बीड, दि. 29 :- बीड जिल्ह्यात दि.1 ते 31 ऑगस्ट
2016 या कालावधीत आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम
होणार आहेत. तसेच दि.8, 15 व 22 आणि 29 ऑगस्ट 2016 रोजी श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने
जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करणार
आहेत. यासाठी मुंबई पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक
आदेश लागु करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात सध्या मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या
वतीने व राजकीय पक्ष/संघटनेच्यावतीने आंदोलन होत आहेत. जिल्ह्यात विविध पतसंस्था/सेवा
सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रीया चालु असून विविध ठिकाणी मतदान व मतमोजणी प्रक्रीया
संपन्न होणार आहे. दि.24 ऑगस्ट 2016 रोजी श्रीकृष्ण जयंती व दि.25 ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या
निमित्ताने जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात
अचानक तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची
शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई
पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागु करणे
आवश्यक असल्याची पोलीस अधिक्षक बीड यांच्या अहवालावरुन खात्री झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37
(1)(3) प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत
सुर्यवंशी यांनी आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत. की शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या
व्यतिरीक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक
ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शस्त्र, सोटे, काठी, तलवार बंदूक जवळ बाळगणार
नाही. लाठ्या, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु
बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत. दगड किंवा इतर
क्षेपणास्त्र किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची
उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत. किंवा तयार करणार नाहीत.
आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबणात्मक नकला करणार नाहीत. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा
येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,
निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा
समुहाच्या भावना जाणून-बुजून दुखवण्याच्या
उद्देशाने वाद्य वाजवणार नाहीत किंवा इतर जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार
नाहीत. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा
यांचे प्रदर्शन करणार नाहीत. हे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत दि.30 जुलै रोजीचे
00.05 वाजेपासून दि.27 ऑगस्ट 2016 रोजीचे 24.00 वाजपर्यंत लागु राहतील. तसेच विशेषरीत्या
परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत. असे आदेश 29 जुलै 2016 रोजी सही शिक्यानिशी
दिले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा