बीड , दि. 18 :-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार व जलजन्य
आजाराचा धोका वाढला असून डेंग्यु, चिकुनगुनिया, मलेरियाची साथ पसरण्याची शक्यता आहे.
यामुळे नागरी आरोग्य अभियानातील सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, एलएचव्ही व हिवताप कार्यालयातील
आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत शहराचे सर्वेक्षण सुरु करावे. ताप रुग्णांचे रक्त नमुने गोळा
करुन जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात यावेत. विशेषत: डासाची घनता, डास अळी इत्यादी घरामधील
व घराजवळील सांड पाण्याचे साठे नष्ठ करण्यात यावेत. गप्पी मासे पाण्यात सोडण्यात यावेत, जे पाणी नष्ट करता येणार नाही त्यामध्ये ॲबेटचा
वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, पिण्याच्या पाण्याचे नमुने
वेळोवेळी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठ विण्यात येवून अहवालानूसार आवश्यक ती कार्यवाही
करावी. सर्वेक्षणात आढळलेल्या आजारी रुग्णांना जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भित करावे.
डेंगू आजारा हा हेडीसइजीप्ती हा डास चावल्याने होतो हा डास साधारत: दिवसा चावतो व तो
घरातील स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. खाजगी व्यावसायिकांनी त्यांच्या रुग्णालयात उपचार
घेत असलेल्या डेंगु रुग्णाबाबत जिल्हा रुग्णालय, बीड यांना नियमित कळविने बंधनकारक
आहे. डेंगु आजाराचे निदान खाजगी रुग्णाल, प्रयोगशाळा व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामार्फत
केले जाते. डेंगुचे निदान तपासणीसाठी एनएस1 इलिसा व मॅक एलिसा या तपासणीसाठी प्रत्येकी
600 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारणी करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये
या आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपीड डायग्नोस्टीक
टेस्ट किटचा वापर करण्यात येऊ नये. असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक
बोल्डे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा