. 17 :- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र
राज्य यांनी राज्यातील 25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 283 पंचायत समिती निवडणूकांचा
कार्यक्रम घोषीत केलेला आहे. आणि त्याबाबतची आचारसंहिता निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत
झाल्यापासून लागु झालेली आहे. निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत
तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात
येत आहेत.
निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा
व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही
करण्याबाबत भाग-पाच, पोलीस विभागाशी संबंधित मुद्दा क्र.01 अन्वये निवडणूका जाहिर झाल्यापासून
शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आहेत.
बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीत्यांच्या सार्वत्रिक
निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शस्त्र
परवानाधारकांची शस्त्रे (बँका/महत्वाची कार्यालय/संस्था/विद्युत केंद्र व इतर महत्वाचे
कार्यालयाचे शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून) निवडणूक प्रक्रिया शांततेने व खुल्या
वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जमा करणे आवश्यक असल्याने आचारसंहिता कालावधीसाठी
जमा करण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक, बीड यांनी तात्काळ करावी. तसेच आचारसंहिता कालावधी
संपल्यानंतर संबंधितांना त्यांची शस्त्रे परत देण्याची कार्यवाही करावी. असे जिल्हादंडाधिकारी,
बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा